शहरं
Join us  
Trending Stories
1
'नोबेल समितीने शांती निवडण्याऐवजी राजकारण केलं', ट्रम्प यांना डावलताच 'व्हाईट हाऊस'चा थयथयाट
2
'भोसले घराण्यामुळे शिवरायांची प्रेरणा रुजली, म्हणूनच नागपुरच्या मातीतून संघाचा जन्म झाला', सरसंघचालक मोहन भागवत यांचं विधान
3
चीनचं अमेरिकेला जशास तसं प्रत्युत्तर; चिनी जहाजांवर शुल्क लादताच उचललं मोठं पाऊल!
4
NZ W vs BAN W: अखेर वर्ल्ड चॅम्पियन न्यूझीलंडनं भोपळा फोडला! बांगलादेशचा १०० धावांनी उडवला धुव्वा
5
केबिनमध्ये बोलावलं अन्...; दारूच्या नशेत डॉक्टराचे नात्यातील महिलेसोबत संतापजनक कृत्य
6
आशिया कपची ट्रॉफी भारताला मिळूच देणार नाही, मोहसीन नक्वींनी आता खेळली अशी चाल 
7
‘मला तुझ्याकडे बोलावून घे’, विरहाने व्याकूळ झालेल्या शेफाली जरीवालाच्या पतीची भावूक पोस्ट, चाहते चिंतित  
8
नवी मुंबई विमानतळाला आरएसएसच्या नेत्याचे नाव देण्याची तयारी; रोहित पवारांचा भाजपवर आरोप
9
आरोग्य सचिवांच्या दौऱ्यापूर्वीच दहा डॉक्टरांचे राजीनामास्त्र, सावंतवाडीतील आरोग्य क्षेत्रात खळबळ
10
Royal Enfield: आता घरबसल्या बूक करा रॉयल एनफील्ड, 'हे' मॉडेल्स ऑनलाइन खरेदीसाठी उपलब्ध!
11
'बगराम हवाई तळ देणार नाही, जर तुम्हाला आमच्यासोबत...'; अफगाणिस्तानच्या मंत्र्याचा ट्रम्प यांना 'मेसेज', पाकिस्तानलाही इशारा
12
प्रेमासाठी काय पण! पाकिस्तानी कपलने सीमा ओलांडून भारतात केला प्रवेश, 'अशी' झाली पोलखोल
13
लष्करात नेमणूक झाल्यावर भव्य मिरवणूक, जंगी स्वागत; सत्य समजताच सरकली पायाखालची जमीन
14
यशस्वी जयस्वालनं वेस्ट इंडिजला झोडलं, एकाच खेळीत मोडले अनेक मोठे विक्रम!
15
Maria Corina Machado: व्हेनेझुएलाची 'आयरन लेडी', शांततेचं नोबेल मिळालेल्या मारिया कोरिना मचाडो कोण आहेत?
16
आठ युद्धं थांबवली तरी पुरस्कार समितीने डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल का नाकारला? समोर येताहेत ही कारणं
17
"मुंबईतील भूखंड उद्योगपतींना कवडीमोल दराने देण्याचा महायुती सरकारचा सपाटा, तर सर्वसामन्यांच्या घरांकडे दुर्लक्ष’’, काँग्रेसचा आरोप
18
सात युद्धं थांबवल्याच्या 'बढाया' मारणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना ठेंगा; 'शांततेचं नोबेल' लोकशाहीवादी मारिया मचाडो यांना
19
IND vs WI 2nd Test Day 1 Stumps: 'ओपनिंग डे'ला टीम इंडियाचा 'यशस्वी' शो! साई सुदर्शनही चमकला; पण...
20
'बदला घेणारच'; भैय्या गायकवाडची शिवीगाळ करत धमकी, टोलनाक्यावर बेदम मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल

‘सोशल’ भक्तांची अंध मुशाफिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 23:33 IST

काही वर्षापूर्वी चैनीची वस्तू असलेला मोबाईल आता जीवनावश्यक झाला आहे. आर्थिक व्यवहारापासून ते माहितीच्या आदानाप्रदानापर्यंत सर्वच मोबाईलवर होऊ लागले. मोबाईलच्या फायद्यासोबतच त्याच्या दुष्परिणामाचाही सामना करावा लागत आहे. सोशल मिडीयाचे तर अनेकांना जणू व्यसन लागले आहे. दररोज धडकणाऱ्या शेकडो संदेशाची खातरजमा न करता पुढे पाठवचा सपाटा सुरु आहे. सोशल भक्तांची ही अंध मुशाफिरी आता अनेकांसाठी डोकेदुखी ठरत आहे.

ठळक मुद्देपाठव पुढे : मॅसेजचा अहोरात्र धुमाकूळ

ज्ञानेश्वर मुंदे।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : काही वर्षापूर्वी चैनीची वस्तू असलेला मोबाईल आता जीवनावश्यक झाला आहे. आर्थिक व्यवहारापासून ते माहितीच्या आदानाप्रदानापर्यंत सर्वच मोबाईलवर होऊ लागले. मोबाईलच्या फायद्यासोबतच त्याच्या दुष्परिणामाचाही सामना करावा लागत आहे. सोशल मिडीयाचे तर अनेकांना जणू व्यसन लागले आहे. दररोज धडकणाऱ्या शेकडो संदेशाची खातरजमा न करता पुढे पाठवचा सपाटा सुरु आहे. सोशल भक्तांची ही अंध मुशाफिरी आता अनेकांसाठी डोकेदुखी ठरत आहे.‘आज रात्री कॉस्मीक किरणांचा मारा होणार, मोबाईल बंद ठेवा’, ‘महत्वाची कागदपत्रे सापडली संबंधितांपर्यंत पोहचविण्यासाठी शेअर करा’, ‘मुलगा-मुलगी हरविली, आईवडीलांचा शोध घेण्यास मदत करा’ यासारखे संदेश व्हॉटस्अ‍ॅपवर तर जयहिंद लिखकर शेअर करे, चोरी छिपे आपका प्रोफाईल कोन देखता है, पुनर्जन्म में आप कौन थे, महाभारत के कोनसा पात्र आप थे अशा पोस्ट फेसबुकवर धडाधड येऊन पडतात. या प्रकाराला नागरिक बळी पडत आहेत.पूर्वी संवादाचे माध्यम असलेला मोबाईल आता गॅझेट्स झाला आहे. कोणतीही गोष्ट अवघ्या काही क्षणात मोबाईलवरून करणे शक्य झाले आहे. त्यातच अलिकडे विविध कंपन्यांचे अती स्वस्तातील डाटाचे पॅकेज त्याला हातभार लावत आहेत. प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आला आणि त्याने प्रत्येकाला भुरळ पाडली. फेसबुक आणि व्हॉटस्अ‍ॅप तर अनेकांचा श्वास झाला आहे. दर पाचदहा मिनिटांनी मोबाईलवर बोटे फिरवून आणि तासन्तास मोबाईलमध्ये मान खुपसून बसणारे दिसून येतात. जणू अनेकांना मोबाईलने आपल्या पाशात अडकविल्याचे दिसून येते.दररोज शेकडो मॅसेज व्हॉटस्अ‍ॅपवर धडकतात. त्यावर येणारे मॅसेज फॉरवर्ड करण्याचा प्रत्येक जण आनंद घेतो. परंतु अनेकदा कोणतीही खातरजमा न करता मॅसेज पाठविला जातो. त्यातून अनेकदा सामाजिक समस्या, सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या घटना घडतात. अनेक ठिकाणी गुन्हेही दाखल झाले आहेत. परंतु त्यातून कुणी शिक्षित झाला नाही. अलिकडे तर भीती निर्माण करणारे मॅसेजही येत आहेत. एकाच ग्रुपवर दहादा तोच तो मॅसेज फिरत राहतो. मॅसेजची सत्यता कुणीही पडताळत नाही. आपल्याला माहित झाले, दुसऱ्यांनाही माहित व्हावे म्हणून हा मॅसेज थेट फॉरवर्ड केला जातो. अलिकडे पाच पेक्षा अधिक मॅसेज फॉरवर्ड होत नाहीत. परंतु तरीही अनेक जण असे मॅसेज पाठवतच असतात. सोशल भक्तांची ही अंध मुशाफिरी भविष्यात एखादे कोणते मोठे संकट उभे करेल हे सांगता येत नाही.न वाचता मॅसेज करतात डिलीटप्रत्येकाच्या व्हॉटस्अ‍ॅपमध्ये किमान १० ग्रुप तरी असतात. प्रत्येक ग्रुपवर दिवसाला २० मॅसेज आले तरी दिवसाकाठी २०० मॅसेज धडकतात. त्यासोबतच इमेजेसही असतात. एका दिवशी २०० मॅसेज वाचण्यासाठी कुणालाही वेळ नसतो. मग सर्व मॅसेज एका बटनाने डिलीट केले जातात.