शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
काय आहे 'सर क्रिक' वाद? ज्यावरून भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पाकिस्तानला थेट धमकी
3
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
4
भारत गाझामध्ये सैन्य पाठवणार? संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांची परिषद बोलावली, चीन आणि पाकिस्तानला बोलावले नाही
5
IND vs WI: वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात शुभमन गिलच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद!
6
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
7
Archana Puran Singh : एकेकाळी जेवणासाठी अभिनेत्रीकडे होते फक्त ११ रुपये; संघर्षाचे दिवस आठवून झाली भावुक
8
IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा'
9
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
10
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
11
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम
12
एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! संपत्ती ५०० बिलियन डॉलरवर, इतकी कमाई आली कोठून?
13
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
14
Success Story: १९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
15
वडील करणार होते पाचव्यांदा लग्न; संपत्तीसाठी लेकाने काढला काटा, पोलिसांची केली दिशाभूल अन्...
16
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
17
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
18
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
19
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
20
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड

भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्रासाठी बसपा हाच पर्याय

By admin | Updated: October 11, 2014 01:15 IST

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत बहुजन समाज पक्ष ताकदीनिशी रिंगणात आहे. उमेदवारी देताना कुठलाही दुजाभाव न करता सर्वच समाजातील घटकांना उमेदवारी दिली.

भंडारा : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत बहुजन समाज पक्ष ताकदीनिशी रिंगणात आहे. उमेदवारी देताना कुठलाही दुजाभाव न करता सर्वच समाजातील घटकांना उमेदवारी दिली. केंद्रात पुंजीपतींच्या बळावर सत्तेवर आलेल्या सरकारने त्यांच्याच हिताची धोरणे राबविणे सुरू केले आहे. महाराष्ट्रातील आघाडी सरकारने भ्रष्टाचाराशिवाय दुसरे काही केले नाही. अशा वाटोळे करणाऱ्या आघाडी सरकारला दूर सारुन भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र घडवा, असे आवाहन बहुजन समाज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उत्तरप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी केले.भंडारा विधानसभा क्षेत्राच्या बसपाचे उमेदवार देवांगणा विजय गाढवे यांच्या प्रचारार्थ दसरा मैदानावर आयोजित प्रचारसभेत त्या बोलत होत्या. मंचावर बसपाचे प्रदेश प्रभारी अ‍ॅड. विरसिंग, अ‍ॅड. सुरेश माने, जिल्हाध्यक्ष संजय गाढवे व उमेदवार उपस्थित होते. यावेळी त्या म्हणाल्या, विदर्भातील नागरिक अनेक वर्षांपासून स्वतंत्र विदर्भाची मागणी करीत असताना सत्ताधाऱ्यांनी या मागणीकडे दुर्लक्ष केले. तुम्ही बसपाला पूर्ण बहुमताने सत्ता द्या, आम्ही स्वतंत्र विदर्भ देऊ, अशी ग्वाही दिली. बसपा कार्यकर्त्यांच्या बळावर उत्तरप्रदेशात बहुजन समाज पक्षाने चारवेळा सत्ता मिळविली. या कार्यकाळात अनेक भरीव विकास कामे करण्यात आली. निराधारांना पक्की घरे बांधून देण्यात आली. भूमिहिनांना जमिनीचे पट्टे देण्यात आले. कायदा व सुव्यवस्थेची विस्कटलेली घडी सुरळीत करण्यात आली. विविध योजनांद्वारे गरीबांना न्याय देण्यात आला. बेरोजगारांना रोजगार भत्ता देण्याऐवजी कायमस्वरुपी नोकरी दिली. सर्वजन सुखाय, सर्वजन हिताय, या धर्तीवर उत्तरप्रदेशला उत्तम सरकार दिले आहे. सोशल इंजिनियरींगचा प्रभावी उपयोग करीत राज्याला विकासाकडे नेले. त्याच धर्तीवर महाराष्ट्राची प्रगती साधण्यासाठी बसपाला विजयी करा, असे आवाहनही त्यांनी केले.