शहरं
Join us  
Trending Stories
1
हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
2
रस्त्यावर भटके कुत्रे दिसले नाही पाहिजे, त्यांना..; सर्वोच्च न्यायालयाचे तीन मोठे आदेश
3
२०२६ हे पाकिस्तानसाठी 'प्रलयाचे वर्ष'? ज्योतिषांचा धक्कादायक अंदाज; भारतासोबत मोठ्या युद्धाचे संकेत...
4
Video - बॅकबेंचर ते चार्टर्ड अकाउंटंट... लेक CA होताच बापाने मारली घट्ट मिठी, डोळ्यांत आनंदाश्रू
5
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
6
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
7
नितीश कुमारांची डोकेदुखी वाढणार? वाढीव मतदानामुळे सत्तांतराची शक्यता? आकडे काय सांगतात?
8
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
9
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
10
Jara Hatke: पूजेत, धर्मकार्यात वापरला जाणारा पांढरा शुभ्र कापूर कसा तयार करतात माहितीय?
11
दूध आणायला जातो म्हणाला, १९ दिवसांनी मृतदेह सापडला; रशियात बेपत्ता झालेल्या भारतीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने राजस्थान हादरले
12
कार्तिक संकष्ट चतुर्थी २०२५: चंद्रोदयाची वेळ काय? ‘असे’ करा व्रत; राहु काळ, शुभ मुहूर्त पाहा
13
रणबीर-आलियाने धूमधडाक्यात साजरा केला राहाचा वाढदिवस, इनसाईड व्हिडीओही व्हायरल
14
Katrina Kaif-Vicky Kaushal Baby: गुडन्यूज! कतरिनाने दिला गोंडस बाळाला जन्म, विकी कौशलचा आनंद गगनात मावेना, म्हणाला...
15
अमेरिकेचा चीनला मोठा झटका! आणखी एका कंपनीने कामकाज केलं बंद; ४०० कर्मचाऱ्यांची नोकरी गेली
16
कमाईच नव्हे, दिवसाला ७ कोटी दानही ! 'हे' आहेत भारताचे टॉप 10 दानशूर; अंबानी, अदानी कितवे?
17
'मनी हाइस्ट' पाहून १५० कोटींची फसवणूक; लोकांना 'असं' अडकवायचे जाळ्यात, झाला पर्दाफाश
18
स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले...
19
"या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे..."; राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
20
Ambadas Danve : Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात

भाजप सरकारने शेतकऱ्यांवर अन्याय केला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 21:55 IST

निवडणुका आल्या की, भाजपला राम मंदिराची आठवण होते. हिंदू संस्कृतीत गाईला देवता मानले जाते. हे सत्य आहे. मात्र त्यावर काँग्रेसने कधीच राजकारण केले नाही. चार वर्षापासून धानाला भाव नाही, कर्जमाफी नाही. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे.

ठळक मुद्देअशोक चव्हाण : साकोलीत काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा

लोकमत न्युज नेटवर्कसाकोली : निवडणुका आल्या की, भाजपला राम मंदिराची आठवण होते. हिंदू संस्कृतीत गाईला देवता मानले जाते. हे सत्य आहे. मात्र त्यावर काँग्रेसने कधीच राजकारण केले नाही. चार वर्षापासून धानाला भाव नाही, कर्जमाफी नाही. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. भाजप सरकारने शेतकºयांवर सातत्याने अन्याय केला आहे. आता सत्ता परिवर्तनाची वेळ आली आहे, असे प्रतिपादन खासदार तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांनी केले.जनसंघर्ष यात्रेच्या साकोली शहरात आगमनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी मंत्री नसीम खान, विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, प्रफुल्ल गुडघे पाटील, मनोज दुआ, राजू वाघमारे, अनंतराव घरड, आ.गोपाल अग्रवाल, माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे, प्रदेश सचिव प्रमोद तितीरमारे, जिया पटेल, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, डॉ.अजय तुमसरे, सीमा भुरे, सभापती रेखा वासनिक, ताराबाई तरजुले, सविता ब्राम्हणकर, पं.स. सदस्य छाया पटले, तालुका अध्यक्ष नंदकिशोर समरीत, शहर अध्यक्ष अश्विन नशिने, रेखाताई समरीत, मनोज बागडे, प्रमिला कुटे, माजी सभापती केवळराम लांजेवार, अंजिरा चुटे, उमेश कठाणे, जिल्हा परिषद सदस्य अशोक कापगते व या संघर्ष यात्रेचे साकोलीचे आयोजक माजी आमदार सेवक वाघाये उपस्थित होते.धानाला प्रती क्विंटल २५०० रु. हमीभाव, सरसकट कर्जमाफी यासह अन्य मागण्यांना घेऊन कॉंग्रेसने राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रा काढण्यात आली. ही यात्रा होमगार्ड परेड ग्राऊंड साकोली येथे सायंकाळी पोहचली. या यात्रेला हजारोंच्या संख्येने शेतकरी व नागरिक उपस्थित होते. अशोकराव चव्हाण म्हणाले, दोन वर्षात जर सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा उभारला जाऊ शकतो तर राममंदिर का नाही? असा प्रश्न जनतेनीच आता सरकारला विचारला पाहिजे, महाराष्ट्राच्या सत्तेत असलेले भाजप सेना जरी एकमेकावर टीका करीत असले तरी दोन्ही पक्ष एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. असेही चव्हाण म्हणाले. यावेळी कार्यक्रमाला उमेश कठाणे, दिलीप मासूरकर, विजू दुबे, विनायक देशमुख, ओम गायकवाड, विष्णू रणदिवे, उमेश भुरे, मनोहर डोंगरे, हेमंत भारद्वाज, दीपक रामटेके व काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. संचालन शहर अध्यक्ष अश्विन नशिने यांनी तर आभार तालुका अध्यक्ष नंदू समरीत यांनी केले.वाघायेंची उमेदवारी पक्कीयात्रेदरम्यान प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण म्हणाले, ‘सेवकभाऊ’चिंता करू नका. येत्या विधानसभा निवडणुकीसाठी तुमची उमेदवारी निश्चित असून तुम्ही बिनधास्त कामाला लागा. असे सांगून सभेतच वाघाये यांची उमेदवारी निश्चित केली. त्यामुळे राजकीय वर्तूळात व काँग्रेसच्या गोटात चर्चा सुुरु झाली आहे.