शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
3
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
4
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
5
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
6
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
7
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
8
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
9
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
10
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
11
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
12
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
13
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
14
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
15
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
16
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
17
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
18
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
19
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
20
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  

बोगस बियाण्याने धान उत्पादक अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2019 06:00 IST

भंडारा हा प्रमुख धान उत्पादक जिल्हा आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला शेतकऱ्यांनी विविध केंद्रातून धान बीज विकत घेतले. पऱ्हे टाकून लागवड केली. एकरी २० ते २५ हजार रुपये खर्च केला. यात अनेक जण कर्जबाजारी झाले. मात्र धानपीक चांगले येईल, कर्ज फिटेल अशी आशा शेतकऱ्यांना होती. परंतु आता धान निसवण्याच्या वेळी आपली फसवणूक झाल्याचे शेतकऱ्यांच्या लक्षात येत आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांची फसवणूक : कृषी विभागासह मुख्यमंत्र्यांकडे तक्रार, नुकसान भरपाई देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शेतकऱ्यांनी पदरमोड करत विकत घेतलेले धानाचे बियाणे बोगस निघत असल्याच्या तक्रारीत वाढ झाली आहे. जून महिन्यात रोवणी झालेल्या धानाला आता ओफळ ओंब्या लागत आहेत. शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली असून याबाबत कृषी अधिकाऱ्यांसह मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्यात आली.भंडारा हा प्रमुख धान उत्पादक जिल्हा आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला शेतकऱ्यांनी विविध केंद्रातून धान बीज विकत घेतले. पऱ्हे टाकून लागवड केली. एकरी २० ते २५ हजार रुपये खर्च केला. यात अनेक जण कर्जबाजारी झाले. मात्र धानपीक चांगले येईल, कर्ज फिटेल अशी आशा शेतकऱ्यांना होती. परंतु आता धान निसवण्याच्या वेळी आपली फसवणूक झाल्याचे शेतकऱ्यांच्या लक्षात येत आहे. निसवण्याच्या वेळी धान तिसर, चौसर निसवत असून यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.विनोद भोपे या शेतकऱ्याने एका कंपनीचे बियाणे विकत घेतले. ते बियाणे बोगस निघाल्याचे लक्षात आले. याबाबत त्यांनी कृषी विभागाकडे तक्रार केली. परंतु अद्यापही कोणतीही कारवाई झाली नाही. पांजरा येथील शेतकरी सुरेश रामटेके यांनी विकत घेतलेले बियाणेही असेच बोगस निघाले. देवधान सहा एकरात कसा तयार झाला याची तक्रार मोहाडी कृषी अधिकाऱ्यांकडे केली. नेरी येथील शेतकरी अख्तरबेग मिर्जा यांच्या शेतातसुद्धा बनावट धान उगवले. खमाटा येथील अनेक शेतकऱ्यांनाही असाच अनुभव आहे. याबाबत शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रारी केल्या. परंतु कृषी कार्यालयातील अधिकारी शेतकऱ्यांनाच दोष देत आहेत. शेतकºयांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होऊनही कृषी विभाग कोणतीच कारवाई करीत नसल्याने शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समितीने मुख्यमंत्री, कृषीमंत्री आणि निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. यावेळी जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर भिवगडे, कार्याध्यक्ष विष्णूदास लोणारे, अख्तरबेग मिर्झा, विनोद भोपे, सुरेश रामटेके, प्रमोद एंलजवार, ज्ञानेश्वर निकुरे आदी उपस्थित होते. बोगस धान विकणाºया कंपनी आणि कृषी केंद्रावर कारवाई करून नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली.कृषी केंद्र चालकांना अभय कुणाचे?जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बोगस बियाणे निघाल्याच्या तक्रारी आहेत. परंतु कृषी विभाग याबाबत बोलायलाही तयार नाही. शेतकरी तक्रार घेऊन जातात, परंतु त्यांना उडवाउडवीचे उत्तरे दिली जातात. कृषी विभागाचे अधिकारी आणि कृषी केंद्र संचालकांचे साटेलोटे सर्वांनाच माहित आहे. यामुळेच कुणी कारवाईसाठी पुढे येत नाही. जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयही डोळ्यावर पट्टी बांधून असल्यासारखे दिसत आहेत. यात शेतकºयांचा मात्र जीव जात आहे.

टॅग्स :agricultureशेती