शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
3
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
4
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
5
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
6
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
7
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
8
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
9
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
10
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
11
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
12
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
13
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
14
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
15
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
16
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
17
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
18
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
19
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
20
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या

वाटमारीने फुटणार तांदूळ तस्करीचे बिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:36 IST

तेलंगणातील रमेश अन्ना याचा दिवानजी माशेट्टी श्रीनिवास भास्कर हा तांदूळाच्या रकमेच्या वसुलीसाठी भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात आला ...

तेलंगणातील रमेश अन्ना याचा दिवानजी माशेट्टी श्रीनिवास भास्कर हा तांदूळाच्या रकमेच्या वसुलीसाठी भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात आला होता. या प्रकरणातील मुख्य आरोपी रामदास भिरकड याचे रमेश अन्नाकडे दहा लाख रुपये ट्रक भाड्याचे थकले होते. त्यामुळेच त्याने लुटमारीचा कट रचला आणि २२ लाख ५० हजार रुपये लुटलेही परंतु भंडारा पोलिसांच्या चाणाक्ष्य नजरेने तो जेरबंद झाला. एखाद्या ट्रक मालकाचे धान व्यापाऱ्याकडे दहा लाख रुपये ट्रक भाड्याचे थकीत होत असेल तर किती मोठ्या प्रमाणात पूर्व विदर्भात तेलंगणातून तांदूळ आला असेल याची कल्पनाही करवत नाही. विशेष म्हणजे शासकीय नियमानुसार परप्रांतातून धान आणि तांदुळाची निर्यात महाराष्ट्रात करता येत नाही. निर्यात करावयाची असेल तर त्यासाठी शासनाची परवानगी घ्यावी लागते. जीएसटी बिलासह त्याची पूर्तता करावी लागते. परंतु परप्रांतातून तांदूळ खरेदीसाठी शासन परवानगी देत नाही. कारण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात धान पिकतो. खरीप व रबी या हंगामात धान खरेदी करतेवेळी शासनाच्या नाकी नऊ येते. धान ठेवायला गोदामही नसतात. शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये थकीत असतात. अशास्थितीत परप्रांतातून तांदूळ येतो म्हणजे नक्कीच त्यामागे काहीतरी काळेबेरे असण्याचा संशय आहे. या वाटमारीच्या प्रकरणाचा तांदूळ तस्करीशी संबंध जोडून तपास केल्यास मोठे रॅकेट हाती लागण्याची शक्यता आहे.

बॉक्स

अशी होते तांदळाची अदलाबदल

आधारभूत खरेदी केंद्रावर शासन धानाची खरेदी करते. हा धान मिलर्सला भरडाईसाठी दिला जातो. त्यासाठी त्यांना विशिष्ट रक्कम दिली जाते. एक क्विंटल धानापासून ६७ क्विंटल धानाचा उतारा येणे अपेक्षित असते. हा तांदूळ नंतर स्वस्त धान्य दुकानदारांना पुरविला जातो. मात्र अधिक पैसे कमावण्याच्या नादात व्यापारी परराज्यातून तांदूळ १८ रुपये किलो दराने खरेदी करतात. नंतर हाच तांदूळ शासनाला २४ रुपये किलो दराप्रमाणे विकतात. शासनाकडून आलेल्या आदेशानुसार शासकीय धान खरेदी केंद्रातील धान पुन्हा व्यापाऱ्यांनाच विकतात, असा हा गोरखधंदा जिल्ह्यात सुरू आहे. कोट्यवधीच्या घरात उलाढाल असते.

बॉक्स

धान खरेदीची सुरू आहे चौकशी

भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील निकृष्ट धान खरेदी प्रकरण विधानसभेत गाजले होते. याप्रकरणाची चौकशी करण्याची मागणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार डॉ. परिणय फुके यांनी केली होती. त्यावरून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. त्याच बरोबर आता परप्रांतीय तांदळाची चौकशी केल्यास अनेक मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे.

बॉक्स

सखोल चौकशीची गरज

तांदूळ खरेदी प्रकरणात कोट्यवधी उलाढाल केली जाते. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी वरिष्ठ पातळीवरून होण्याची गरज आहे. शासनाकडून कोट्यवधी रुपये उकळणारे पुढे येतीलच परंतु आतापर्यंत आयकर, विक्रीकर आणि जीएसटीचे बुडविलेले पैसेही पुढे येण्याची शक्यता आहे. परंतु राजकीय वरदहस्तात प्रकरण दडपले जाण्याची शक्यता आहे.