शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

भाजप सरकारने शेतकऱ्यांवर अन्याय केला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 21:55 IST

निवडणुका आल्या की, भाजपला राम मंदिराची आठवण होते. हिंदू संस्कृतीत गाईला देवता मानले जाते. हे सत्य आहे. मात्र त्यावर काँग्रेसने कधीच राजकारण केले नाही. चार वर्षापासून धानाला भाव नाही, कर्जमाफी नाही. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे.

ठळक मुद्देअशोक चव्हाण : साकोलीत काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा

लोकमत न्युज नेटवर्कसाकोली : निवडणुका आल्या की, भाजपला राम मंदिराची आठवण होते. हिंदू संस्कृतीत गाईला देवता मानले जाते. हे सत्य आहे. मात्र त्यावर काँग्रेसने कधीच राजकारण केले नाही. चार वर्षापासून धानाला भाव नाही, कर्जमाफी नाही. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. भाजप सरकारने शेतकºयांवर सातत्याने अन्याय केला आहे. आता सत्ता परिवर्तनाची वेळ आली आहे, असे प्रतिपादन खासदार तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांनी केले.जनसंघर्ष यात्रेच्या साकोली शहरात आगमनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी मंत्री नसीम खान, विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, प्रफुल्ल गुडघे पाटील, मनोज दुआ, राजू वाघमारे, अनंतराव घरड, आ.गोपाल अग्रवाल, माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे, प्रदेश सचिव प्रमोद तितीरमारे, जिया पटेल, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, डॉ.अजय तुमसरे, सीमा भुरे, सभापती रेखा वासनिक, ताराबाई तरजुले, सविता ब्राम्हणकर, पं.स. सदस्य छाया पटले, तालुका अध्यक्ष नंदकिशोर समरीत, शहर अध्यक्ष अश्विन नशिने, रेखाताई समरीत, मनोज बागडे, प्रमिला कुटे, माजी सभापती केवळराम लांजेवार, अंजिरा चुटे, उमेश कठाणे, जिल्हा परिषद सदस्य अशोक कापगते व या संघर्ष यात्रेचे साकोलीचे आयोजक माजी आमदार सेवक वाघाये उपस्थित होते.धानाला प्रती क्विंटल २५०० रु. हमीभाव, सरसकट कर्जमाफी यासह अन्य मागण्यांना घेऊन कॉंग्रेसने राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रा काढण्यात आली. ही यात्रा होमगार्ड परेड ग्राऊंड साकोली येथे सायंकाळी पोहचली. या यात्रेला हजारोंच्या संख्येने शेतकरी व नागरिक उपस्थित होते. अशोकराव चव्हाण म्हणाले, दोन वर्षात जर सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा उभारला जाऊ शकतो तर राममंदिर का नाही? असा प्रश्न जनतेनीच आता सरकारला विचारला पाहिजे, महाराष्ट्राच्या सत्तेत असलेले भाजप सेना जरी एकमेकावर टीका करीत असले तरी दोन्ही पक्ष एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. असेही चव्हाण म्हणाले. यावेळी कार्यक्रमाला उमेश कठाणे, दिलीप मासूरकर, विजू दुबे, विनायक देशमुख, ओम गायकवाड, विष्णू रणदिवे, उमेश भुरे, मनोहर डोंगरे, हेमंत भारद्वाज, दीपक रामटेके व काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. संचालन शहर अध्यक्ष अश्विन नशिने यांनी तर आभार तालुका अध्यक्ष नंदू समरीत यांनी केले.वाघायेंची उमेदवारी पक्कीयात्रेदरम्यान प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण म्हणाले, ‘सेवकभाऊ’चिंता करू नका. येत्या विधानसभा निवडणुकीसाठी तुमची उमेदवारी निश्चित असून तुम्ही बिनधास्त कामाला लागा. असे सांगून सभेतच वाघाये यांची उमेदवारी निश्चित केली. त्यामुळे राजकीय वर्तूळात व काँग्रेसच्या गोटात चर्चा सुुरु झाली आहे.