शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

‘सोशल’ भक्तांची अंध मुशाफिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 23:33 IST

काही वर्षापूर्वी चैनीची वस्तू असलेला मोबाईल आता जीवनावश्यक झाला आहे. आर्थिक व्यवहारापासून ते माहितीच्या आदानाप्रदानापर्यंत सर्वच मोबाईलवर होऊ लागले. मोबाईलच्या फायद्यासोबतच त्याच्या दुष्परिणामाचाही सामना करावा लागत आहे. सोशल मिडीयाचे तर अनेकांना जणू व्यसन लागले आहे. दररोज धडकणाऱ्या शेकडो संदेशाची खातरजमा न करता पुढे पाठवचा सपाटा सुरु आहे. सोशल भक्तांची ही अंध मुशाफिरी आता अनेकांसाठी डोकेदुखी ठरत आहे.

ठळक मुद्देपाठव पुढे : मॅसेजचा अहोरात्र धुमाकूळ

ज्ञानेश्वर मुंदे।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : काही वर्षापूर्वी चैनीची वस्तू असलेला मोबाईल आता जीवनावश्यक झाला आहे. आर्थिक व्यवहारापासून ते माहितीच्या आदानाप्रदानापर्यंत सर्वच मोबाईलवर होऊ लागले. मोबाईलच्या फायद्यासोबतच त्याच्या दुष्परिणामाचाही सामना करावा लागत आहे. सोशल मिडीयाचे तर अनेकांना जणू व्यसन लागले आहे. दररोज धडकणाऱ्या शेकडो संदेशाची खातरजमा न करता पुढे पाठवचा सपाटा सुरु आहे. सोशल भक्तांची ही अंध मुशाफिरी आता अनेकांसाठी डोकेदुखी ठरत आहे.‘आज रात्री कॉस्मीक किरणांचा मारा होणार, मोबाईल बंद ठेवा’, ‘महत्वाची कागदपत्रे सापडली संबंधितांपर्यंत पोहचविण्यासाठी शेअर करा’, ‘मुलगा-मुलगी हरविली, आईवडीलांचा शोध घेण्यास मदत करा’ यासारखे संदेश व्हॉटस्अ‍ॅपवर तर जयहिंद लिखकर शेअर करे, चोरी छिपे आपका प्रोफाईल कोन देखता है, पुनर्जन्म में आप कौन थे, महाभारत के कोनसा पात्र आप थे अशा पोस्ट फेसबुकवर धडाधड येऊन पडतात. या प्रकाराला नागरिक बळी पडत आहेत.पूर्वी संवादाचे माध्यम असलेला मोबाईल आता गॅझेट्स झाला आहे. कोणतीही गोष्ट अवघ्या काही क्षणात मोबाईलवरून करणे शक्य झाले आहे. त्यातच अलिकडे विविध कंपन्यांचे अती स्वस्तातील डाटाचे पॅकेज त्याला हातभार लावत आहेत. प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आला आणि त्याने प्रत्येकाला भुरळ पाडली. फेसबुक आणि व्हॉटस्अ‍ॅप तर अनेकांचा श्वास झाला आहे. दर पाचदहा मिनिटांनी मोबाईलवर बोटे फिरवून आणि तासन्तास मोबाईलमध्ये मान खुपसून बसणारे दिसून येतात. जणू अनेकांना मोबाईलने आपल्या पाशात अडकविल्याचे दिसून येते.दररोज शेकडो मॅसेज व्हॉटस्अ‍ॅपवर धडकतात. त्यावर येणारे मॅसेज फॉरवर्ड करण्याचा प्रत्येक जण आनंद घेतो. परंतु अनेकदा कोणतीही खातरजमा न करता मॅसेज पाठविला जातो. त्यातून अनेकदा सामाजिक समस्या, सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या घटना घडतात. अनेक ठिकाणी गुन्हेही दाखल झाले आहेत. परंतु त्यातून कुणी शिक्षित झाला नाही. अलिकडे तर भीती निर्माण करणारे मॅसेजही येत आहेत. एकाच ग्रुपवर दहादा तोच तो मॅसेज फिरत राहतो. मॅसेजची सत्यता कुणीही पडताळत नाही. आपल्याला माहित झाले, दुसऱ्यांनाही माहित व्हावे म्हणून हा मॅसेज थेट फॉरवर्ड केला जातो. अलिकडे पाच पेक्षा अधिक मॅसेज फॉरवर्ड होत नाहीत. परंतु तरीही अनेक जण असे मॅसेज पाठवतच असतात. सोशल भक्तांची ही अंध मुशाफिरी भविष्यात एखादे कोणते मोठे संकट उभे करेल हे सांगता येत नाही.न वाचता मॅसेज करतात डिलीटप्रत्येकाच्या व्हॉटस्अ‍ॅपमध्ये किमान १० ग्रुप तरी असतात. प्रत्येक ग्रुपवर दिवसाला २० मॅसेज आले तरी दिवसाकाठी २०० मॅसेज धडकतात. त्यासोबतच इमेजेसही असतात. एका दिवशी २०० मॅसेज वाचण्यासाठी कुणालाही वेळ नसतो. मग सर्व मॅसेज एका बटनाने डिलीट केले जातात.