शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

२ लाख ३० हजार नागरिकांचे घेतले रक्त नमुने

By admin | Updated: September 23, 2015 00:47 IST

अस्वच्छतेच्या व डासांच्या प्रकोपामुळे सर्वत्र आजाराचे थैमान आहे.

जिल्ह्यात ४६ मलेरिया रुग्ण : आरोग्य विभागाची उल्लेखनीय कामगिरी, कीटकजन्य आजारावर नियंत्रणभंडारा : अस्वच्छतेच्या व डासांच्या प्रकोपामुळे सर्वत्र आजाराचे थैमान आहे. जिल्हा हिवताप कार्यालयाने जानेवारी ते आॅगस्ट या आठ महिन्यात जिल्ह्यातील दोन लाख २९ हजार ८०४ नागरिकांचे रक्तनमुने घेतले. यात केवळ ४६ नागरिकांचे रक्त नमुने दूषित आढळून आले आहेत. जिल्ह्यातील आरोग्य विभाग विद्यार्थ्यांच्या सहकार्याने आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी उल्लेखनीय कार्य करित असल्याचे यावरून सिद्ध होते. दरवर्षी पावसाळ्यात विविध आजारांची मोठ्या प्रमाणात लागन होते. यात डेंग्यु, मलेरिया या आजारांचा मोठा सहभाग असतो. या आजार ग्रस्तांना औषधोपचार करताना आरोग्य विभागाची दमछाक होते. त्यामुळे यावर्षी आरोग्य विभागाने विशेष काळजी घेत या आजाराचा प्रकोप होणार नाही, याबाबत विशेष काळजी घेत आहेत. शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून डेंग्यु डासअळी शोध मोहिम राबवून वेळीच त्यावर नियंत्रण मिळविले. यामुळे मलेरियाची लागन झाल्याचा संशय घेऊन आरोग्य विभागाने सुमारे दोन लाख २९ हजार ८०४ नागरिकांचे रक्तनमुने घेतले असले तरी त्यात केवळ ४६ रुग्णांना याची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. यात प्लाझ्मोडियम व्हायवेक्सचे (पीव्ही) ३० रुग्ण तर फाल्सीफेरमचे (पीएफ) १६ रुग्ण असल्याचे स्पष्ट झाले आहे. आरोग्य विभागाने राबविलेल्या यंत्रणेमुळेच यावर्षी जिल्ह्यात मलेरियासह अन्य आजाराने डोके वर काढले नसल्याचे आरोग्य विभागाचा दावा आहे. भंडारा शहरातील ११ हजार ८३० रुग्णांची रक्त नमुना चाचणी घेतली. त्यात दोन रुग्ण पीव्हीचे आढळून आले. पवनी शहरातील ४३९९ तर तुमसर शहरातील ११ हजार ३२३ रुग्णांची रक्त नमुना चाचणी घेण्यात आली. या दोन्ही शहरात पीव्ही किंवा पीएफचे एकही रुग्ण आढळून आले नाही. यासोबतच सानगडी, गोंडउमरी व दिघोरी या आदीवासी क्षेत्रातील रुग्णालयात २० हजार ३३८ नागरिकांचे रक्त नमुने घेण्यात आले. त्यात दोन पीव्हीचे रुग्ण तर चार पीएफचे रुग्ण असल्याचे रक्त नमुने तपासणीत सिद्ध झाले. जिल्ह्यात २०१० मध्ये चेंडीपुरा या आजाराची लागण झाली होती. यात ३१ रुग्णांना ही लागण झाल्याचे रक्त नमुना चाचणीतून स्पष्ट झाले होते. त्यानंतर या आजारावर आरोग्य विभागाने नियंत्रण मिळविण्यात यश मिळविले आहे. (शहर प्रतिनिधी)चार वर्षात कीटकजन्य आजाराने १५ जणांचा मृत्यूमलेरिया विभागाने व्हॉयलर इंसेफलायटिस्ट या प्रकाराच्या आजाराने जडलेल्या रुग्णांची रक्त नमुना चाचणी घेतली. यात २०११ ते १४ या चार वर्षात १५ रुग्णांचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. २०११ मध्ये पाच रुग्णांना त्याची लागण झाली होती. त्यात तिघांचा मृत्यू झाला. १२ मध्ये २१ जणांना लागण तर ८ जणांचा मृत्यू. २०१३ मध्ये दोन जणांना लागण व दोघांचाही मृत्यू तर २०१४ मध्ये पाच जणांना लागण तर दोघांचा मृत्यू झाला. यावर्षी आजाराची गंभीर परिस्थिती नसल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे.पावसाळ्याच्या दिवसात कीटकजन्य आजारासाठी पोषक वातावरण असते. पुढील दोन महिन्यात हिवतापाच्या किटकांसाठी हे वातावरण निर्माण होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून परिसरातील स्वच्छता ठेवावी.- डॉ.आर.डी. झलकेप्रभारी जिल्हा हिवताप अधिकारी, भंडारा.