शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

भाऊ, पक्षाची तिकीट कोणत्या कामाची ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2021 05:00 IST

भंडारा जिल्हा परिषदेच्या ५२ तर पंचायत समितीच्या १०४ जागांसाठी निवडणूक घोषित करण्यात आली होती. विविध पक्षांसह अपक्ष उमेदवारांनीही नामांकन दाखल केले. मात्र नामांकन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशीच सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावरून राज्य निवडणूक आयोगाने ओबीसी प्रवर्गातील निवडणुकीला स्थगिती दिली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या १३ व पंचायत समितीच्या २५ जागांवरील निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर नागरिकांचा मागास प्रवर्गातील जागांवर निवडणुकीला स्थगिती आली. या प्रवर्गातील ज्या उमेदवारांना पक्षाची तिकीट मिळाली ती आता कोणत्या कामाची, असा प्रश्न उपस्थित होत आहे. किंबहूना सर्वच निवडणूक प्रक्रीया रद्द होणार काय या प्रश्नाच्या उत्तरासाठी सर्वांच्या नजरा १३ डिसेंबर रोजी होणाऱ्या निर्णयाकडे लागल्या आहेत. तसेच रिंगणातील उमेदवारांमध्येही धास्तीचे वातावरण आहे. भंडारा जिल्हा परिषदेच्या ५२ तर पंचायत समितीच्या १०४ जागांसाठी निवडणूक घोषित करण्यात आली होती. विविध पक्षांसह अपक्ष उमेदवारांनीही नामांकन दाखल केले. मात्र नामांकन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशीच सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावरून राज्य निवडणूक आयोगाने ओबीसी प्रवर्गातील निवडणुकीला स्थगिती दिली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या १३ व पंचायत समितीच्या २५ जागांवरील निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत. एकूण या २८ जागांवर जे उमेदवार उभे होते त्यांनी जीवाचे रान करून पक्षाचे तिकीट (एबी फार्म) मिळविले होते. ऐनवेळी निवडणूक प्रक्रीयेला स्थगिती मिळाल्याने या प्रवर्गातील उमेदवरांची प्रचंड निराशा झाली. भाऊ आम्हाला मिळालेल्या पक्षाची तिकीट आता कोणत्या कामाची, असा सवालही उपस्थित होत आहे.१३ डिसेंबरला निर्णय काय होईल ते होईल. तोपर्यंत अन्य निवडणुकांबाबत संभ्रमता कायम आहे. एकाच वर्गातील काही विद्यार्थ्यांची परीक्षा घ्यायची व काहींना स्थगिती द्यायची काय, असा सवालही व चर्चा उमेदवारांमध्ये दिसून येत आहे. ६ डिसेंबरला ओबीसी जागांवरील निवडणूक स्थगितीची माहिती समोर आल्यानंतर उर्वरित जागांवर निवडणुका होतील, असे चित्र स्पष्ट झाले होते. मात्र आता परिस्थिती वेगळी आहे. दरम्यान काही उमेदवारांनी अर्ज सादर केल्यानंतर आपल्या क्षेत्रात प्रचाराचा नारळही फोडला. मात्र स्थगितीच्या आदेशानंतर व ओबीसी संघटनांनी घेतलेल्या निर्णयांमुळे प्रचारातील नारळाचा फुसका बार होणार काय, अशीही चर्चा रंगली आहे. 

शिगेला पोहचली उत्सुकता

- जिल्हा परिषदेच्या ३९ जागांसाठी ३६१ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात १९८ पुरूष आणि १६३ महिलांचा समावेश आहे. १०४ पैकी ७९ पंचायत समितीच्या जागांसाठी ५४४ उमेदवार रिंगणात आहेत. मात्र ओबीसी प्रवर्गातील जागांवर निवडणुकीला स्थगिती मिळाल्यानंतर आता या सर्वांमध्ये अस्वस्थता व्याप्त आहे. -  १३ डिसेंबरला काय निर्णय होतो याची प्रत्येकाच्या मनातील उत्सुकता शिगेला पोहचली आहे. १३ डिसेंबरलाच उमेदवार मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. निवडणुका झाल्यास चिन्ह वाटप व खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरूवात होईल. मात्र निवडणूक रद्दचा निर्णय झाल्यास सर्व प्रक्रीया तिथेच थांबणार आहे.

तर पैसा पाण्यात- राजकारण म्हटले की पैसा पाण्यासारखा ओतावा लागतो. जीवाचे रान करून पक्षश्रेष्टींकडून तिकीट मिळविण्यासाठी मेहनत घेतली. कार्यकर्त्यांपासून ते बॅनरपर्यंतचा खर्च झाला. निवडणुका घोषित होण्यापुर्वी मतदारांमध्ये सातत्य ठेवण्यासाठीही आर्थिक भार सहन करावा लागला. आता निवडणुका होणार की नाही याबाबत संभ्रमता कायम आहे. निवडणुका रद्द झाल्या तर पैसा पाण्यात जाणार काय, अशी खमंग चर्चाही व तशी भीतीही उमेदवारांना लागली आहे. आता नजरा फक्त निर्णयाकडे.

 

टॅग्स :ZP Electionजिल्हा परिषद