शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

शेतकऱ्यांना सातबारा कोरा करा

By admin | Updated: March 28, 2017 00:16 IST

राज्य व केंद्र सरकारच्या धोरणाने सर्वसामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे. शेतकऱ्यांच्या धानाला भाव नाही.

काँग्रेसची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनभंडारा : राज्य व केंद्र सरकारच्या धोरणाने सर्वसामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे. शेतकऱ्यांच्या धानाला भाव नाही. त्यामुळे अनेक शेतकरी आत्महत्या करीत आहेत. ‘अच्छे दिन’ चे स्वप्न दाखवणाऱ्या भाजपाने आश्वासन पाळले नाही. त्यामुळे सर्वसामान्य माणूस हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा अशी मागणी जिल्हा काँग्रेस कमेटीच्या वतीने करण्यात आली. याचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांना दिले आहे.दुष्काळजन्य परिस्थिती उद्भवल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांना कर्ज भरणे अशक्य आहे. या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची घोषणा भाजपाने केली पाहिजे. पण सरकारने कर्ज माफी केली नाही. अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी तरतूद केली नाही. सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे, वीज देयके माफ करावीत, आगामी हंगामासाठी मोफत खते, बि - बियाणे उपलब्ध करून द्यावीत, नवीन हंगामाकरिता कर्ज उपलब्ध करून घ्यावे, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनानुसार, महावितरणाने गेल्या काही महिन्याच्या वीज बिलांमध्ये विविध प्रकारचे चार अतिरिक्त वीज अधिभार या नावाखाली लावले आहेत. विशेष म्हणजे हे अधिभार इतके अधिक आहेत की सामान्य ग्राहकांचे कंबरडे मोडणारे आहे. नव्या १६ टक्के वीज शुल्क हा नवीन कर लादण्यात आला. या दरवाढीमुळे सर्वांना अतिरिक्त दरवाढीचा बोजा सहन करावा लागत आहे. हा अतिरिक्त अधिभार त्वरीत रद्द करण्यात यावा.पेट्रोलच्या व डिझेलच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. सरकारने सदर दरवाढीवर नियंत्रण आणून दरवाढ रद्द करावी. सबसिडीमध्ये घोळ घातला जातो. म्हणून सबसिडी थेट बँक खात्यात जमा करण्याचे आश्वासन दिले आणि त्याची पहिली कारवाई झाली ती घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरवर. विनाअनुदानित एलपीजी सिलेंडरचे दर ८६ रुपयांनी वाढल्याने सर्वसामान्य आर्थिक बोझा पडला आहे. २०१६ पासून आतापर्यंत गॅस सिलेंडरच्या दरात सहा वेळा वाढ झाली आहे. तेव्हापासून आतापर्यंत म्हणजे मागील सहा - सात महिन्यात गॅस सिलेंडर २७१ रुपयांनी महागला आहे. नोटाबंदीमुळे बाजारात चलनटंचाई निर्माण झाली. बाजारातील उलाढालीमध्ये अट झाली. आर्थिक व्यवहार मंदावले. मागणी घटली. नोटाबंदीमुळे बेरोजगारी निर्माण झाली आहे. व्यापार उद्योग मंदावले आहेत. विशेषत: स्थलांतरीत कामगारांचे रोजगार गेले असून हे कामगार परत आपापल्या गावी जाऊ लागले आहेत. नोटाबंदीचा पहिला फटका स्थलांतरीत कामगारांना बसला आहे. निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे, जि.प. अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर, जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, माजी आमदार सेवक वाघाये , आनंदराव वंजारी, जिया पटेल, प्रमिला कुटे, प्रमोद तितीरमारे, मनोहर सिंगनजुडे, जि.प. सभापती विनायक बुरडे, मधुकर लिचडे, बशीर पटेल, सीमा भुरे, महेंद्र निंबार्ते, अरविंद कारेमोरे, धनराज साठवणे, भूषण टेंभुर्णे, सचिन घनमारे, राजकपूर राऊत, माणिकराव ब्राम्हणकर, नंदू समरीत, नंदू समरीत, प्रेम वनवे, निळकंठ कायते, प्यारेलाल वाघमारे, प्रभू मोहतुरे, सुनिल गिऱ्हेपुंजे, मनोहर उरकुडकर, भावना शेंडे, प्रशांत देशकर, प्रशांत सरोजकर, रजनी आत्राम आदींचा समावेश होता. (जिल्हा प्रतिनिधी)