शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
2
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
3
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
4
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
5
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
6
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
7
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
8
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
9
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
10
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
11
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
12
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
13
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
14
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
15
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
16
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
17
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
18
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
19
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
20
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."

अन्नाजीच्या तपोभूमीत जन्मोत्सव सोहळा

By admin | Updated: February 12, 2015 00:33 IST

संतमंळींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कान्ळगावच्या तपोभूमीत परमपूज्य अन्नाजी महाराज यांची ११४ वी जयंती उत्सव गुरूदेव सेवा मंडळ कान्हळगाव ....

राजू बांते मोहाडीसंतमंळींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कान्ळगावच्या तपोभूमीत परमपूज्य अन्नाजी महाराज यांची ११४ वी जयंती उत्सव गुरूदेव सेवा मंडळ कान्हळगाव व गावकऱ्यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला आहे.दीड हजार लोकवस्ती असणाऱ्या कान्हळगावात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, स्वामी सितारामदास महाराज, दामोधर महाराज, अन्नाजी महाराज, शंकर महाराज, सत्यपाल महाराज या संताचे विचार आजही कान्हळगावला चैतन्य व प्रेरणा देणारे आहेत. १९३४ साली अन्नाजी महाराजांनी गावकऱ्यांना भक्तीमार्गाकडे वळविले. अन्नाजींचे कान्हळगावात १४ वर्ष वास्तव्य होते. प्रितलाल सव्वालाखे, रामचंद्र नखाते, शामराव लिल्हारे, रामचंद्र कुकडकर, बळीराम लेदे, तुळशिराम बांते ही प्रमुखकर्ते मंडळी होती. १९४९ रोजी जातीय एकता निर्माण होण्यासाठी सहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. परिसरातील सर्वजाती धर्माचे लोक सहभोजनात त्या काळी सहभागी झाली होती. या स्तुत्य कार्याची दखल अधिकारी वर्गाने घेतली होती.भंडारा आताचा गोंदिया जिल्ह्यात सर्वप्रथम राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कान्हळगावात आले होते. अन्नाजी महाराज, स्वामी सितारामदास महाराज यांच्या सहयोगाने १९३६ मध्ये राष्ट्रसंताचे पाय कान्हळगावात पडले होते. यावेळी भव्य महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी राष्ट्रसंताच्या भजनाचा आस्वाद परिसरातील जनतेला घेता आला होता. स्वच्छता, अस्पृश्यता, अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावर राष्ट्रसंताची भजने झाली होती. गावात पुन्हा नवचैतन्य निर्माण झाले होते. राष्ट्रसंताच्या प्रेरणेने १९३७ साली कान्हळगावात गुरूदेव सेवा मंडळाची स्थापना झाली होती. गावातील लोकांनी श्रमदानातून गुरूदेव सेवा मंडळाच्या इमारतीचे बांधकाम केले होते. या इमारतीला दरबार हे नाव देण्यात आले होते. आता दरबार उध्वस्त झाला आहे. उंबरीच्या झाडाखाली अन्नाजींची कुटी होती. ते उंबराचे ऐतिहासिक झाड अजूनही शाबूत आहे.अन्नाजी महाराज यांच्या स्मारकाच्या कामाचे भूमिपूजन राज्यसभा खासदार व राष्ट्रवादीचे नेते प्रफूल पटेल यांनी वीस वर्षापूर्वी केले होते. तथापि, निधीअभावी स्मारकाचे बांधकाम झाले नाही. पूर्वी गावात रामधूनद्वारे लोकात चेतना निर्माण होत होती. सहकार्य, सेवाभाव कृत्तीची बीजे कान्हळगावात पेरली गेली आहेत. १९४२ च्या दरम्यान स्वातंत्र्य आंदोलनाने जोर पकडला होता. याचवेळी कान्हळगावात विश्वशांती सप्ताह पार पडला होता. अन्नाजी महाराज कान्हळगावात येथे आध्यात्मिक व सामाजिक कार्यात रममाण असताना स्वामी सितारामदास महाराज यांनी अन्नाजींना नरसिंह टेकडी माडगी येथील वैनगंगेच्या सानिध्यात योगसाधना करण्याची प्रेरणा दिली. अन्नाजी महाराज कान्हळगाव येथून १९४९ ला नरसिंह टेकडी येथे गेले. काही काळानंतर त्यांचे टेकडीवर देहावसान झाले. दरवर्षी कान्हळगावात अन्नाजींची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. यावर्षी ११४ वी जयंती १२ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी रोजी जयंती महोत्सव साजरा केला जात आहे. ग्रामसफाई, सामुहिक ध्यान, कीर्तन, गोपालकाला आदी कार्यक्रम होणार आहेत. सामुदायीक जीवनाची संस्कृती जपणाऱ्या या गावात सामुदायीक प्रार्थना व आठवड्याला प्रभातफेरी काढण्याचे काम नित्याचे गुरूदेव सेवा मंडळाने कायम ठेवले आहे. प्रार्थनेत विशेषत्वाने बालमंडळींचा सहभाग असतो. अन्नाजींचे प्रेरणास्थळी प्रार्थना स्थळ तयार करण्यात आले आहे. संताची तपोभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गावाला संत मंडळींनी आदर्श ग्रामची पावती दिली आहे.