शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

जैव-विविधता समित्या केवळ कागदावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2016 00:35 IST

जिल्ह्यात सन २००४ ते २००५ मध्ये ग्रामविकास मंत्रालयाच्या आदेशाने प्रत्येक ग्रामस्तरावरील ग्रामपंचायतीमध्ये

आलेसूर : जिल्ह्यात सन २००४ ते २००५ मध्ये ग्रामविकास मंत्रालयाच्या आदेशाने प्रत्येक ग्रामस्तरावरील ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणात ग्रामसभेतून जैवविविधता समित्या स्थापित करण्यात आल्या. मात्र आजता गायत ग्रामपंचायतीमध्ये एकही नियोजन व मुखातून वाचता काढण्यात आली नाही. परिणामी सद्यस्थितीत जैव विविधता समिती म्हणजे काय, हा थेट अधिकारी व पदाधिकारी यांनाच विसर पडल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे समित्या केवळ कागदावर जिवंत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. केंद्र शासनाने २००२ मध्ये जैव विविधता कायद्याची स्थापना केली व २००३ मध्ये राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरणामुळे २००४ मध्ये जैवविविधता संबंधीचे नियम स्विकारण्यात आले. भारतात खऱ्या अर्थाने जैविक विविधता कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली. त्यामुळे देश पातळीवर राष्ट्रीय जैव विविधता प्राधिकरण, राज्यपातळीवर राज्य जैव विविधता मंडळ व स्थानिक पातळीवर जैवविविधता समितीची स्थापना करण्यात आली. काही अधिकार व कर्तव्य सोपविण्यात आले. कर्तव्यात जीव सृष्टीतील विविधता टिकवून त्यांचे रक्षण करणे जैविक संपदा अगर कायम राहतील अशा रितीने त्यांचा वापर करणे अशा स्त्रोतांच्या वापरातून जे लाभ निर्माण होतील त्यात संबंधीताना सम समान वाटा देणे, अधिकारात स्थानिक नागरिकाव्यतिरिक्त इतर नागरिकाद्वारे जैव विविधता वापर अणि संकलन करण्यावर बंदी. जैवविविधता वापरण्यातून मिळणारा लाभ तंत्रज्ञानाचा वापर संशोधन विकास जैविक संपदा याचे सामुदायीक व्यवस्थापन, वन व वनालगत नागरिकांना जैव संसाधने, त्यांची माहिती आणि वापरासंबंधी शुल्क वसुल करण्याचा अधिकार, जैव, तंत्र आणि जिवाणुचे वापरावर नियंत्रण आदी अधिकार व कर्तव्य प्राप्त झाली आहेत. प्रत्येक गावाच्या हद्दीत येणारे शेतीविषयक पारंपारिक ज्ञान विविध प्रकारची पिके, वन औषधी, वैदुकिंवा भुमक यांचे ज्ञान, जंगलाबद्दल माहिती, विविध प्रकारच्या वनस्पतीच्या वापराबाबत माहिती वन्य जीवांची माहिती, म्वन व वनातील गौण वन उपज संपदा, जलचर किंवा उभयचर जीवांची माहिती यासर्व प्रकारांची नावानिशी नोंद करण्याची प्राथमिकता या जैवविविधता नोंदवहीमध्ये करणे अनिवार्य आहे. गावातील कोणत्याही जैविक साधन संपत्तीचा वापर गावाच्या परवानगी शिवाय होणार नाही. अशा सबब बाबीची नोंद आवश्यक आहे. (वार्ताहर)