शहरं
Join us  
Trending Stories
1
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
2
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
3
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
4
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
5
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
6
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
7
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
8
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
9
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
10
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
11
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
12
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
13
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
14
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
15
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
16
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
17
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
18
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
19
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
20
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस

जिल्ह्यातील जैवविविधता धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 22:56 IST

जिल्ह्यात वनसंपत्ती विपूल प्रमाणात असली तरी शासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवैध वृक्षतोड सुरु असल्याने वनांचे प्रमाण दरवर्षीच घटते आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने कठोर निर्बंध आणून अवैध वृक्षतोडीवर आळा घालून जैव विविधता जोपासणे गरजेचे आहे.

ठळक मुद्देवेळीच उपाययोजना करण्याची गरज : वन्यप्राण्यांची मानवी वस्तीत धाव

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात वनसंपत्ती विपूल प्रमाणात असली तरी शासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवैध वृक्षतोड सुरु असल्याने वनांचे प्रमाण दरवर्षीच घटते आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने कठोर निर्बंध आणून अवैध वृक्षतोडीवर आळा घालून जैव विविधता जोपासणे गरजेचे आहे. तसेच अनेकदा जिल्ह्यातील वनसंपदा आगीच्या भक्ष्यस्थानी सापडत असल्याने दरवर्षीच पडणाऱ्या वनव्यांना रोखणे देखील प्रशासनापुढे आवाहन आहे. निसर्गसंपत्तीने नटलेल्या जिल्ह्यातील पवनी, लाखनी, साकोली तालुक्यात वनसंपत्तीचे मोठे वरदान लाभले आहे. पण अनेक निष्काळजी नागरिकांच्या चुकीमुळे वनवा लागण्याच्या प्रकारात वाढ होत आहे. याचा परिणाम जंगलातील अनेक दुर्मिळ वनस्पती व वनौषधींचा नाश होत आहे. अनेकांचा रोजगार हिरावला जात आहे. वनामधील खाद्य जळून गेल्याने याचा वन्य प्राण्यांनाही मोठा फटका बसतो आहे. वनव्यापासून वाचण्यासाठी जंगलातील हरीण, रानडुक्कर, सांबर यासारखे प्राणी वनाबाहेर पाण्यासाठी सैरभैर होऊन शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांची नासधूस करतात. त्यामुळे मानवाच्या अतिक्रमणाचा व शासनाच्या दुर्लक्षीतपणाचा फटका मानवालाच चुकवावा लागत आहे. जिल्ह्यात बिबट्याने केलेले हल्ले वाढतच आहेत. अनेक गरीब शेतकºयांना आपल्या गायी, शेळ्या गमवाव्या लागल्या आहेत. तरी देखील वनविभाग मुग गिळून गप्प आहे. दरवर्षीच होणाºया वृक्षलागवडीवर देखील जनसामान्यांतून संशय व्यक्त केला जात आहे. नेहमीच येतो पावसाळा तशीच अवस्था वृक्षारोपणाची झाली आहे. वृक्षारोपण होते परंतु वृक्षसंवर्धनाकडे मात्र जाणीवपूर्वक पाहले जात नाही. यामुळे जिल्ह्यातील जैवविविधता संपुष्टात येत आहे. दुर्मिळ औषधी वनस्पती, प्राणी अनेकांचा रोजगार दिवसेंदिवस कमी होत चालला आहे.जैवविविधतेला मानवाचा ऱ्हास कारणीभूतजिल्ह्यात अनेक ठिकाणी समृद्ध वनसंपत्तीने नटलेला प्रदेश असताना दरवर्षीच वनाचे प्रमाण कमी होत चालल्याने दिवसेंदिवस जंगले उजाड होत चालले आहेत. वाढत्या वणव्यांना रोखून अवैध वृक्षतोडीला आळा घालणे शासनापुढे आव्हान आहे. जंगल वाचविण्यासाठी आणि वन्य प्राण्यांकडून शेतीचे होणारे नुकसान थांबविण्यासाठी शासनाला व नागरिकांना एक पाऊल पुढे टाकत जैवविविधता संवर्धनासाठी एकत्र येण्याची गरज आहे. तरच जिल्ह्यातील जैवविविधता टिकू शकते.