शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
2
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
3
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
4
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
5
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
6
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
7
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
8
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
9
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
10
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
11
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
12
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
13
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
14
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
15
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
16
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
17
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले
18
आयुष्य कसं वळणं घेईल? काहीच सांगता येत नाही; एक स्वप्न तुटलं, सोनम राजला भेटली अन्...! मग त्याच्यासाठी केलं एवढं मोठं कांड!
19
'...तर पाकिस्तानात घुसून हल्ला करू', परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा पाकिस्तानला थेट इशारा
20
Video - "हनिमूनवरुन जिवंत परतणं ही मोठी कामगिरी..."; सोनम-राजा प्रकरणावर मीम्स व्हायरल

सहा महिन्यातच कालवा सिमेंट अस्तरीकरणाच्या कामांना भेगा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2024 11:45 IST

डाव्या कालवा पिंपरी चुन्नी शिवारातील प्रकार : टेलवरील शिवारात कालव्याचे कामे निकृष्ट

रंजित चिंचखेडे लोकमत न्यूज नेटवर्क चुल्हाड (सिहोरा) : शेतकऱ्याच्या शेत शिवारात जलद गतीने चांदपूर जलाशयाचे पाणी पोहचविण्यासाठी डावा कालवा सिमेंट अस्तरीकरण करण्यात आले. टेलवरील पिंपरी चुन्नी शिवारात सिमेंट अस्तरीकरण सहा महिन्यांपूर्वी करण्यात आले. खरीप हंगामातील पहिल्याच सोडण्यात आलेल्या पाण्याने सिमेंट अस्तरीकरणाच्या कामांना भेगा पडल्या आहेत. शेतकऱ्याच्या शेतात पाणी कसे पोहचणार, असा सवाल शेतकऱ्यांनी केला आहे. सिमेंट अस्तरीकरणाच्या कामांची चौकशीची मागणी होत आहे.

खरीप आणि रब्बी हंगामात शेतकऱ्याचे शेतीला सिंचित करण्यासाठी चांदपूर जलाशयाचे पाणी सोडले जात आहे. डावा आणि उजवा या मुख्य कालव्यात पाणी सोडल्यानंतर नहराच्या माध्यमातून शेतीला पाणी दिले जात आहे. कालव्यात झुडपे वाढत असल्याने पाण्याचा प्रवाह अवरुद्ध होत आहे. टेलवरील शेत शिवारात पाणी पोहोचत नाही. या परिसरातील शेतकरी पाटबंधारे विभागाला करारबद्ध राहत असल्याने पाणी वाटपाची जबाबदारी याच विभागावर येत आहे. 

सिमेंट अस्तरीकरण करण्यात येत असल्याने झुडपे वाढत नाही. पाण्याच्या प्रवाहाला गती येत आहे. सिमेंट अस्तरीकरणाच्या कामासाठी कोट्यवधीचा निधी मंजूर करण्यात येत आहे. शेतकऱ्यांना सिंचन सुविधा उपलब्ध करण्यासाठी कोट्यवधीचा निधी दिला जात असताना यंत्रणा निधीचा दुरुपयोग करीत असल्याचे दिसून येत आहे. मुख्य डावा कालव्यावरील पिंपरी चुन्नी शिवारात कालव्याचे सिमेंट अस्तरीकरण गत सहा महिन्यांपूर्वी करण्यात आले आहे.

या कालव्यात खरीप हंगामातील पहिले पाणी चांदपूर जलाशयाचे सोडण्यात आले आहे. पहिल्याच पाण्याने सिमेंट अस्तरीकरणाच्या कामांना भेगा पडल्या आहेत. सिमेंट अस्तरीकरणाचे काम निकृष्ट झाला असल्याचे बोलके चित्र या कालव्यावर दिसून आले आहे. जलाशयाचे पाणी मिळत नाही. टेलवरील शेतात पाणी पोहोचवण्याचा प्रयत्न फसला आहे. कालव्याची स्थिती 'जैसे थे' होणार आहे. 

कालव्याचे सिमेंट अस्तरीकरण पूर्ण झाल्यानंतर गुणवत्ता तपासली जात नाही? हा खरा प्रश्न आहे. अनेक कालवे आणि नहराला भगदाड पडले आहे. अलीकडे चांदपूर गावातच मुख्य उजवा कालवा फुटला होता. सिमेंट अस्तरीकरणाचान उपयोग नसल्याचा प्रसंग निदर्शनास आला होता.

आऊटलेटचे दरवाजे उघडेखरीप आणि रब्बी हंगामात जलाशयाचे पाणी सोडण्यात आल्यानंतर आऊटलेटची भूमिका महत्त्वपूर्ण राहत आहे. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी आऊटलेटचे महत्त्व वाढत आहे. शेतीला सिंचित करताना पाणी शेतात पूर्ण होताच आऊटलेट बंद करण्यात येत आहे. यामुळे अतिरिक्त पाणी नाल्यात जात नाही. परंतु आऊटलेटचे दरवाजे खुले असल्याने पाण्याचा अपव्यय होत आहे.

टॅग्स :bhandara-acभंडारा