शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
2
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
3
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
4
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
5
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
6
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
7
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
8
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
9
TCS ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार? आयटी कर्मचारी संघटनेच्या दाव्याने खळबळ
10
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
11
आपण सगळेच Bisexual! हे काय बोलली स्वरा भास्कर? म्हणते- "मला डिंपल यादव आवडतात..."
12
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
13
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
14
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
15
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
16
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
17
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
18
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
19
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
20
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!

२ लाख ३० हजार नागरिकांचे घेतले रक्त नमुने

By admin | Updated: September 23, 2015 00:47 IST

अस्वच्छतेच्या व डासांच्या प्रकोपामुळे सर्वत्र आजाराचे थैमान आहे.

जिल्ह्यात ४६ मलेरिया रुग्ण : आरोग्य विभागाची उल्लेखनीय कामगिरी, कीटकजन्य आजारावर नियंत्रणभंडारा : अस्वच्छतेच्या व डासांच्या प्रकोपामुळे सर्वत्र आजाराचे थैमान आहे. जिल्हा हिवताप कार्यालयाने जानेवारी ते आॅगस्ट या आठ महिन्यात जिल्ह्यातील दोन लाख २९ हजार ८०४ नागरिकांचे रक्तनमुने घेतले. यात केवळ ४६ नागरिकांचे रक्त नमुने दूषित आढळून आले आहेत. जिल्ह्यातील आरोग्य विभाग विद्यार्थ्यांच्या सहकार्याने आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी उल्लेखनीय कार्य करित असल्याचे यावरून सिद्ध होते. दरवर्षी पावसाळ्यात विविध आजारांची मोठ्या प्रमाणात लागन होते. यात डेंग्यु, मलेरिया या आजारांचा मोठा सहभाग असतो. या आजार ग्रस्तांना औषधोपचार करताना आरोग्य विभागाची दमछाक होते. त्यामुळे यावर्षी आरोग्य विभागाने विशेष काळजी घेत या आजाराचा प्रकोप होणार नाही, याबाबत विशेष काळजी घेत आहेत. शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून डेंग्यु डासअळी शोध मोहिम राबवून वेळीच त्यावर नियंत्रण मिळविले. यामुळे मलेरियाची लागन झाल्याचा संशय घेऊन आरोग्य विभागाने सुमारे दोन लाख २९ हजार ८०४ नागरिकांचे रक्तनमुने घेतले असले तरी त्यात केवळ ४६ रुग्णांना याची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. यात प्लाझ्मोडियम व्हायवेक्सचे (पीव्ही) ३० रुग्ण तर फाल्सीफेरमचे (पीएफ) १६ रुग्ण असल्याचे स्पष्ट झाले आहे. आरोग्य विभागाने राबविलेल्या यंत्रणेमुळेच यावर्षी जिल्ह्यात मलेरियासह अन्य आजाराने डोके वर काढले नसल्याचे आरोग्य विभागाचा दावा आहे. भंडारा शहरातील ११ हजार ८३० रुग्णांची रक्त नमुना चाचणी घेतली. त्यात दोन रुग्ण पीव्हीचे आढळून आले. पवनी शहरातील ४३९९ तर तुमसर शहरातील ११ हजार ३२३ रुग्णांची रक्त नमुना चाचणी घेण्यात आली. या दोन्ही शहरात पीव्ही किंवा पीएफचे एकही रुग्ण आढळून आले नाही. यासोबतच सानगडी, गोंडउमरी व दिघोरी या आदीवासी क्षेत्रातील रुग्णालयात २० हजार ३३८ नागरिकांचे रक्त नमुने घेण्यात आले. त्यात दोन पीव्हीचे रुग्ण तर चार पीएफचे रुग्ण असल्याचे रक्त नमुने तपासणीत सिद्ध झाले. जिल्ह्यात २०१० मध्ये चेंडीपुरा या आजाराची लागण झाली होती. यात ३१ रुग्णांना ही लागण झाल्याचे रक्त नमुना चाचणीतून स्पष्ट झाले होते. त्यानंतर या आजारावर आरोग्य विभागाने नियंत्रण मिळविण्यात यश मिळविले आहे. (शहर प्रतिनिधी)चार वर्षात कीटकजन्य आजाराने १५ जणांचा मृत्यूमलेरिया विभागाने व्हॉयलर इंसेफलायटिस्ट या प्रकाराच्या आजाराने जडलेल्या रुग्णांची रक्त नमुना चाचणी घेतली. यात २०११ ते १४ या चार वर्षात १५ रुग्णांचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. २०११ मध्ये पाच रुग्णांना त्याची लागण झाली होती. त्यात तिघांचा मृत्यू झाला. १२ मध्ये २१ जणांना लागण तर ८ जणांचा मृत्यू. २०१३ मध्ये दोन जणांना लागण व दोघांचाही मृत्यू तर २०१४ मध्ये पाच जणांना लागण तर दोघांचा मृत्यू झाला. यावर्षी आजाराची गंभीर परिस्थिती नसल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे.पावसाळ्याच्या दिवसात कीटकजन्य आजारासाठी पोषक वातावरण असते. पुढील दोन महिन्यात हिवतापाच्या किटकांसाठी हे वातावरण निर्माण होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून परिसरातील स्वच्छता ठेवावी.- डॉ.आर.डी. झलकेप्रभारी जिल्हा हिवताप अधिकारी, भंडारा.