शहरं
Join us  
Trending Stories
1
१० टोलनाक्यांवर नवीन टोल प्रणाली सुरु; चाचणीनंतर वर्षभरात देशभर...; गडकरींची लोकसभेला माहिती
2
गुगल सर्चवर काय काय शोधत होते भारतीय? आत्ताची धर्मेंद्र यांच्या मृत्यूची अफवा ते जानेवारीपर्यंत...
3
तुमचा खिसा हलका होणार! मोबाईल, टीव्ही, एसी आणि गाड्यांच्या दरात ३ ते १० टक्क्यांची वाढ अटळ
4
AUS vs ENG : ऑस्ट्रेलियन सुंदरीचा 'तो' मेसेज अन् अखेर इंग्लंडच्या जो रुटचा शतकी दुष्काळ संपला!
5
पुतिन फक्त लँडलाइन का वापरतात? स्मार्टफोन टाळण्यामागे आहे भीती; हातही लावत नाहीत
6
३ दिवसांच्या घसरणीला ब्रेक! IT शेअर्सच्या बळावर सेन्सेक्स-निफ्टी हिरव्या रंगात बंद; टॉप गेनर्स-लूजर्स
7
मदीनाहून १८० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या इंडिगो विमानाला बॉम्बची धमकी, अहमदाबादमध्ये आपत्कालीन लँडिंग
8
'पंतप्रधान मोदी कोणाच्याही दबावापुढे झुकणार नाहीत', ट्रम्प यांच्या 'टॅरिफ वॉर'वर व्लादिमीर पुतिन यांनी स्पष्टच सांगितलं
9
पुतीन यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे फाईव्ह स्टार हॉटेल्सची चांदी, किमान भाडं ₹८५ हजारांच्या पार
10
सर्वात कर्जबाजारी देशांमध्ये अमेरिकेचाही आहे समावेश! बलाढ्य देशाला कोण देते कर्ज? जाणून घ्या..
11
"मी सर्वांचा नाश करेन", पूनमच्या शरीरात शिरायचा आत्मा; कुटुंबीयांनी सांगितलं कसं बदललं वागणं?
12
जैशची नवी 'लेडी आर्मी'! मसूद अजहरचा धक्कादायक खुलासा; मोठ्या कटासाठी ५००० हून अधिक महिलांची भरती
13
साधुग्रामसाठी राखीव १५० एकर जागा कुठे गायब झाली?; कुणाच्या आशीर्वादाने?
14
झाडाला मिठी मारता, मग बकरीला का नाही? नितेश राणेंचा पर्यावरणप्रेमींना सवाल; म्हणाले, 'हा भाजपचा कार्यक्रम नाही'
15
वक्री गुरूचा गजकेसरी राजयोग: १० राशींना सुख-सुबत्ता, धनलक्ष्मी भरघोस देईल; ५४ तास वरदान काळ!
16
असा पराक्रम करणारा क्रिकेट जगतातील पहिला गोलंदाज ठरला स्टार्क; पाकच्या वसीम आक्रमचा विक्रमही मोडला
17
Mumbai: गोरेगावच्या कॉलेजमध्ये बुरख्यावरून वाद; विद्यार्थिनींचे उपोषण, एमआयएमचा पाठिंबा!
18
अधिवेशनात विरोधक प्रश्न विचारणार म्हणून जमीन प्रकरणात कारवाईचा दिखावा; विरोधकांचा आरोप
19
बापमाणूस! "मी म्हातारा झालो नाही, पैसे कमवेन, तू फक्त..."; रात्री २ वाजता लेकीचा वडिलांना फोन
20
रशियातील सर्वात श्रीमंत महिला! मातृत्व रजेवर असताना सुचली कल्पना, आज अब्जावधींचं साम्राज्य
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील जैवविविधता धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 22:56 IST

जिल्ह्यात वनसंपत्ती विपूल प्रमाणात असली तरी शासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवैध वृक्षतोड सुरु असल्याने वनांचे प्रमाण दरवर्षीच घटते आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने कठोर निर्बंध आणून अवैध वृक्षतोडीवर आळा घालून जैव विविधता जोपासणे गरजेचे आहे.

ठळक मुद्देवेळीच उपाययोजना करण्याची गरज : वन्यप्राण्यांची मानवी वस्तीत धाव

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात वनसंपत्ती विपूल प्रमाणात असली तरी शासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवैध वृक्षतोड सुरु असल्याने वनांचे प्रमाण दरवर्षीच घटते आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने कठोर निर्बंध आणून अवैध वृक्षतोडीवर आळा घालून जैव विविधता जोपासणे गरजेचे आहे. तसेच अनेकदा जिल्ह्यातील वनसंपदा आगीच्या भक्ष्यस्थानी सापडत असल्याने दरवर्षीच पडणाऱ्या वनव्यांना रोखणे देखील प्रशासनापुढे आवाहन आहे. निसर्गसंपत्तीने नटलेल्या जिल्ह्यातील पवनी, लाखनी, साकोली तालुक्यात वनसंपत्तीचे मोठे वरदान लाभले आहे. पण अनेक निष्काळजी नागरिकांच्या चुकीमुळे वनवा लागण्याच्या प्रकारात वाढ होत आहे. याचा परिणाम जंगलातील अनेक दुर्मिळ वनस्पती व वनौषधींचा नाश होत आहे. अनेकांचा रोजगार हिरावला जात आहे. वनामधील खाद्य जळून गेल्याने याचा वन्य प्राण्यांनाही मोठा फटका बसतो आहे. वनव्यापासून वाचण्यासाठी जंगलातील हरीण, रानडुक्कर, सांबर यासारखे प्राणी वनाबाहेर पाण्यासाठी सैरभैर होऊन शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांची नासधूस करतात. त्यामुळे मानवाच्या अतिक्रमणाचा व शासनाच्या दुर्लक्षीतपणाचा फटका मानवालाच चुकवावा लागत आहे. जिल्ह्यात बिबट्याने केलेले हल्ले वाढतच आहेत. अनेक गरीब शेतकºयांना आपल्या गायी, शेळ्या गमवाव्या लागल्या आहेत. तरी देखील वनविभाग मुग गिळून गप्प आहे. दरवर्षीच होणाºया वृक्षलागवडीवर देखील जनसामान्यांतून संशय व्यक्त केला जात आहे. नेहमीच येतो पावसाळा तशीच अवस्था वृक्षारोपणाची झाली आहे. वृक्षारोपण होते परंतु वृक्षसंवर्धनाकडे मात्र जाणीवपूर्वक पाहले जात नाही. यामुळे जिल्ह्यातील जैवविविधता संपुष्टात येत आहे. दुर्मिळ औषधी वनस्पती, प्राणी अनेकांचा रोजगार दिवसेंदिवस कमी होत चालला आहे.जैवविविधतेला मानवाचा ऱ्हास कारणीभूतजिल्ह्यात अनेक ठिकाणी समृद्ध वनसंपत्तीने नटलेला प्रदेश असताना दरवर्षीच वनाचे प्रमाण कमी होत चालल्याने दिवसेंदिवस जंगले उजाड होत चालले आहेत. वाढत्या वणव्यांना रोखून अवैध वृक्षतोडीला आळा घालणे शासनापुढे आव्हान आहे. जंगल वाचविण्यासाठी आणि वन्य प्राण्यांकडून शेतीचे होणारे नुकसान थांबविण्यासाठी शासनाला व नागरिकांना एक पाऊल पुढे टाकत जैवविविधता संवर्धनासाठी एकत्र येण्याची गरज आहे. तरच जिल्ह्यातील जैवविविधता टिकू शकते.