शहरं
Join us  
Trending Stories
1
टेस्लामध्ये मोठा पेच! पॅकेजवरून वाद, एलन मस्क कंपनी सोडण्याची शक्यता; अध्यक्षांचा गंभीर इशारा...
2
एकनाथ खडसेंच्या जळगावातील बंगल्यात चोरी; किती मुद्देमाल चोरून नेला?
3
UPSC कँडिडेट हत्येप्रकरणी मोठा खुलासा; घरातील हार्ड ड्राइव्हमध्ये १५ महिलांचे अश्लील फोटो
4
मोठी अपडेट: श्रेयस अय्यर ड्रेसिंग रुममध्येच बेशुद्ध पडलेला; वैद्यकीय पथकाने लागलीच धोका ओळखला, नाहीतर...
5
ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर काळाच्या पडद्याआड! वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
6
"तेच रडणे, तीच मळमळ, त्याच उलट्या, त्याच फुशारक्या...", भाजपाने उद्धव ठाकरेंना डिवचलं
7
कॉफीसाठी जगभरात प्रसिद्ध असलेला 'हा' देश मोठ्या संकटात! यावर्षीच्या सगळ्यात भयंकर विनाशाला सामोरा जाणार
8
पेटीएम, जीपे, फोनपेवरील ऑटो पे कसे बंद कराल? आपोआप जातायत सबस्क्रीप्शन, पेमेंटचे पैसे... 
9
CCTV फुटेजमध्ये भलत्याच ठिकाणी दिसला आरोपी अन्...; अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात ट्विस्टवर ट्विस्ट
10
Aadhaar Card New Rules 1st Nov: महत्त्वाची बातमी! १ नोव्हेंबरपासून बदलणार आधार कार्डाशी निगडीत ३ मोठे नियम, जाणून घ्या
11
शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स ८४,८८० च्या पार; निफ्टीही वधारला, 'या' प्रमुख स्टॉक्समध्ये तेजी
12
वनप्लस १५ येतोय...! पण १४ क्रमांक का वगळला? चिनी संस्कृतीत असे काय आहे...
13
शंकर महाराज प्रकट दिन: म्हणा अकरा कवनांचे स्तोत्र, विजयी होईल सर्वत्र; कामना होतील पूर्ण
14
Bank Holidays November 2025: नोव्हेंबरमध्ये किती दिवस बँका राहणार बंद? पाहा RBI ची हॉलिडे लिस्ट, पटापट आटपा काम
15
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
16
१०० वर्षांनी महालक्ष्मीसह ४ राजयोग: ७ राशींना सुबत्ता, कल्याण; बक्कळ लाभ, यशाचा मंगलमय काळ!
17
Tulasi Vivah 2025: विष्णू हे लक्ष्मीपती असूनही दरवर्षी तुळशीशी का लावला जातो विवाह?
18
LIC ची ‘ही’ स्कीम गुंतवणूकदारांना बनवेल कोट्यधीश!; ४ वर्षापर्यंत भरा प्रीमिअम, मिळतील १ कोटी
19
"मी तुला कच्च खाऊन टाकेन"; बायकोने नवऱ्याला गर्लफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडलं, चपलेने धू-धू धुतलं
20
चिनी हँडलर, टेलिग्राम ट्रॅप, लाखोंची लूट... ४७ लाखांच्या फसवणुकीचा पर्दाफाश, तिघांना अटक

सहा महिन्यातच कालवा सिमेंट अस्तरीकरणाच्या कामांना भेगा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2024 11:45 IST

डाव्या कालवा पिंपरी चुन्नी शिवारातील प्रकार : टेलवरील शिवारात कालव्याचे कामे निकृष्ट

रंजित चिंचखेडे लोकमत न्यूज नेटवर्क चुल्हाड (सिहोरा) : शेतकऱ्याच्या शेत शिवारात जलद गतीने चांदपूर जलाशयाचे पाणी पोहचविण्यासाठी डावा कालवा सिमेंट अस्तरीकरण करण्यात आले. टेलवरील पिंपरी चुन्नी शिवारात सिमेंट अस्तरीकरण सहा महिन्यांपूर्वी करण्यात आले. खरीप हंगामातील पहिल्याच सोडण्यात आलेल्या पाण्याने सिमेंट अस्तरीकरणाच्या कामांना भेगा पडल्या आहेत. शेतकऱ्याच्या शेतात पाणी कसे पोहचणार, असा सवाल शेतकऱ्यांनी केला आहे. सिमेंट अस्तरीकरणाच्या कामांची चौकशीची मागणी होत आहे.

खरीप आणि रब्बी हंगामात शेतकऱ्याचे शेतीला सिंचित करण्यासाठी चांदपूर जलाशयाचे पाणी सोडले जात आहे. डावा आणि उजवा या मुख्य कालव्यात पाणी सोडल्यानंतर नहराच्या माध्यमातून शेतीला पाणी दिले जात आहे. कालव्यात झुडपे वाढत असल्याने पाण्याचा प्रवाह अवरुद्ध होत आहे. टेलवरील शेत शिवारात पाणी पोहोचत नाही. या परिसरातील शेतकरी पाटबंधारे विभागाला करारबद्ध राहत असल्याने पाणी वाटपाची जबाबदारी याच विभागावर येत आहे. 

सिमेंट अस्तरीकरण करण्यात येत असल्याने झुडपे वाढत नाही. पाण्याच्या प्रवाहाला गती येत आहे. सिमेंट अस्तरीकरणाच्या कामासाठी कोट्यवधीचा निधी मंजूर करण्यात येत आहे. शेतकऱ्यांना सिंचन सुविधा उपलब्ध करण्यासाठी कोट्यवधीचा निधी दिला जात असताना यंत्रणा निधीचा दुरुपयोग करीत असल्याचे दिसून येत आहे. मुख्य डावा कालव्यावरील पिंपरी चुन्नी शिवारात कालव्याचे सिमेंट अस्तरीकरण गत सहा महिन्यांपूर्वी करण्यात आले आहे.

या कालव्यात खरीप हंगामातील पहिले पाणी चांदपूर जलाशयाचे सोडण्यात आले आहे. पहिल्याच पाण्याने सिमेंट अस्तरीकरणाच्या कामांना भेगा पडल्या आहेत. सिमेंट अस्तरीकरणाचे काम निकृष्ट झाला असल्याचे बोलके चित्र या कालव्यावर दिसून आले आहे. जलाशयाचे पाणी मिळत नाही. टेलवरील शेतात पाणी पोहोचवण्याचा प्रयत्न फसला आहे. कालव्याची स्थिती 'जैसे थे' होणार आहे. 

कालव्याचे सिमेंट अस्तरीकरण पूर्ण झाल्यानंतर गुणवत्ता तपासली जात नाही? हा खरा प्रश्न आहे. अनेक कालवे आणि नहराला भगदाड पडले आहे. अलीकडे चांदपूर गावातच मुख्य उजवा कालवा फुटला होता. सिमेंट अस्तरीकरणाचान उपयोग नसल्याचा प्रसंग निदर्शनास आला होता.

आऊटलेटचे दरवाजे उघडेखरीप आणि रब्बी हंगामात जलाशयाचे पाणी सोडण्यात आल्यानंतर आऊटलेटची भूमिका महत्त्वपूर्ण राहत आहे. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी आऊटलेटचे महत्त्व वाढत आहे. शेतीला सिंचित करताना पाणी शेतात पूर्ण होताच आऊटलेट बंद करण्यात येत आहे. यामुळे अतिरिक्त पाणी नाल्यात जात नाही. परंतु आऊटलेटचे दरवाजे खुले असल्याने पाण्याचा अपव्यय होत आहे.

टॅग्स :bhandara-acभंडारा