शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
3
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
4
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
5
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
6
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
7
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
8
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
9
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
10
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
11
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
12
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
13
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
14
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
15
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
16
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
17
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
18
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
19
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
20
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

सहा महिन्यातच कालवा सिमेंट अस्तरीकरणाच्या कामांना भेगा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2024 11:45 IST

डाव्या कालवा पिंपरी चुन्नी शिवारातील प्रकार : टेलवरील शिवारात कालव्याचे कामे निकृष्ट

रंजित चिंचखेडे लोकमत न्यूज नेटवर्क चुल्हाड (सिहोरा) : शेतकऱ्याच्या शेत शिवारात जलद गतीने चांदपूर जलाशयाचे पाणी पोहचविण्यासाठी डावा कालवा सिमेंट अस्तरीकरण करण्यात आले. टेलवरील पिंपरी चुन्नी शिवारात सिमेंट अस्तरीकरण सहा महिन्यांपूर्वी करण्यात आले. खरीप हंगामातील पहिल्याच सोडण्यात आलेल्या पाण्याने सिमेंट अस्तरीकरणाच्या कामांना भेगा पडल्या आहेत. शेतकऱ्याच्या शेतात पाणी कसे पोहचणार, असा सवाल शेतकऱ्यांनी केला आहे. सिमेंट अस्तरीकरणाच्या कामांची चौकशीची मागणी होत आहे.

खरीप आणि रब्बी हंगामात शेतकऱ्याचे शेतीला सिंचित करण्यासाठी चांदपूर जलाशयाचे पाणी सोडले जात आहे. डावा आणि उजवा या मुख्य कालव्यात पाणी सोडल्यानंतर नहराच्या माध्यमातून शेतीला पाणी दिले जात आहे. कालव्यात झुडपे वाढत असल्याने पाण्याचा प्रवाह अवरुद्ध होत आहे. टेलवरील शेत शिवारात पाणी पोहोचत नाही. या परिसरातील शेतकरी पाटबंधारे विभागाला करारबद्ध राहत असल्याने पाणी वाटपाची जबाबदारी याच विभागावर येत आहे. 

सिमेंट अस्तरीकरण करण्यात येत असल्याने झुडपे वाढत नाही. पाण्याच्या प्रवाहाला गती येत आहे. सिमेंट अस्तरीकरणाच्या कामासाठी कोट्यवधीचा निधी मंजूर करण्यात येत आहे. शेतकऱ्यांना सिंचन सुविधा उपलब्ध करण्यासाठी कोट्यवधीचा निधी दिला जात असताना यंत्रणा निधीचा दुरुपयोग करीत असल्याचे दिसून येत आहे. मुख्य डावा कालव्यावरील पिंपरी चुन्नी शिवारात कालव्याचे सिमेंट अस्तरीकरण गत सहा महिन्यांपूर्वी करण्यात आले आहे.

या कालव्यात खरीप हंगामातील पहिले पाणी चांदपूर जलाशयाचे सोडण्यात आले आहे. पहिल्याच पाण्याने सिमेंट अस्तरीकरणाच्या कामांना भेगा पडल्या आहेत. सिमेंट अस्तरीकरणाचे काम निकृष्ट झाला असल्याचे बोलके चित्र या कालव्यावर दिसून आले आहे. जलाशयाचे पाणी मिळत नाही. टेलवरील शेतात पाणी पोहोचवण्याचा प्रयत्न फसला आहे. कालव्याची स्थिती 'जैसे थे' होणार आहे. 

कालव्याचे सिमेंट अस्तरीकरण पूर्ण झाल्यानंतर गुणवत्ता तपासली जात नाही? हा खरा प्रश्न आहे. अनेक कालवे आणि नहराला भगदाड पडले आहे. अलीकडे चांदपूर गावातच मुख्य उजवा कालवा फुटला होता. सिमेंट अस्तरीकरणाचान उपयोग नसल्याचा प्रसंग निदर्शनास आला होता.

आऊटलेटचे दरवाजे उघडेखरीप आणि रब्बी हंगामात जलाशयाचे पाणी सोडण्यात आल्यानंतर आऊटलेटची भूमिका महत्त्वपूर्ण राहत आहे. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी आऊटलेटचे महत्त्व वाढत आहे. शेतीला सिंचित करताना पाणी शेतात पूर्ण होताच आऊटलेट बंद करण्यात येत आहे. यामुळे अतिरिक्त पाणी नाल्यात जात नाही. परंतु आऊटलेटचे दरवाजे खुले असल्याने पाण्याचा अपव्यय होत आहे.

टॅग्स :bhandara-acभंडारा