शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

मतदानावर बहिष्काराचा फोडला नारळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 22:00 IST

तीन दशकांपासून प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने गांभिर्याने न घेतल्याने अखेर आज तालुका कृती संघर्ष समितीने मतदानावर बहिष्काराचा नारळ फोडला. निवडणुकीच्या काळात प्रचाराचा शुभारंभ करताना नारळ फोडला जातो. मात्र अड्याळ येथे मंगळवारी प्रचाराऐवजी ग्रामस्थांनी बहिष्काराचा नारळ फोडला.

ठळक मुद्देप्रचार नाही : अड्याळ येथील प्रकार, तालुका निर्मितीवर ग्रामस्थ ठाम

अड्याळ : तीन दशकांपासून प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने गांभिर्याने न घेतल्याने अखेर आज तालुका कृती संघर्ष समितीने मतदानावर बहिष्काराचा नारळ फोडला. निवडणुकीच्या काळात प्रचाराचा शुभारंभ करताना नारळ फोडला जातो. मात्र अड्याळ येथे मंगळवारी प्रचाराऐवजी ग्रामस्थांनी बहिष्काराचा नारळ फोडला.अड्याळला तालुका म्हणून घोषित करावे या मागणीला घेवून मागील दोन महिन्यांपासून अड्याळ येथे वातावरण तापले आहे. तीन दशकांचा कालावधी लोटूनही कुठल्याही राजकीय पक्षाने ग्रामस्थांच्या मागणीवर गांभिर्याने विचार केला नाही. निवडणुका आल्या की, आश्वासनाचे गाजर दिले जाते. मात्र यावेळी अड्याळसह अन्य गावातील नागरिकांनी आश्वासनाला बळी न पडता निर्णयावर ठाम राहण्याचा निर्णय घेतला. यात अड्याळ तालुका कृती संघर्ष समिती स्थापन करुन लोकशाही मार्गाने लढा सुरु केला.दरम्यान व्यापक हितासाठी ग्रामस्थ न्याय मागणी करीत असून अड्याळ तालुका निर्मिती होणार नाही तोपर्यंत कुठल्याही निवडणुकीत आम्ही मतदान करणार नाही, अशी स्पष्ट भुमिका दोन महिन्यांपुर्वी झालेल्या बैठकीत घेण्यात आली होती. त्यानुसारच लोकसभा निवडणुकीवरही ग्रामस्थांनी बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे.मंगळवारी सायंकाळच्या सुमारास ढोल ताशांच्या गजरात कृती संघर्ष समिती व नागरिकांच्या वतीने येथील प्रसिध्द हनुमान मंदिरात निवडणुकीवर बहिष्काराचा नारळ फोडला.विशेष म्हणजे याचवेळी या संदर्भातील जाहिर आवाहनाचे पत्रकेही वाटण्यात आली.