शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांचा घटस्फोट, ७ वर्षांनी लग्न तुटले!
2
Wimbledon 2025 Final : अल्काराझची हॅटट्रिक हुकली! नंबर वन यानिक सिनरनं विम्बल्डन जेतेपद जिंकत रचला इतिहास
3
इंग्लंड: लंडनच्या साऊथएन्ड विमानतळावर मोठा अपघात! उड्डाणानंतर काही वेळातच विमानाला आग
4
मैत्रिणीला सोडायला गेलेली स्नेहा परत आलीच नाही; थेट यमुना नदीत सापडला मृतदेह; नेमकं काय घडलं?
5
अमरावती: पोलिसांनी उधळली तरुणाईची मद्य पार्टी ! अल्पवयीन मुला-मुलींसह १००-१५० जण ताब्यात
6
टीम इंडियासाठी सोपा वाटणारा पेपर झाला अवघड; ५८ धावांत ४ विकेट्स! KL राहुल एकटा पडला!
7
क्रॉसिंग गेटवर रेल्वेचे ‘झिरो अ‍ॅक्सिडेन्ट’चे लक्ष्य; मध्य रेल्वे नागपूर विभागात सुरक्षा मोहीम
8
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
9
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
10
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
11
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
12
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
13
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
14
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
15
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
16
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
17
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
18
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
19
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
20
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं

रोजगार हमीच्या नवीन कामांना ‘ब्रेक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 00:54 IST

निवडणूक आचार संहिता कालावधीत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या नवीन कामांना ब्रेक लागला आहे. जुनी मंजूर कामे वगळून नवीन कामांना जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी घेणे अनिवार्य आहे. या तांत्रिक अडचणीचा फटका रोजगार हमींच्या मजुरांना बसणार आहे.

ठळक मुद्देआचारसंहितेचा फटका : मजुरांचे स्थलांतरण

मोहन भोयर।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : निवडणूक आचार संहिता कालावधीत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या नवीन कामांना ब्रेक लागला आहे. जुनी मंजूर कामे वगळून नवीन कामांना जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी घेणे अनिवार्य आहे. या तांत्रिक अडचणीचा फटका रोजगार हमींच्या मजुरांना बसणार आहे. जिल्ह्यातील शेकडो मजूर कामाच्या शोधात परप्रांतात स्थालांतरित होत आहेत.भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघात निवडणूक ११ एप्रिल रोजी होत आहे. निवडणूक आयोगाने १० मार्चपासून आदर्श आचारसंहिता घोषित केली. सध्या उन्हाळा सुरु असून रोजगार हमी योजनेच्या कामे सुरु होण्याचा हा काळ गणला जातो. रोजगार हमी योजनेच्या कामाची मागणी ग्रामपंचायतस्तरावरुन करण्यात येते. त्याला मंजूरी प्राप्त झाली. अशी मंजुरी प्राप्त कामे निवडणूक आचार संहितेच्या काळात सुरु होण्यास अडचण नाही. परंतु नवीन रोजगार हमींची कामे सुरु करण्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांची मंजूरी आवश्यक असल्याचे निर्देश प्रत्येक तालुका खंडविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत. नवीन कामांना मंजूरी दिल्यावर याबाबत जिल्हाधिकाºयांनी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाºयांना कळविणे आवश्यक आहे.तुमसर तालुक्यात आचारसंहितेपूर्वी अनेक कामांना मंजूरी मिळाली आहे. अनेक कामे मंजूरीच्या प्रतीक्षेत असल्याची माहिती आहे. तांत्रिक अडचणीमुळे आचारसंहिता संपण्याची प्रतीक्षा येथे रोजगार हमी मजूरांना करावी लागणार आहे.लोकसभा निवडणुकीचा बिगूल मार्चमध्येच वाजणार हे प्रशासनाला माहिती होते. निवडणूक विभागाने महसूल प्रशासनाला तसे निर्देशही दिले असल्याची माहिती आहे. त्यामुळे रोजगार हमी कामांना मंजूरीकरिता निश्चितच घाई करण्याची गरज होती. मात्र प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. आता नवीन कामे सुरू करण्यासाठी तांत्रिक बाबींची पुर्तता करावी लागणार आहे. तुमसर तालुक्यासह जिल्ह्यातील शेतीचे कामे उन्हाळ्यामुळे मजुरांना मिळेनाशी झाली आहे. अनेक मजूर गाव सोडून परप्रांतात कामाला जाण्याच्या तयारीत आहेत. तर अनेकजण लगतच्या छत्तीगड राज्यात कामाच्या शोधात गेली आहेत. सर्वसामान्य रोजगार हमीच्या मजूरांना फटका बसता कामा नये, याकरिता नियोजन करण्याची गरज आहे. अन्यथा हाताला काम न मिळाल्यास मजूर रोजगाराकरिता गावातून पलायन करीतील. त्याचा परिणाम निवडणुकीवर निश्चित पडेल. मतदानाची टक्केवारी कमी होईल. रोजगार हमींची कामे नियमित सुरु राहावी. त्यास तांत्रिक अडचण येता कामे अशी मागणी होत आहे.आदर्श निवडणूक आचार संहिता नियमानुसार जूनी मंजूर कामे सुरु राहतील. नवीन कामांना जिल्हाधिकाºयांची मंजूरी आवश्यक आहे.-ए.पी. मोहोड, खंडविकास अधिकारी, तुमसरतुमसर पंचायत समिती कार्यालयाकडून सन २०१४ च्या पत्राचा आधार घेऊन नविन कामांना मंजूरी घ्यावी लागेल. जूनीच कामे केवळ सुरु राहतील असे सांगितले जात आहे. जुन्या पत्राचा कसा आधार घेतला जात आहे. याची चौकशी करण्यात यावी’’-हिरालाल नागपूर, रेंगेपार