शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
2
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
3
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
4
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
5
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
6
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
7
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
8
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
10
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
11
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
12
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
13
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
14
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
15
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
16
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
17
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
18
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
19
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
20
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
Daily Top 2Weekly Top 5

जैवविविधतेसाठी झटताहेत ‘त्यांचे’ हात

By admin | Updated: November 26, 2014 23:00 IST

मागील काही वर्षांपूर्वी नैसर्गिक प्रकोपाच्या तडाख्यातून सावरलेले पाचशे लोकवस्तीचे केसलापुरी हे गाव आता जलजैवविविधतेसाठी सरसावले आहे. भंडारा निसर्ग व संस्कृती अभ्यास मंडळ

केसलापुरीची आदर्श वाटचाल : निसर्ग मंडळ व वन विभागाचा पुढाकारनंदू परसावार - भंडारामागील काही वर्षांपूर्वी नैसर्गिक प्रकोपाच्या तडाख्यातून सावरलेले पाचशे लोकवस्तीचे केसलापुरी हे गाव आता जलजैवविविधतेसाठी सरसावले आहे. भंडारा निसर्ग व संस्कृती अभ्यास मंडळ आणि भंडारा वनविभागाने या गावाला दिशा देण्यासाठी तेथील ग्रामस्थांमध्ये ऊर्जा पेरली आणि ग्रामस्थ तलावाच्या संवर्धनासाठी झटत आहे.जंगलात जाणे आणि सरपणासाठी लाकडे आणने असा तेथील ग्रामस्थांचा नित्यक्रम होता. गावालगतचे जंगल आणि तलाव ओसाड होऊ लागले होते. तेथील जैवविविधता नष्ट झाली होती. अशातच भंडारा निसर्ग व संस्कृती अभ्यास मंडळ या संस्थेद्वारा मागील २० वर्षापासून भंडारा जिल्ह्यातील माजी मालगुजारी तलावांचा अभ्यास सुरू होता. दरम्यान चिखलदरा येथे झालेल्या मानद वन्यजीव रक्षकांच्या बैठकीत भंडारा निसर्ग व संस्कृती अभ्यास मंडळाचे पदाधिकारी तथा मानद वन्यजीव रक्षक राजकमल जोब यांनी अभ्यासपूर्ण माहिती सादर केली. त्यानंतर वनविभागाचे तत्कालीन प्रधान सचिव प्रविण परदेशी यांनी मुंबई येथील आयोजित जैवविविधता संवर्धनात काम करणाऱ्या मंडळांच्या सभेला मार्गदर्शन करण्यासाठी जोब यांना आमंत्रित केले होते. याच सभेत भंडारा जिल्ह्यातील दोन मामा तलावात जैवविविधता पुन:स्थापनेचे काम करण्यासाठी निसर्ग मंडळ व भंडारा वनविभागाला महाराष्ट्र जैवविविधता मंडळातर्फे प्रत्येक तलावासाठी ५ लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला. त्यानंतर वनविभागाच्या मार्गदर्शनात गावातील जैवविविधता व्यवस्थापन समितीने ही कामे करण्याचे या सभेत ठरविले. अड्याळ वनक्षेत्रात येणाऱ्या पुरकाबोडीनजिकचे भिवखिडकी हे गाव तलाव फुटल्यामुळे उद्ध्वस्त झाले होते. या गावातील कुटुंब नंतर लागून असलेल्या केसलापुरी येथे स्थानांतरीत झाले. या योजनेत भंडारा तालुक्यातील केसलापुरी आणि खुर्शीपार या दोन गावाला लागून असलेल्या मामा तलावांची निवड करण्यात आली. सोबतच समितीही स्थापन करण्यात आली. राज्य जैवविविधता मंडळाने दिलेला प्रत्येकी २.५० लाख रूपयांचा हप्ताही समितीच्या बँक खात्यात जमा करण्यात आला. प्रारंभी तलावातील बेशरमच्या झाडांचे निर्मूलन करीत सदस्यांनी ही वनस्पती जाळून टाकली. उन्हाळ्यात तलावाचे पाणी कमी होताच, ट्रॅक्टरने नांगरणी करून आसेरा, देवधान आणि खस वनस्पतीची लागवड करण्यात आली. तलावात चिला तसेच लाल, पांढरे कमळही लावण्यात आले. संपूर्ण जैवविविधतेची वाढ होण्यासाठी मरळ, तुंभ, बोटऱ्या आणि अन्य स्थानिक प्रजातीचे मासे सोडण्यात आले. तलाव परिसरात लागवड केलेल्या वनस्पती पाळीव जनावरांकडून फस्त होऊ नये यासाठी या क्षेत्राला काट्याचे कुंपण करण्यात आले आहे.