शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
3
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
4
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
5
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
6
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
7
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
8
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
9
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
10
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
11
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
12
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
13
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
14
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
15
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
16
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
17
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
18
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
19
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
20
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...

रोजगार हमीच्या नवीन कामांना ‘ब्रेक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 00:54 IST

निवडणूक आचार संहिता कालावधीत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या नवीन कामांना ब्रेक लागला आहे. जुनी मंजूर कामे वगळून नवीन कामांना जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी घेणे अनिवार्य आहे. या तांत्रिक अडचणीचा फटका रोजगार हमींच्या मजुरांना बसणार आहे.

ठळक मुद्देआचारसंहितेचा फटका : मजुरांचे स्थलांतरण

मोहन भोयर।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : निवडणूक आचार संहिता कालावधीत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या नवीन कामांना ब्रेक लागला आहे. जुनी मंजूर कामे वगळून नवीन कामांना जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी घेणे अनिवार्य आहे. या तांत्रिक अडचणीचा फटका रोजगार हमींच्या मजुरांना बसणार आहे. जिल्ह्यातील शेकडो मजूर कामाच्या शोधात परप्रांतात स्थालांतरित होत आहेत.भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघात निवडणूक ११ एप्रिल रोजी होत आहे. निवडणूक आयोगाने १० मार्चपासून आदर्श आचारसंहिता घोषित केली. सध्या उन्हाळा सुरु असून रोजगार हमी योजनेच्या कामे सुरु होण्याचा हा काळ गणला जातो. रोजगार हमी योजनेच्या कामाची मागणी ग्रामपंचायतस्तरावरुन करण्यात येते. त्याला मंजूरी प्राप्त झाली. अशी मंजुरी प्राप्त कामे निवडणूक आचार संहितेच्या काळात सुरु होण्यास अडचण नाही. परंतु नवीन रोजगार हमींची कामे सुरु करण्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांची मंजूरी आवश्यक असल्याचे निर्देश प्रत्येक तालुका खंडविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत. नवीन कामांना मंजूरी दिल्यावर याबाबत जिल्हाधिकाºयांनी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाºयांना कळविणे आवश्यक आहे.तुमसर तालुक्यात आचारसंहितेपूर्वी अनेक कामांना मंजूरी मिळाली आहे. अनेक कामे मंजूरीच्या प्रतीक्षेत असल्याची माहिती आहे. तांत्रिक अडचणीमुळे आचारसंहिता संपण्याची प्रतीक्षा येथे रोजगार हमी मजूरांना करावी लागणार आहे.लोकसभा निवडणुकीचा बिगूल मार्चमध्येच वाजणार हे प्रशासनाला माहिती होते. निवडणूक विभागाने महसूल प्रशासनाला तसे निर्देशही दिले असल्याची माहिती आहे. त्यामुळे रोजगार हमी कामांना मंजूरीकरिता निश्चितच घाई करण्याची गरज होती. मात्र प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. आता नवीन कामे सुरू करण्यासाठी तांत्रिक बाबींची पुर्तता करावी लागणार आहे. तुमसर तालुक्यासह जिल्ह्यातील शेतीचे कामे उन्हाळ्यामुळे मजुरांना मिळेनाशी झाली आहे. अनेक मजूर गाव सोडून परप्रांतात कामाला जाण्याच्या तयारीत आहेत. तर अनेकजण लगतच्या छत्तीगड राज्यात कामाच्या शोधात गेली आहेत. सर्वसामान्य रोजगार हमीच्या मजूरांना फटका बसता कामा नये, याकरिता नियोजन करण्याची गरज आहे. अन्यथा हाताला काम न मिळाल्यास मजूर रोजगाराकरिता गावातून पलायन करीतील. त्याचा परिणाम निवडणुकीवर निश्चित पडेल. मतदानाची टक्केवारी कमी होईल. रोजगार हमींची कामे नियमित सुरु राहावी. त्यास तांत्रिक अडचण येता कामे अशी मागणी होत आहे.आदर्श निवडणूक आचार संहिता नियमानुसार जूनी मंजूर कामे सुरु राहतील. नवीन कामांना जिल्हाधिकाºयांची मंजूरी आवश्यक आहे.-ए.पी. मोहोड, खंडविकास अधिकारी, तुमसरतुमसर पंचायत समिती कार्यालयाकडून सन २०१४ च्या पत्राचा आधार घेऊन नविन कामांना मंजूरी घ्यावी लागेल. जूनीच कामे केवळ सुरु राहतील असे सांगितले जात आहे. जुन्या पत्राचा कसा आधार घेतला जात आहे. याची चौकशी करण्यात यावी’’-हिरालाल नागपूर, रेंगेपार