शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
3
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
4
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
5
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
6
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
7
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
8
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
9
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
10
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
11
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
12
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
13
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
14
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
15
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
16
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
17
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
18
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
19
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
20
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा

अतिक्रमणात गुदमरतोय राज्य मार्गाचा श्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 22:09 IST

तुमसर-बप२ो राज्य मार्गाच्या कडेला असणारी खतकुडे थेट मार्गावर पोहचली आहेत. याशिवाय मार्गावर अतिक्रमण वाढलेले असून गावाचा श्वास गुदमरण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्देखतकुड्यामुळे अपघात वाढले : व्यथा तुमसर-बपेरा राज्यमार्गाची

आॅनलाईन लोकमतचुल्हाड (सिहोरा) : तुमसर-बप२ो राज्य मार्गाच्या कडेला असणारी खतकुडे थेट मार्गावर पोहचली आहेत. याशिवाय मार्गावर अतिक्रमण वाढलेले असून गावाचा श्वास गुदमरण्याची वेळ आली आहे. राज्य मार्ग मोकळा करण्यासाठी सरपंच पुढाकार घेत असला तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने समन्वय साधण्याची गरज आहे.तुमसर-बपेरा राज्य मार्गाची लांबी ३० कि.मी. आहे. हा राज्य मार्ग मध्यप्रदेश राज्याला जोडणारा आहे. या मार्गावर डिसेंबर महिन्यात जीवघेणे अपघात घडल्याने राज्यमार्ग चर्चेत आला. या अपघातांना नागरिकांनी बांधकाम विभागाला कारणीभूत धरले आहेत. राज्य मार्गावर खड्डे असून हा राज्य मार्ग दोन भागात विभागला आहे. वाढत्या अपघाताला अतिक्रमण, झुडपे तथा दिशादर्शक फलकाचा अभाव. आहे. राज्य मार्गावर अनेक गावाचे वास्तव्य आहे. गावात वास्तव्य करणाऱ्या नागरिकांनी राज्यमार्गाच्या कडेला थेट तणस व खतकुड्याचे ढिग तयार केले आहेत. हे ढिगारे थेट राज्य मार्गावर आले आहेत. या ढिगामुळे वाहनधारकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. समोरील वाहने या ढिगाऱ्यामुळे दिसत नाही. राज्य मार्गावरील अपघात टाळण्यासाठी अतिक्रमण हटविण्याची गरज आहे. या वळणावर दिशादर्शक फलक नसल्यामुळे वळणावर वाहनधारक भ्रमित होतात. बांधकाम विभाग निधीचा वाणवा असल्याचे सांगत आहे. राज्य मार्गावर जीवघेणे अपघात चिंतेचा विषय झाल्याने सरपंचांनी पुढाकार घेतला आहे. बांधकाम विभागाने झुडपी, खड्डे, फलक तथा गावातील सरपंचांसोबत समन्वय साधून मार्ग काढण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.गावातील रस्त्यावर शेतीचे अतिक्रमणगाव शिवारांना जोडणारे रस्ते जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत आहेत. सिहोरा परिसरात असणारे रस्ते खड्डेमय आहे. हे रस्ते वाढत्या झुडुपांनी दिसेनाशी झाली असून या मार्गावर जनावरे बांधण्यात येत आहेत. शेतशिवारातून जाणारा रस्ता शेतीच्या हद्दीत गिळंकृत झाला आहे. त्यामुळे रस्ता अरुंद झाला आहे. महालगाव ते गोंडीटोला मार्गाने प्रवास करताना वाहनधारकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. बिनाखी ते सुकळी मार्गावर झुडप वाढल्यामुळे अपघात वाढत आहेत.राज्यमार्गालगत घरांचे वास्तव्य असून बहुतांश शेतकरी आहेत. जागेच्या अभावाने तणीस व खातकुडे तयार केले आहेत. समन्वयातून राज्य मार्ग मोकळा करण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे.-नितीन गणवीर, सरपंच, हरदोली.