शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
5
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
6
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
7
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
8
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
9
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
10
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
11
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
12
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
13
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
14
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
15
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
16
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
17
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
18
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
19
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

जिल्ह्यातील जैवविविधता धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 22:56 IST

जिल्ह्यात वनसंपत्ती विपूल प्रमाणात असली तरी शासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवैध वृक्षतोड सुरु असल्याने वनांचे प्रमाण दरवर्षीच घटते आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने कठोर निर्बंध आणून अवैध वृक्षतोडीवर आळा घालून जैव विविधता जोपासणे गरजेचे आहे.

ठळक मुद्देवेळीच उपाययोजना करण्याची गरज : वन्यप्राण्यांची मानवी वस्तीत धाव

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात वनसंपत्ती विपूल प्रमाणात असली तरी शासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवैध वृक्षतोड सुरु असल्याने वनांचे प्रमाण दरवर्षीच घटते आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने कठोर निर्बंध आणून अवैध वृक्षतोडीवर आळा घालून जैव विविधता जोपासणे गरजेचे आहे. तसेच अनेकदा जिल्ह्यातील वनसंपदा आगीच्या भक्ष्यस्थानी सापडत असल्याने दरवर्षीच पडणाऱ्या वनव्यांना रोखणे देखील प्रशासनापुढे आवाहन आहे. निसर्गसंपत्तीने नटलेल्या जिल्ह्यातील पवनी, लाखनी, साकोली तालुक्यात वनसंपत्तीचे मोठे वरदान लाभले आहे. पण अनेक निष्काळजी नागरिकांच्या चुकीमुळे वनवा लागण्याच्या प्रकारात वाढ होत आहे. याचा परिणाम जंगलातील अनेक दुर्मिळ वनस्पती व वनौषधींचा नाश होत आहे. अनेकांचा रोजगार हिरावला जात आहे. वनामधील खाद्य जळून गेल्याने याचा वन्य प्राण्यांनाही मोठा फटका बसतो आहे. वनव्यापासून वाचण्यासाठी जंगलातील हरीण, रानडुक्कर, सांबर यासारखे प्राणी वनाबाहेर पाण्यासाठी सैरभैर होऊन शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांची नासधूस करतात. त्यामुळे मानवाच्या अतिक्रमणाचा व शासनाच्या दुर्लक्षीतपणाचा फटका मानवालाच चुकवावा लागत आहे. जिल्ह्यात बिबट्याने केलेले हल्ले वाढतच आहेत. अनेक गरीब शेतकºयांना आपल्या गायी, शेळ्या गमवाव्या लागल्या आहेत. तरी देखील वनविभाग मुग गिळून गप्प आहे. दरवर्षीच होणाºया वृक्षलागवडीवर देखील जनसामान्यांतून संशय व्यक्त केला जात आहे. नेहमीच येतो पावसाळा तशीच अवस्था वृक्षारोपणाची झाली आहे. वृक्षारोपण होते परंतु वृक्षसंवर्धनाकडे मात्र जाणीवपूर्वक पाहले जात नाही. यामुळे जिल्ह्यातील जैवविविधता संपुष्टात येत आहे. दुर्मिळ औषधी वनस्पती, प्राणी अनेकांचा रोजगार दिवसेंदिवस कमी होत चालला आहे.जैवविविधतेला मानवाचा ऱ्हास कारणीभूतजिल्ह्यात अनेक ठिकाणी समृद्ध वनसंपत्तीने नटलेला प्रदेश असताना दरवर्षीच वनाचे प्रमाण कमी होत चालल्याने दिवसेंदिवस जंगले उजाड होत चालले आहेत. वाढत्या वणव्यांना रोखून अवैध वृक्षतोडीला आळा घालणे शासनापुढे आव्हान आहे. जंगल वाचविण्यासाठी आणि वन्य प्राण्यांकडून शेतीचे होणारे नुकसान थांबविण्यासाठी शासनाला व नागरिकांना एक पाऊल पुढे टाकत जैवविविधता संवर्धनासाठी एकत्र येण्याची गरज आहे. तरच जिल्ह्यातील जैवविविधता टिकू शकते.