शहरं
Join us  
Trending Stories
1
Shiv Sena UBT MNS Alliance: सध्या मुंबईपुरती उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा, जागावाटपावर सस्पेन्स; इतर महापालिकांचे काय?
2
काँग्रेस-उद्धवसेनेचे फाटले! उद्धव ठाकरेंनी 'मविआ'च्या शक्यतांना दिला पूर्ण विराम, पवारांच्या राष्ट्रवादीबद्दल काय बोलले?
3
आता जर चुकाल तर संपाल, मराठी माणसांना आवाहन; उद्धवसेना-मनसे युतीची अधिकृत घोषणा
4
Vijay Hazare Trophy: कॅप्टनची वैभवपेक्षा जलद सेंच्युरी! बिहारनं ५७४ धावांसह सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
5
H-1B व्हिसा आता 'मेरिट'वर! १ लाख डॉलर अतिरिक्त फी अन् पगाराची अट; पाहा काय आहे नवीन नियम
6
Eclipse 2026: २०२६ मध्ये ४ ग्रहणांची मालिका, विशेषतः होळीला चंद्रग्रहण वेधणार जगाचं लक्ष?
7
"नेमके कशासाठी आज घालताय एकमेकांच्या गळ्यात गळे?"; युती होताच भाजपाचा खोचक सवाल
8
...म्हणून उद्धव आणि राज ठाकरेंनी जागावाटप, उमेदवार याबाबत काहीच घोषणा केली नाही; कारण सांगताच सगळे हसले
9
२६ डिसेंबरपासून आणखी एका कंपनीचा IPO उघडणार; आतापासून GMP ₹१२५ वर, कोणती आहे कंपनी?
10
Shiv Sena UBT & MNS Alliance: 'शिवतीर्थ'वर राज-उद्धव! बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर संपूर्ण ठाकरे कुटुंबाचं अभिवादन
11
शिवसेनेनं 'करून दाखवलं', मनसेचं 'इंजिन' घसरलं! पाहा, मागील दोन निवडणुकांमध्ये नेमकं काय घडलं?
12
अतिश्रीमंतांचा 'आक्रमक' गुंतवणुकीवर भर! 'या' क्षेत्रात लावतात ७०% पैसे; सोन्याकडे मात्र पाठ
13
IND W vs SL W: भारताच्या 'लेडी सेहवाग'चा मोठा पराक्रम; स्मृती मानधना, दिप्ती शर्मा, जेमिमालाही टाकलं मागं!
14
'आम्ही भारतातील सर्वात मोठे फरार', ललित मोदी आणि विजय मल्ल्या यांचा सरकारवर हल्लाबोल; व्हिडीओ व्हायरल
15
सोने-चांदी-हिरे काही कमी नाही, राममूर्ती घडवायला दिले ३० कोटी; अयोध्येतील राम मंदिराला भेट दिली
16
कुणीही एकत्र आले तरी मुंबईत भाजपाचा महापौर बसेल; मंत्री बावनकुळेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा
17
फास्ट फूडमुळे खरंच झाला विद्यार्थिनीचा मृत्यू? डॉक्टर आणि कुटुंबीयांनी सांगितलं धक्कादायक 'सत्य'
18
DCM शिंदे पोहोचले बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर; ठाकरे बंधूंच्या यूतीपूर्वी घडामोडींना वेग
19
बांग्लादेशात हिंदूंवरील अत्याचार वाढले; चिटगावमध्ये कट्टरतावाद्यांनी हिंदूंची घरे जाळली
20
Vijay Hazare Trophy स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात वैभव सूर्यवंशीचा धमाका! वादळी शतकासह रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

बोगस बियाण्याने धान उत्पादक अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2019 06:00 IST

भंडारा हा प्रमुख धान उत्पादक जिल्हा आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला शेतकऱ्यांनी विविध केंद्रातून धान बीज विकत घेतले. पऱ्हे टाकून लागवड केली. एकरी २० ते २५ हजार रुपये खर्च केला. यात अनेक जण कर्जबाजारी झाले. मात्र धानपीक चांगले येईल, कर्ज फिटेल अशी आशा शेतकऱ्यांना होती. परंतु आता धान निसवण्याच्या वेळी आपली फसवणूक झाल्याचे शेतकऱ्यांच्या लक्षात येत आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांची फसवणूक : कृषी विभागासह मुख्यमंत्र्यांकडे तक्रार, नुकसान भरपाई देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शेतकऱ्यांनी पदरमोड करत विकत घेतलेले धानाचे बियाणे बोगस निघत असल्याच्या तक्रारीत वाढ झाली आहे. जून महिन्यात रोवणी झालेल्या धानाला आता ओफळ ओंब्या लागत आहेत. शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली असून याबाबत कृषी अधिकाऱ्यांसह मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्यात आली.भंडारा हा प्रमुख धान उत्पादक जिल्हा आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला शेतकऱ्यांनी विविध केंद्रातून धान बीज विकत घेतले. पऱ्हे टाकून लागवड केली. एकरी २० ते २५ हजार रुपये खर्च केला. यात अनेक जण कर्जबाजारी झाले. मात्र धानपीक चांगले येईल, कर्ज फिटेल अशी आशा शेतकऱ्यांना होती. परंतु आता धान निसवण्याच्या वेळी आपली फसवणूक झाल्याचे शेतकऱ्यांच्या लक्षात येत आहे. निसवण्याच्या वेळी धान तिसर, चौसर निसवत असून यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.विनोद भोपे या शेतकऱ्याने एका कंपनीचे बियाणे विकत घेतले. ते बियाणे बोगस निघाल्याचे लक्षात आले. याबाबत त्यांनी कृषी विभागाकडे तक्रार केली. परंतु अद्यापही कोणतीही कारवाई झाली नाही. पांजरा येथील शेतकरी सुरेश रामटेके यांनी विकत घेतलेले बियाणेही असेच बोगस निघाले. देवधान सहा एकरात कसा तयार झाला याची तक्रार मोहाडी कृषी अधिकाऱ्यांकडे केली. नेरी येथील शेतकरी अख्तरबेग मिर्जा यांच्या शेतातसुद्धा बनावट धान उगवले. खमाटा येथील अनेक शेतकऱ्यांनाही असाच अनुभव आहे. याबाबत शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रारी केल्या. परंतु कृषी कार्यालयातील अधिकारी शेतकऱ्यांनाच दोष देत आहेत. शेतकºयांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होऊनही कृषी विभाग कोणतीच कारवाई करीत नसल्याने शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समितीने मुख्यमंत्री, कृषीमंत्री आणि निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. यावेळी जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर भिवगडे, कार्याध्यक्ष विष्णूदास लोणारे, अख्तरबेग मिर्झा, विनोद भोपे, सुरेश रामटेके, प्रमोद एंलजवार, ज्ञानेश्वर निकुरे आदी उपस्थित होते. बोगस धान विकणाºया कंपनी आणि कृषी केंद्रावर कारवाई करून नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली.कृषी केंद्र चालकांना अभय कुणाचे?जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बोगस बियाणे निघाल्याच्या तक्रारी आहेत. परंतु कृषी विभाग याबाबत बोलायलाही तयार नाही. शेतकरी तक्रार घेऊन जातात, परंतु त्यांना उडवाउडवीचे उत्तरे दिली जातात. कृषी विभागाचे अधिकारी आणि कृषी केंद्र संचालकांचे साटेलोटे सर्वांनाच माहित आहे. यामुळेच कुणी कारवाईसाठी पुढे येत नाही. जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयही डोळ्यावर पट्टी बांधून असल्यासारखे दिसत आहेत. यात शेतकºयांचा मात्र जीव जात आहे.

टॅग्स :agricultureशेती