शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

शिक्षकांच्या कुटुंबीयांचे जिल्हाधिकाऱ्यांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 22:47 IST

मागील दोन वर्षापासून आंतरजिल्हा बदली अनियमिततेबाबत ५ जून रोजी सायंकाळी ५.१५ वाजता आंतरजिल्हा बदली अन्यायग्रस्त शिक्षकांच्या कुटुंबियांनी जिल्हा परिषद प्रशासनाकडून न्याय मिळत नसल्यामुळे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांची भेट घेऊन निवेदन दिले. या प्रकरणाबाबत जिल्हा परिषद दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप या अन्यायग्रस्त शिक्षकांच्या कुटुंबीयांनी केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : मागील दोन वर्षापासून आंतरजिल्हा बदली अनियमिततेबाबत ५ जून रोजी सायंकाळी ५.१५ वाजता आंतरजिल्हा बदली अन्यायग्रस्त शिक्षकांच्या कुटुंबियांनी जिल्हा परिषद प्रशासनाकडून न्याय मिळत नसल्यामुळे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांची भेट घेऊन निवेदन दिले. या प्रकरणाबाबत जिल्हा परिषद दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप या अन्यायग्रस्त शिक्षकांच्या कुटुंबीयांनी केला आहे.४ जूनपासून प्रहार शिक्षक संघटनाद्वारा आयोजित आंतरजिल्हा बदली अन्यायग्रस्त शिक्षकांचे जिल्हा परिषद भंडारा समोर आमरण उपोषण सुरु आहे. आंतरजिल्हा बदलीने भंडारा जिल्हा परिषदेला बदलून आलेल्या ११७ शिक्षकांच्या नियमबाह्य झालेल्या बदल्या रद्द करणे, २०१८ मध्ये जिल्हा परिषदेत शिक्षकांची १२३ पदे रिक्त असताना आॅनलाईन बदलीने दोनच पदे भरल्याने उर्वरीत पदावर विशेष बाबअंतर्गत बदली देण्यास्तव प्रशासनाने तातडीने कार्यवाही करणे या मागण्यांचा समावेश आहे. परंतु भंडारा जिल्हा परिषद प्रशासनाने कोणतीही कार्यवाही करत नसल्याचा आरोप करीत या शिक्षकांच्या कुटुंबियांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी यात लक्ष घालण्याचे आश्वासन आंतरजिल्हा बदली अन्यायग्रस्त शिक्षकांच्या कुटुंबियांना दिल्यानंतर ते परत उपोषण मंडपात आले. यात वंदना हटवार, खंडाळे, मदनकर, आदी कुटुंबियांनी सहभाग घेतला होता.