शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत अर्थव्यवस्था? मग हा वाढीचा ७% वेग कोणाचा हो राष्ट्राध्यक्ष ट्रम्प? अरविंद पनगढियांचा पलटवार
2
राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.
3
उत्तरकाशीतून ६५० लोकांना बाहेर काढण्यात यश; ३०० लोक अजूनही अडकल्याची भीती, धरालीमध्ये बचावकार्य सुरू
4
Raksha Bandhan Shubh Muhurt: राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आणखी एक युद्ध संपवल्याचा दावा! ३७ वर्षांच्या युद्धाला मिळाला पूर्णविराम
6
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
7
सावत्र आईसुद्धा 'आई'च! तिलाही पेन्शनचा हक्क हवा : सर्वोच्च न्यायालय
8
स्टॅलिन म्हणाले, आम्ही केवळ तामिळ, इंग्रजी भाषा सुरू ठेवणार; केंद्राच्या एनईपीविरोधात राज्याचे नवे शैक्षणिक धोरण 
9
आजचे राशीभविष्य, ०९ ऑगस्ट २०२५:सुखद बातमी मिळेल, आनंदी राहाल! असा जाईल आजचा दिवस
10
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
11
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
12
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
13
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
14
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
15
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
16
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
17
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
18
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
19
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
20
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 

पवनी नगराची सीमावाढ हा ऐतिहासिक निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 01:23 IST

नगराच्या विकासासाठी सीमावाढ ही अत्यंत महत्त्वाची बाब होती. सीमावाढीमुळे शासन स्तरावरुन मोठया प्रमाणात निधीची उपलब्धता होवून नगरातील कित्येक कामे मार्गी लागणार आहेत.

ठळक मुद्देरामचंद्र अवसरे यांचे प्रतिपादन : नगरपालिका सभागृहात तातडीची सभा

ऑनलाईन लोकमतपवनी : नगराच्या विकासासाठी सीमावाढ ही अत्यंत महत्त्वाची बाब होती. सीमावाढीमुळे शासन स्तरावरुन मोठया प्रमाणात निधीची उपलब्धता होवून नगरातील कित्येक कामे मार्गी लागणार आहेत. एकशे पन्नास वर्षे पूर्ण झालेल्या नगरपरिषद साठी नगराची सीमावाढ हा ऐतिहासिक निर्णय आहे असे प्रतिपादन आमदार अ‍ॅड. रामचंद्र अवसरे यांनी केले.नगराच्या सीमावाढीची अधिसुचना प्रसिध्द झाल्यानंतर हर्षोल्लास साजरा करुन शासनाचे आभार व्यक्त करण्यासाठी न.प. सभागृहात तातडीची सभा आयोजित करण्यात आली. सभेत प्रमुख अतिथि म्हणून बोलतांना आ. अ‍ॅड. रामचंद्र अवसरे यांनी पक्ष निवडणूीपुरता असतो लोकप्रतिनिधींनी निवडणूकीनंतर सर्वांचे काम करावे असा माझा प्रामाणिक मत आहे. त्यामुळेच नगरविकास आघाडीची न.प. मध्ये सत्ता असूनही विकासकामासाठी मी सोबत आहे. नगरासाठी स्वच्छ व शुध्द पाणी पुरवठा योजना, भुयारी गटार योजना, भुयारी विद्युत पुरवठा योजना, पर्यटन व शैक्षणिक विकास तसेच पुरातन वस्तू संग्रहालय या लोकहिताच्या कामासाठी मी सदैव तत्पर आहे असे मत व्यक्त केले.याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रमुख अतिथी म्हणून आ. रामचंद्र अवसरे, नगराध्यक्षा पुनम काटेखाये, उपाध्यक्ष कमलाकर रायपूरकर, नगर विकास आघाडीचे अध्यक्ष विलासराव काटेखाये, मुख्याधिकारी माधुरी मडावी प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी बोलतांना विलासराव काटेखाये यांनी सव्वा वर्षापुर्वी नगर विकास आघाडीचे निवडणूक जाहिरनामा प्रसिध्द करुन दिलेल्या वचनांची पूर्तता करणे सुरु केले आहे. नगराची सीमा वाढ हा त्यापैकीच एक महत्वपूर्ण काम असल्याचे सांगून यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आ.अ‍ॅड़ रामचंद्र अवसरे, आ.डॉ. परिणय फुके यांचे मौलीक सहकार्य लाभल्याचे सांगून कृतज्ञता व्यक्त केली. उपाध्यक्ष कमलाकर रायपूरकर यांनी शैक्षणिक क्षेत्रात पवनीला कृषी महाविद्यालय व शासकीय तंत्र शिक्षण महाविद्यालयाची गरज असल्याचे मत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात नगराध्यक्षा पुनम काटेखाये यांनी नगराच्या विकासाचे पर्व सुरु झाले आहे. नगरात स्वच्छतेला महत्व दिले आता स्वच्छ व मुबलक पाणी पुरवठा करण्यासाइी प्रयत्न करणार असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी शहर काँगे्रसचे अध्यक्ष मनोहर उरकुडकर, नगरसेविका अनुराधा बुराडे, दिलीप वाणी, डॉ. भागवत आकरे, अशोक पारधी यांनी नगराचे सीमा वाढ प्रकरणी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याधिकारी माधुरी मडावी यांनी केले. संचालन अनिल धारगावे यांनी तर आभार शाखा अभियंता मंगेश बोंदरे यांनी मानले. सर्व नगरसेवक नगर विकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, व्यापारी बांधव व नागरिक यावेळी उपस्थित होते.