शहरं
Join us  
Trending Stories
1
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
2
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
3
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
4
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
5
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
6
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
7
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
8
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
9
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
10
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
11
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
12
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
13
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
14
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
15
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
16
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
17
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
18
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
19
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
20
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  

‘सोशल’ भक्तांची अंध मुशाफिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 23:33 IST

काही वर्षापूर्वी चैनीची वस्तू असलेला मोबाईल आता जीवनावश्यक झाला आहे. आर्थिक व्यवहारापासून ते माहितीच्या आदानाप्रदानापर्यंत सर्वच मोबाईलवर होऊ लागले. मोबाईलच्या फायद्यासोबतच त्याच्या दुष्परिणामाचाही सामना करावा लागत आहे. सोशल मिडीयाचे तर अनेकांना जणू व्यसन लागले आहे. दररोज धडकणाऱ्या शेकडो संदेशाची खातरजमा न करता पुढे पाठवचा सपाटा सुरु आहे. सोशल भक्तांची ही अंध मुशाफिरी आता अनेकांसाठी डोकेदुखी ठरत आहे.

ठळक मुद्देपाठव पुढे : मॅसेजचा अहोरात्र धुमाकूळ

ज्ञानेश्वर मुंदे।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : काही वर्षापूर्वी चैनीची वस्तू असलेला मोबाईल आता जीवनावश्यक झाला आहे. आर्थिक व्यवहारापासून ते माहितीच्या आदानाप्रदानापर्यंत सर्वच मोबाईलवर होऊ लागले. मोबाईलच्या फायद्यासोबतच त्याच्या दुष्परिणामाचाही सामना करावा लागत आहे. सोशल मिडीयाचे तर अनेकांना जणू व्यसन लागले आहे. दररोज धडकणाऱ्या शेकडो संदेशाची खातरजमा न करता पुढे पाठवचा सपाटा सुरु आहे. सोशल भक्तांची ही अंध मुशाफिरी आता अनेकांसाठी डोकेदुखी ठरत आहे.‘आज रात्री कॉस्मीक किरणांचा मारा होणार, मोबाईल बंद ठेवा’, ‘महत्वाची कागदपत्रे सापडली संबंधितांपर्यंत पोहचविण्यासाठी शेअर करा’, ‘मुलगा-मुलगी हरविली, आईवडीलांचा शोध घेण्यास मदत करा’ यासारखे संदेश व्हॉटस्अ‍ॅपवर तर जयहिंद लिखकर शेअर करे, चोरी छिपे आपका प्रोफाईल कोन देखता है, पुनर्जन्म में आप कौन थे, महाभारत के कोनसा पात्र आप थे अशा पोस्ट फेसबुकवर धडाधड येऊन पडतात. या प्रकाराला नागरिक बळी पडत आहेत.पूर्वी संवादाचे माध्यम असलेला मोबाईल आता गॅझेट्स झाला आहे. कोणतीही गोष्ट अवघ्या काही क्षणात मोबाईलवरून करणे शक्य झाले आहे. त्यातच अलिकडे विविध कंपन्यांचे अती स्वस्तातील डाटाचे पॅकेज त्याला हातभार लावत आहेत. प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आला आणि त्याने प्रत्येकाला भुरळ पाडली. फेसबुक आणि व्हॉटस्अ‍ॅप तर अनेकांचा श्वास झाला आहे. दर पाचदहा मिनिटांनी मोबाईलवर बोटे फिरवून आणि तासन्तास मोबाईलमध्ये मान खुपसून बसणारे दिसून येतात. जणू अनेकांना मोबाईलने आपल्या पाशात अडकविल्याचे दिसून येते.दररोज शेकडो मॅसेज व्हॉटस्अ‍ॅपवर धडकतात. त्यावर येणारे मॅसेज फॉरवर्ड करण्याचा प्रत्येक जण आनंद घेतो. परंतु अनेकदा कोणतीही खातरजमा न करता मॅसेज पाठविला जातो. त्यातून अनेकदा सामाजिक समस्या, सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या घटना घडतात. अनेक ठिकाणी गुन्हेही दाखल झाले आहेत. परंतु त्यातून कुणी शिक्षित झाला नाही. अलिकडे तर भीती निर्माण करणारे मॅसेजही येत आहेत. एकाच ग्रुपवर दहादा तोच तो मॅसेज फिरत राहतो. मॅसेजची सत्यता कुणीही पडताळत नाही. आपल्याला माहित झाले, दुसऱ्यांनाही माहित व्हावे म्हणून हा मॅसेज थेट फॉरवर्ड केला जातो. अलिकडे पाच पेक्षा अधिक मॅसेज फॉरवर्ड होत नाहीत. परंतु तरीही अनेक जण असे मॅसेज पाठवतच असतात. सोशल भक्तांची ही अंध मुशाफिरी भविष्यात एखादे कोणते मोठे संकट उभे करेल हे सांगता येत नाही.न वाचता मॅसेज करतात डिलीटप्रत्येकाच्या व्हॉटस्अ‍ॅपमध्ये किमान १० ग्रुप तरी असतात. प्रत्येक ग्रुपवर दिवसाला २० मॅसेज आले तरी दिवसाकाठी २०० मॅसेज धडकतात. त्यासोबतच इमेजेसही असतात. एका दिवशी २०० मॅसेज वाचण्यासाठी कुणालाही वेळ नसतो. मग सर्व मॅसेज एका बटनाने डिलीट केले जातात.