शहरं
Join us  
Trending Stories
1
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
2
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
3
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
4
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
5
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
6
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
7
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
8
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
9
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
10
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
11
विश्वास बसणार नाही, पण फक्त ५६ हजार लोकांकडे जगातील ७५ टक्के संपत्ती
12
Leopard: भाईंदरमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या ७ तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद!
13
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
14
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
15
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
16
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
17
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
18
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
19
Shirdi Sai Baba Donation : आता सोन्याच्या खिडकीतून घेता येणार साईबाबांचे दर्शन, भक्ताचे लाखोंचे दान; सर्वांना मिळेल लाभ
20
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
Daily Top 2Weekly Top 5

ब्रिटिशकालीन मुसाफिरी रजिस्टर पडले अडगळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 14:26 IST

गावात येणाऱ्या प्रत्येक आगंतुकाच्या इत्थंभूत माहितीची नोंद असणारे महत्वाचे दस्तावेज म्हणजे ब्रिटिशकालीन मुसाफिरी रजिस्टर.

ठळक मुद्देपोलीस पाटील करतात नोंदी गुन्हेगारांचा माग काढणारे महत्त्वाचे दस्तावेज

ज्ञानेश्वर मुंदे।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : गावात येणाऱ्या प्रत्येक आगंतुकाच्या इत्थंभूत माहितीची नोंद असणारे महत्वाचे दस्तावेज म्हणजे ब्रिटिशकालीन मुसाफिरी रजिस्टर. पोलीस पाटलांकडे असलेल्या या रजिस्टरमधील नोंदीवरून गुन्हेगारांचा माग काढण्यात मोठी मदत व्हायची. आपल्या हद्दीत गुन्हा घडला की पोलीस प्रथम याच रजिस्टरचा आधार घ्यायचे. मात्र आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात मुशाफिरी रजिस्टर अडगळीत पडले असून प्रशासनालाही याचा विसर पडल्याचे दिसत आहे.प्राचीन काळापासून गावाचा कारभार सांभाळण्यात पोलीस पाटलांची भूमिका महत्वाची आहे. इंग्रजांच्या काळात गाव पातळीवरील कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याची मोठी जबाबदारी त्यांच्यावर होती. त्यातूनच मुसाफिरी रजिस्टरचा जन्म झाला असावा. माहिती ठेवण्याची पद्धत इंग्रजांनी देशात सुरू केल्याचे सांगितले जाते. मात्र नेमकी ही पद्धत केव्हा सुरू झाली हे आज कुणालाही सांगता येत नाही. पूर्वीच्या काळी गावकुसाबाहेर पाल ठोकून राहणाºयांची संख्या मोठी असायची. अनेक कुटुंब उपजीविकेसाठी सतत भटकंती करायचे. या मंडळींची नोंद विशिष्ट बांधणीच्या मुसाफिरी रजिस्टरमध्ये घेतली जायची. त्यात गावात आलेल्या अनोळखी व्यक्तीचे पूर्ण नाव, गाव, जात, व्यवसाय, कोणत्या गावावरून आले, कोणत्या गावाला जाणार, गावात किती दिवस मुक्काम आहे. सोबत कोण-कोण आहे यासह अंगावरील ओळखचिन्हांची नोंद घेतली जाते. गावात अनोळखी आला की सर्वप्रथम कोतवाल पोलीस पाटलांना सूचना देतो. त्यांची नोंद घेतली जाते.एखाद्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हा घडल्यास सर्वप्रथम या रजिस्टरचा आधार घेतला जायचा. त्यातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींचा शोध घेऊन गुन्ह्यांचा छडा लावला जायचा. राज्यात अनेक गुन्ह्यांचा शोध लागण्यात मुसाफिरी रजिस्टरने महत्वाची भूमिका बजावली. प्रत्येक गावातील पोलीस पाटील आजही यात न चुकता नोंदी घेत आहेत. मात्र आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात या रजिस्टरचे महत्व कमी होत आहे. पोलीस विभाग आता या रजिस्टरकडे पाहायलाही तयार नाही. विविध कामांसाठी महत्वाचे दस्तवेज ठरू पाहणारे हे रजिस्टर आता अडगळीत पडले आहे.

रजिस्टरमधील नोंदीवरून मिळाले जात प्रमाणपत्रजात प्रमाणप्रत्र काढण्यासाठी पूर्वजांच्या जातीचा उल्लेख असलेले अभिलेखे ग्राह्य धरले जातात. जन्ममृत्यूची नोंद असणारे कोटवार बुक महत्वाचा पुरावा मानला जातो. मात्र सतत भटकंती करणाऱ्यांच्या अशा नोंदी सापडणे कठीण जाते. त्यामुळे त्यांना जात प्रमाणपत्र मिळविण्यात अडचणी येतात. असा अनुभव वडार आणि मांगगारुडी समाजातील काही व्यक्तींना आला. मात्र भंडारा जिल्ह्यातील एका गावात मुसाफिरी रजिस्टरमध्ये असलेल्या जातीच्या नोंदीवरून त्यांना जात प्रमाणपत्र मिळण्यास मोठी मदत झाली. एवढे महत्वाचे दस्तावेज आता दुर्लक्षित होत आहे.गावात येणाऱ्या प्रत्येक अनोळखी व्यक्तीची नोंद आजही मुसाफिरी रजिस्टरमध्ये घेतली जाते. आमच्या पिंडकेपार गावच्या रजिस्टरमध्ये १९६७ पासूनच्या अद्ययावत नोंदी आहेत. पूर्वीचे रजिस्टर जीर्ण झाले आहेत. त्यामुळे शासनाने या रजिस्टरचे डिजिटलायझेशन करावे. त्याचा उपयोग सामाजिक इतिहास संशोधकांना होऊ शकतो.-सुधाकर साठवणे, जिल्हाध्यक्ष, पोलीस पाटील संघटना, भंडारा.

टॅग्स :Governmentसरकार