शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
2
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
3
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
4
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
5
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
6
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
7
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
8
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
9
'या' वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली; राज ठाकरेंनी सांगितली 'मनोमिलना'ची कथा
10
Christmas Sale 2025: स्मार्टफोन, कपडे आणि घरगुती उपकरणांवर सवलतींचा पाऊस; वर्षाच्या शेवटी कुठे आहेत बंपर ऑफर्स
11
युती होताच दाखवलं शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतरच पहिलं भाषण; भाजपनं राज ठाकरेंना डिवचलं
12
रोहितच्या शतकानं मन भरलं नाही! चाहत्याची थेट मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरला विनंती! आम्हाला...
13
नोकरी गेली तरी भीती नाही, तुमच्या कर्जाचा हप्ता आता विमा कंपनी भरेल; नक्की काय आहे प्रकरण?
14
उल्हासनगरात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांचा भाजपात प्रवेश
15
"आमचा हिंदुत्ववाद केवळ पूजापद्धतीवर आधारित नाही तर..."; CM फडणवीसांनी ठाकरे बंधूंना सुनावलं
16
मेष वार्षिक राशिभविष्य २०२६: 'आत्मिक शांती' आणि प्रगतीचे वर्ष; आव्हाने पेलून गाठता येणार यशाचे शिखर!
17
प्राजक्ताच्या स्वप्नातील राजकुमार आहे तरी कसा? लग्नासाठी तिची एकच अट; सिंगल राहण्यामागचं खरं कारण समोर
18
जालना महापालिकेत भाजपानं युती न केल्यास सर्व पर्याय खुले; शिंदेसेनेचे आमदार खोतकरांचा इशारा
19
Vijay Hazare Trophy : हिटमॅनचा हिट शो जारी! मुंबईच्या संघाकडून खेळण्यासाठी मैदानात उतरला अन्...
20
३१ डिसेंबरला उघडणार या वर्षाचा अखेरचा आयपीओ; प्राईज बँड ₹९०, पाहा GMP सह अनेक डिटेल्स
Daily Top 2Weekly Top 5

पवनी नगराची सीमावाढ हा ऐतिहासिक निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 01:23 IST

नगराच्या विकासासाठी सीमावाढ ही अत्यंत महत्त्वाची बाब होती. सीमावाढीमुळे शासन स्तरावरुन मोठया प्रमाणात निधीची उपलब्धता होवून नगरातील कित्येक कामे मार्गी लागणार आहेत.

ठळक मुद्देरामचंद्र अवसरे यांचे प्रतिपादन : नगरपालिका सभागृहात तातडीची सभा

ऑनलाईन लोकमतपवनी : नगराच्या विकासासाठी सीमावाढ ही अत्यंत महत्त्वाची बाब होती. सीमावाढीमुळे शासन स्तरावरुन मोठया प्रमाणात निधीची उपलब्धता होवून नगरातील कित्येक कामे मार्गी लागणार आहेत. एकशे पन्नास वर्षे पूर्ण झालेल्या नगरपरिषद साठी नगराची सीमावाढ हा ऐतिहासिक निर्णय आहे असे प्रतिपादन आमदार अ‍ॅड. रामचंद्र अवसरे यांनी केले.नगराच्या सीमावाढीची अधिसुचना प्रसिध्द झाल्यानंतर हर्षोल्लास साजरा करुन शासनाचे आभार व्यक्त करण्यासाठी न.प. सभागृहात तातडीची सभा आयोजित करण्यात आली. सभेत प्रमुख अतिथि म्हणून बोलतांना आ. अ‍ॅड. रामचंद्र अवसरे यांनी पक्ष निवडणूीपुरता असतो लोकप्रतिनिधींनी निवडणूकीनंतर सर्वांचे काम करावे असा माझा प्रामाणिक मत आहे. त्यामुळेच नगरविकास आघाडीची न.प. मध्ये सत्ता असूनही विकासकामासाठी मी सोबत आहे. नगरासाठी स्वच्छ व शुध्द पाणी पुरवठा योजना, भुयारी गटार योजना, भुयारी विद्युत पुरवठा योजना, पर्यटन व शैक्षणिक विकास तसेच पुरातन वस्तू संग्रहालय या लोकहिताच्या कामासाठी मी सदैव तत्पर आहे असे मत व्यक्त केले.याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रमुख अतिथी म्हणून आ. रामचंद्र अवसरे, नगराध्यक्षा पुनम काटेखाये, उपाध्यक्ष कमलाकर रायपूरकर, नगर विकास आघाडीचे अध्यक्ष विलासराव काटेखाये, मुख्याधिकारी माधुरी मडावी प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी बोलतांना विलासराव काटेखाये यांनी सव्वा वर्षापुर्वी नगर विकास आघाडीचे निवडणूक जाहिरनामा प्रसिध्द करुन दिलेल्या वचनांची पूर्तता करणे सुरु केले आहे. नगराची सीमा वाढ हा त्यापैकीच एक महत्वपूर्ण काम असल्याचे सांगून यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आ.अ‍ॅड़ रामचंद्र अवसरे, आ.डॉ. परिणय फुके यांचे मौलीक सहकार्य लाभल्याचे सांगून कृतज्ञता व्यक्त केली. उपाध्यक्ष कमलाकर रायपूरकर यांनी शैक्षणिक क्षेत्रात पवनीला कृषी महाविद्यालय व शासकीय तंत्र शिक्षण महाविद्यालयाची गरज असल्याचे मत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात नगराध्यक्षा पुनम काटेखाये यांनी नगराच्या विकासाचे पर्व सुरु झाले आहे. नगरात स्वच्छतेला महत्व दिले आता स्वच्छ व मुबलक पाणी पुरवठा करण्यासाइी प्रयत्न करणार असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी शहर काँगे्रसचे अध्यक्ष मनोहर उरकुडकर, नगरसेविका अनुराधा बुराडे, दिलीप वाणी, डॉ. भागवत आकरे, अशोक पारधी यांनी नगराचे सीमा वाढ प्रकरणी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याधिकारी माधुरी मडावी यांनी केले. संचालन अनिल धारगावे यांनी तर आभार शाखा अभियंता मंगेश बोंदरे यांनी मानले. सर्व नगरसेवक नगर विकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, व्यापारी बांधव व नागरिक यावेळी उपस्थित होते.