शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत आधीच मुसळधार पाऊस, त्यात भूकंपाचे धक्के; १० सेकंद जमीन हादरली, लोक घराबाहेर पळाले
2
कर्नाटकात हालचालींना वेग मुख्यमंत्री बदलणार की बंडखोरी होणार? दोन्ही नेते दिल्लीत पोहोचले; राहुल गांधी निर्णय घेणार
3
गजब होई गवा! महिलेच्या व्होटर आयडीवर छापला बिहारी मुख्यमंत्र्यांचा फोटो; पती म्हणतोय... 
4
भलेही ताकद कमी असेल, पण इरादा पक्का! 'हा' छोटासा देश थेट चीनशी लढण्याच्या तयारीत
5
तीन हजारांवर काॅटेज, हाॅटेलमध्ये ‘सर्च ऑपरेशन’; संशयास्पद ‘बोटी’च्या संदेशानंतर पोलिस ‘अलर्ट’
6
माल्ल्या, नीरव मोदी, पारेख... सर्वांना एकत्र करा; त्यापेक्षाही मोठा आहे जेन स्ट्रीट घोटाळा, अवाक् करणारा दावा
7
फेसबुक लाईव्हवर व्यथा सांगितली अन् १५ मिनिटांत संपवलं जीवन! रिअल इस्टेट व्यावसायिकानं का उचललं टोकाचं पाऊल? 
8
कंगाल पाकिस्तानबद्दल काय म्हणावं? पाकिस्तानची सरकारी एअरलाईन्स खरेदी करण्यासाठी आले सीमेंटवाले
9
पुढील काही महिने पृथ्वी वेगाने फिरणार; भविष्यात घड्याळाची वेळ बदलावी लागणार, ९ जुलैला काय घडलं?
10
रात्री ज्याला चोर म्हणून तुडवला, त्यालाच सकाळी जावई बनवला! रात्रभरात असं नेमकं घडलं काय? 
11
आजचे राशीभविष्य: या राशींसाठी लग्न जुळण्याचा योग, व्यापार - व्यवसायात फायदा होणार, चांगला दिवस
12
हातात हात अन् प्रेग्नंट पत्नीला साथ! शूराची काळजी घेताना दिसला अरबाज खान, व्हिडीओ व्हायरल
13
समलैंगिक संबंध, ब्लॅकमेलिंग अन् शेवट...; मुंबईतील ३ घटना, ३ मृत्यू, नेमकं काय घडले?
14
५० लाख नागरिकांना मिळणार जागेची मालकी; तुकडेबंदी कायदा तूर्त शिथिल, नंतर रद्द करणार
15
...तर खराब रस्त्यांसाठी नागरिकांनी या आमदारांना का मारू नये?; टॉवेल बनियनवर गावगुंडासारखा राडा
16
विद्यार्थिनींची अंतर्वस्त्रे उतरवली, कारण...; शहापूरच्या खासगी शाळेतील अत्यंत घृणास्पद प्रकार
17
सोळावं वरीस धोक्याचं... किशोरवयातच प्रौढपण; खेळण्याच्या वयात मुली पडतायेत वासनेचा बळी
18
मतदारांच्या कमाल संख्येनुसार मतदान केंद्रे; निवडणूक आयोगाचे निर्देश, एका इमारतीत आता १० केंद्रे
19
पंढरीचे ‘एआय’ वारकरी! AI ने केली २७ लाख लोकांची गर्दी मोजण्याची किमया
20
निवडणूक आयोग जनतेला मूर्ख समजतो की काय?; रोखठोक प्रश्न विचारणं आवश्यक बनलंय

जैव-विविधता समित्या केवळ कागदावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2016 00:35 IST

जिल्ह्यात सन २००४ ते २००५ मध्ये ग्रामविकास मंत्रालयाच्या आदेशाने प्रत्येक ग्रामस्तरावरील ग्रामपंचायतीमध्ये

आलेसूर : जिल्ह्यात सन २००४ ते २००५ मध्ये ग्रामविकास मंत्रालयाच्या आदेशाने प्रत्येक ग्रामस्तरावरील ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणात ग्रामसभेतून जैवविविधता समित्या स्थापित करण्यात आल्या. मात्र आजता गायत ग्रामपंचायतीमध्ये एकही नियोजन व मुखातून वाचता काढण्यात आली नाही. परिणामी सद्यस्थितीत जैव विविधता समिती म्हणजे काय, हा थेट अधिकारी व पदाधिकारी यांनाच विसर पडल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे समित्या केवळ कागदावर जिवंत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. केंद्र शासनाने २००२ मध्ये जैव विविधता कायद्याची स्थापना केली व २००३ मध्ये राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरणामुळे २००४ मध्ये जैवविविधता संबंधीचे नियम स्विकारण्यात आले. भारतात खऱ्या अर्थाने जैविक विविधता कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली. त्यामुळे देश पातळीवर राष्ट्रीय जैव विविधता प्राधिकरण, राज्यपातळीवर राज्य जैव विविधता मंडळ व स्थानिक पातळीवर जैवविविधता समितीची स्थापना करण्यात आली. काही अधिकार व कर्तव्य सोपविण्यात आले. कर्तव्यात जीव सृष्टीतील विविधता टिकवून त्यांचे रक्षण करणे जैविक संपदा अगर कायम राहतील अशा रितीने त्यांचा वापर करणे अशा स्त्रोतांच्या वापरातून जे लाभ निर्माण होतील त्यात संबंधीताना सम समान वाटा देणे, अधिकारात स्थानिक नागरिकाव्यतिरिक्त इतर नागरिकाद्वारे जैव विविधता वापर अणि संकलन करण्यावर बंदी. जैवविविधता वापरण्यातून मिळणारा लाभ तंत्रज्ञानाचा वापर संशोधन विकास जैविक संपदा याचे सामुदायीक व्यवस्थापन, वन व वनालगत नागरिकांना जैव संसाधने, त्यांची माहिती आणि वापरासंबंधी शुल्क वसुल करण्याचा अधिकार, जैव, तंत्र आणि जिवाणुचे वापरावर नियंत्रण आदी अधिकार व कर्तव्य प्राप्त झाली आहेत. प्रत्येक गावाच्या हद्दीत येणारे शेतीविषयक पारंपारिक ज्ञान विविध प्रकारची पिके, वन औषधी, वैदुकिंवा भुमक यांचे ज्ञान, जंगलाबद्दल माहिती, विविध प्रकारच्या वनस्पतीच्या वापराबाबत माहिती वन्य जीवांची माहिती, म्वन व वनातील गौण वन उपज संपदा, जलचर किंवा उभयचर जीवांची माहिती यासर्व प्रकारांची नावानिशी नोंद करण्याची प्राथमिकता या जैवविविधता नोंदवहीमध्ये करणे अनिवार्य आहे. गावातील कोणत्याही जैविक साधन संपत्तीचा वापर गावाच्या परवानगी शिवाय होणार नाही. अशा सबब बाबीची नोंद आवश्यक आहे. (वार्ताहर)