शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast : शू बॉम्बर, रॉकेट, ड्रोन... दिल्ली स्फोटातील उमरने हमाससारख्या भयंकर हल्ल्याचा रचलेला कट?
2
धक्कादायक! धावत्या अँम्बुलन्सला भीषण आग, नवजात बालकासह चार जणांचा होरपळून मृत्यू
3
"साहेबांसाठी काहीतरी करा"; वॉशरूममध्ये लाच मागितली, पैसे मिळताच WhatsApp कॉल केला अन् अडकले न्यायमूर्ती
4
बिहार निकालावरील चर्चेमुळे गेला जीव, २२ वर्षीय भाच्याचा दोन मामांनीच काढला काटा
5
गर्भात जुळ्या मुलांचा मृत्यू, उपचारादरम्यान आईचा गेला जीव; दुःखी झालेल्या पतीने स्वत:ला संपवलं
6
सुमार मराठीवरून झाल्या ट्रोल, भाजपाच्या नगराध्यक्षपदाच्या 'त्या' महिला उमेदवार कोण? व्हिडीओ होतोय व्हायरल
7
Delhi Car Blast: अल-फलाह विद्यापीठाविरुद्ध EDची कारवाई, ओखला-जामिया नगरसह २५ ठिकाणी छापे
8
भर कॉन्सर्टमध्ये पाकिस्तानी सिंगरने फडकावला भारताचा झेंडा, ट्रोलिंग झाल्यावर म्हणतो- "मी हे पुन्हा करेन, कारण..."
9
"त्याने माझ्या पाठीवरून हात फिरवला आणि...", गिरिजा ओकला आलेला लोकल ट्रेनमध्ये धक्कादायक अनुभव
10
रांगेत उभे राहू नका! पोस्ट ऑफिसमध्ये जा आणि कागदपत्रांशिवाय मिनिटांत नंबर अपडेट करा
11
दत्त जयंती २०२५: गुरुचरित्र वाचण्यावर स्त्रियांना बंदी का? सद्गुरू टेंबे स्वामींनी दिले आहे स्पष्टीकरण!
12
Mumbai: अनैतिक संबंधातून बाळाचा जन्म, डॉक्टरांकडून ५ लाखांत विकण्याचा प्रयत्न, ५ जणांवर गुन्हा दाखल
13
दोन PAN Card ठेवल्यास ₹१०,००० दंड आणि तुरुंगवासाची शिक्षा; 'या' सोप्या पद्धतीने सरेंडर करा दुसरे कार्ड!
14
नवी मुंबईत शिवरायांचा पुतळा पुन्हा झाकला; नुकतेच अमित ठाकरेंनी आंदोलन करत केले होते अनावरण
15
श्रीमंतीचा दिखावा, ६ गर्लफ्रेंड पटवल्या, कायम जंगलात राहायचा; अखेर पोलिसांनी 'त्याला' अटक केली
16
शेअर बाजारातील 'जॅकपॉट' स्टॉक्स : १० महिन्यांत ₹१०००० चे झाले ₹५ लाख; पैशांचा वर्षाव करताहेत ‘हे’ ४ स्टॅाक
17
श्रीकांत शिंदे यांना भाजपाचा मोठा धक्का; कल्याण डोंबिवलीत शिंदेसेनेच्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
18
Mumbai: मुंबईत कांदा स्वस्त होणार की महागणार? पावसामुळे मोठे नुकसान; उत्पादनाचा अंदाज येईना
19
धक्कादायक! ३४ वर्षांच्या प्रसिद्ध गायकाचं निधन, समोर आलं हादरवून सोडणारं कारण
20
Mumbai: शाळेच्या कॅन्टीनमधील समोसा खाल्ल्याने २० विद्यार्थ्यांना विषबाधा, तेलात कापूर पडल्याची माहिती
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमणाने कोंडला शहरातील बाजारपेठेचा श्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 21:44 IST

नागरिकांची नेहमी वर्दळ राहणाऱ्या भंडारा शहरातील मोठा बाजाराचा श्वास अतिक्रमणाने कोंडला गेला आहे. ऐन रस्त्यावर दुकाने थाटली गेल्याने रहदारीचा रस्ता चांगलाच अरुंद झाला आहे. त्यातच हेकेखोरपणा व मुजोरी वाढल्याने पालिका प्रशासनाचे कर्मचारीही कारवाई करण्यास धजावत आहे.

ठळक मुद्देपर्यायी व्यवस्थेलाही ‘खो’ : कारवाईचा बडग्यानंतरही स्थिती जैसे थे

इंद्रपाल कटकवार।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : नागरिकांची नेहमी वर्दळ राहणाऱ्या भंडारा शहरातील मोठा बाजाराचा श्वास अतिक्रमणाने कोंडला गेला आहे. ऐन रस्त्यावर दुकाने थाटली गेल्याने रहदारीचा रस्ता चांगलाच अरुंद झाला आहे. त्यातच हेकेखोरपणा व मुजोरी वाढल्याने पालिका प्रशासनाचे कर्मचारीही कारवाई करण्यास धजावत आहे.पावने दोन लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या भंडारा शहरात बाजारपेठेची व्याप्तीही झपाट्याने वाढली आहे. वाढत्या नागरिकरणामुळे शहराच्या अन्य भागातही बाजारपेठ भरविली जाते. भंडारा शहरातील मोठा बाजार परिसर मात्र हा अंत्यंत रहदारीचा व नेहमी गजबजलेला परिसर म्हणून ओळखला जातो. शर्मा बालोद्यान ते बसस्थानकापर्यंतचा भाग मोठा बाजार परिसर म्हणून ओळखला जातो. या बाजारपेठेत चिल्लर वस्तू खरेदीपासून ठोक विक्रेत्यांचीही असंख्य दुकाने आहेत. याच भागात सेंट्रल बँक आॅफ इंडिया शाखा, चार एटिएम केंद्र, कृषी उत्पन्न बाजार समिती, वाहतूक शाखा कार्यालय, दूरसंचार विभागाचे ग्राहक सेवा केंद्र, जिल्हा मुख्य पोस्ट कार्यालय, भाजीपाला बाजारपेठ, प्रसिध्द हनुमान मंदि, अन्नपूर्णा दुर्गा माता मंदिर, पाण्याचे लहान जलकुंभ, मिरची बाजारपेठ, सराफा लाईनसह शेकडो व्यापारी प्रतिष्ठाने आहेत. परंतू या बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण असल्याने रहदारीला त्रास होत आहे.विशेषत: बाजारपेठेतील बिसन हॉटेल ते बसस्थानकाकडे जाणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणात गर्दी असते. दुरसंचार ग्राहक सेवा केंद्राजवळील चौक ते बसस्थानक मार्गावर तर अतिक्रमणाचा कळस बघायला मिळतो. पालिका प्रशासनाने पर्यायी व्यवस्था करुन न दिल्याने हातठेलाचालक, फेरीवाल्यांनी रस्त्यावरच सर्रास दुकाने थाटली आहेत.परिणामी येथील रहदाीवर परिणाम होत असून या मार्गावरील मुख्य दुकाने अक्षरश: झाकल्या गेली आहे. रस्ता अरुंद झाल्याने लहान-मोठे अपघात घडत आहे. या मार्गावरील मुख्य दुकानासमोर बसस्थानक मार्गावर व लहान चौकात मोठ्या प्रमाणात लहान दुकानदारांनी दुकाने लावल्याने वादावादीचे प्रकारही वाढले आहेत. नियमित कराचा भरणा करुनही पालिका प्रशासन कुठलीच सुविधा देत नसेल तर कर द्यावा तरी कशाला असा सवाल, येथील व्यापारी विचारित आहेत. अतिक्रमण धारकांना अभय दिले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.बाजाराच्या दिवशी हाल बेहालदर रविवारी मुख्य बाजार तर बुधवारी मिनी बाजार भरत असतो. मात्र अरुंद रस्त्यामुळे बाजाराच्या दिवश वाहतुकीची कोंडी निर्माण होत असते. पोस्ट आॅफीस चौक ते गांधी चौकापर्यंत एकेरी वाहतुक व्यवस्था असतांनाही वाहतुकीची कोंडी कमी झालेली नाही. विशेष म्हणजे, शहराच्या मुख्य मार्गावर पार्किंगची व्यवस्था नसल्याने ही समस्या उग्र रुप धारण करीत आहेत. वाहतुक शाखेचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे जाणवते.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमण