शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
2
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
3
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
4
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
5
Technology: SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
6
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
7
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
8
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
9
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
10
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
11
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!
12
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
13
जयदीप अहलावतने दोन आठवड्यामध्ये अंधेरीत खरेदी केलं आणखी एक घर, किंमत आहे कोटींच्या घरात
14
Maharashtra Cabinet: आणीबाणीतील बंदीवानांचे मानधन दुप्पट
15
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
16
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
17
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
18
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
19
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
20
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन

अग्निकांडानंतर सांत्वना दौऱ्यावर कोट्यवधींचा खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:39 IST

भंडारा : जिल्हा सामान्य रुग्णालयातील अग्निकांडानंतर विधानसभा अध्यक्ष, मुख्यमंत्र्यांसह डझनभर मंत्री भंडाऱ्यात दाखल झाले. दररोज मंत्र्यांचे दौरे सुरूच असून, ...

भंडारा : जिल्हा सामान्य रुग्णालयातील अग्निकांडानंतर विधानसभा अध्यक्ष, मुख्यमंत्र्यांसह डझनभर मंत्री भंडाऱ्यात दाखल झाले. दररोज मंत्र्यांचे दौरे सुरूच असून, या दौऱ्यावर कोट्यवधींचा खर्च झाला आहे. अग्निकांडात प्राण गमावलेल्या चिमुकल्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्याला कुणाचाही विरोध नाही. मात्र, आता दौऱ्यावर होणारा कोट्यवधींचा खर्च यापूर्वीच रुग्णालयातील सोयी-सुविधांसाठी दिला असता तर त्या मातांची कूस रिकामी झाली नसती. भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात शनिवारी पहाटे आग लागली. दहा बालकांचा बळी गेला. संपूर्ण देशात खळबळ उडाली. घटनेच्या दिवशीच तब्बल आठ मंत्री भंडाऱ्यात दाखल झाले. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, पालकमंत्री विश्वजित कदम, गृहमंत्री अनिल देशमुख, वनमंत्री संजय राठोड, आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र यड्रावलकर आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा समावेश आहे. रविवारी, १० जानेवारी रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेलिकॉप्टरने भंडाऱ्यात दाखल झाले. त्यावेळी त्यांच्यासोबत विधानसभा अध्यक्ष नाना पटोले आणि पालकमंत्री विश्वजित कदम होते, तसेच उच्च पदस्थ अधिकारीही भंडाऱ्यात तळ ठोकून होते. ११ जानेवारी रोजी महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर, १३ जानेवारी रोजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे आणि शुक्रवारी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी भंडाऱ्यात येऊन रुग्णालयाची पाहणी केली, तसेच अग्निकांडात मृत्युमुखी पडलेल्या चिमुकल्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.

मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांचा लवाजमा भंडाऱ्यात पोहोचला. या दौऱ्यावर शासनाचा कोट्यवधी रुपयांचा खर्च झाला. जनतेच्या करातून वसूल केलेल्या पैशांतून दौरे होत असल्याची माहिती आहे. दीड कोटींच्या अग्निशमन यंत्रणेवर सुरुवातीला खर्च न करणारे शासन आता मंत्र्यांच्या दौऱ्यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च करीत आहे. विश्वसनीय सूत्रांनुसार सात दिवसांत मंत्र्यांच्या दौऱ्यावर सुमारे नऊ ते दहा कोटी रुपये खर्च झाल्याची माहिती आहे. मात्र, याबाबत कुणीही अधिकृत बोलायला तयार नाही. यापूर्वीच जिल्हा रुग्णालयातील समस्यांवर निधी खर्च केला असता, तर आज ते चिमुकले जीव आईच्या कुशीत खेळत असते. आता कोरडे सांत्वन केले जात आहे.

बॉक्स

जिल्हा रुग्णालयात सुविधांचा अभाव कायम

संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या अग्निकांडानंतरही जिल्हा रुग्णालयाच्या कारभारात फारसा फरक पडलेला नाही. केवळ परिसराची आणि अंतर्गत रुग्णालयाची स्वच्छता तेवढी दररोज होत आहे. घटनेनंतर जिल्हा रुग्णालयातील डायलिसिस सुविधा, आयसीयू कक्ष, तसेच ज्या कक्षात घटना घडली तो एसएनसीयू कक्षही बंद आहे. इतर विभागाचीही अशीच अवस्था आहे. डॉक्टर आणि परिचारिका तणावात दिसत असून, उपचारही योग्य होत नसल्याची खंत अनेकांनी व्यक्त केली.