शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

धान खरेदी केंद्रावर ‘हाऊसफुल्ल’चा बोर्ड

By admin | Updated: November 24, 2015 00:35 IST

लाखनी परिसरातील शेतकऱ्यांच्या धानाला हमीभाव मिळावा, यासाठी सेवा सहकारी संस्थेच्या माध्यमातून धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले.

शेतकऱ्यांची कोंडी : जागेअभावी खरेदी प्रक्रिया रखडली'मुखरू बागडे पालांदूरलाखनी परिसरातील शेतकऱ्यांच्या धानाला हमीभाव मिळावा, यासाठी सेवा सहकारी संस्थेच्या माध्यमातून धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. तीन दिवसात केंद्रावर धानाची आवक वाढल्यामुळे धान खरेदी केंद्रातील जागा धानाने व्यापल्यामुळे मार्केटींग फेडरेशनने शेतकऱ्यांना धान खरेदी केंद्रावर धान आणू नये, यासाठी केंद्र ‘हाऊसफुल्ल’ झाल्याचा फलक प्रवेशद्वारावर लावला आहे.लाखनी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील धान मळणी अंतिम टप्प्यात आली आहे. या धानाला खुल्या बाजारात विकताना व्यापाऱ्यांकडून आर्थिक कुचंबना होवू नये यासाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून पालांदूर येथे सेवा सहकारी संस्थेच्या सहकार्याने धान खरेदी केंद्र सुरू केले आहे. १९ नोव्हेंबरला धान खरेदी केंद्र सुरू केल्यानंतर परिसरातील शेतकऱ्यांनी या केंद्रावर मोठ्या प्रमाणात धान विक्रीसाठी आणले. मागील तीन दिवसात १६ शेतकऱ्यांकडून ५५६.२० क्विंटल धानाची खरेदी फेडरेशनने केली आहे. यासोबतच अन्य धान खरेदी इच्छुक शेतकऱ्यांचे धान केंद्रावर आले असता त्यांचे धान्य घेवून त्यांना टोकन देण्यात आले आहे. टोकन दिलेल्या धान्याची मोजणी व्हायची असल्याने केंद्राच्या परिसरात धान्याचा मोठ्या प्रमाणात साठा अस्ताव्यस्त पडलेला आहे. यामुळे धान खरेदी केंद्रावर येणाऱ्या नवीन शेतकऱ्यांच्या धान्यासाठी जागेचा अभाव जाणवू लागला आहे. मोठ्या प्रमाणात धान्याची आवक केंद्रावर वाढली असताना त्या तुलनेत केंद्राकडून आलेल्या धान्यांची मोजणी धीम्या गतीने सुरू आहे. सोबतच खरेदी केंद्राची संख्याही अत्यल्प असल्याने शेतकऱ्यांमध्ये त्यांचे धान्य मोजण्यासाठी चढाओढ लावित असल्याचे चित्र दिसून येत आहे. अनेक शेतकऱ्यांचे धान्य मोजणी व्हायचे असल्याने शेतकऱ्यांना रोज मोजणीअभावी घरी परतावे लागत आहे. त्यामुळे परिसरातील जेवनाळा, खराशी, किटाळी, देवरी (गोंदी), मऱ्हेगाव, खुनारी आदी गावात धान खरेदी केंद्र सुरू करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. यासोबतच प्रती हेक्टर २० क्विंटल धान्याची खरेदी मर्यादा वाढवून देणे शेतकऱ्यांच्या हिताची असल्याची मागणी होत आहे. व्यापाऱ्यांकडून आर्थिक कुचंबना होत असल्याने अनेकांनी खरेदी केंद्रावर धान्य विक्रीसाठी आणण्याचा पुढाकार घेतला आहे. धान्य विक्रीसाठी येत असताना फेडरेशनने त्यांच्याकडे असलेल्या गोडावून व्यतिरिक्त जागेची उपाययोजना अगोदरच करणे गरजेचे होते. मात्र गोडावूनची व्यवस्था करण्यात आली नसल्याने ही समस्या आवासून उभी आहे. फेडरेशनच्या माध्यमातून खरेदी होत असलेल्या धान्याला योग्य मोबदला मिळत असल्याने शेतकरी धान खरेदी केंद्राकडे धान विक्रीसाठी वळला आहे. मात्र जागेअभावी फेडरेशनची कोंढी होत असल्याने त्यांनी केंद्राच्या प्रवेशद्वारावर शेतकऱ्यांना नवीन धान्य आणण्यासाठी अटकाव करण्यासंबंधी फलक लावला आहे. यामुळे येथे विक्रीसाठी धान्य आणणाऱ्या शेतकऱ्यांसमोर पेच निर्माण झाला आहे.