शहरं
Join us  
Trending Stories
1
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
2
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
3
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
4
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
5
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
6
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
7
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
8
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
9
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
10
‘मोसाद’चे धाडसी ऑपरेशन्स आणि त्याची खासियत काय?
11
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
12
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री
13
राज्यात १० ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

विश्वासावर कर्ज वितरण शासनाचे मोठे पाऊल

By admin | Updated: October 22, 2015 00:32 IST

ग्रामीण भागातील लोकांना स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री मुद्रा योजना सुरु केली आहे.

नाना पटोले : भंडारा, तुमसर येथील ६० लोकांना कर्जाचा लाभ भंडारा : ग्रामीण भागातील लोकांना स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री मुद्रा योजना सुरु केली आहे. या योजनेची विशेष मोहीम राबवून भंडारा व तुमसर येथील ६० लोकांना ३० लाख रुपयांचे कर्ज वितरण खासदार नाना पटोले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी धीरजकुमार, रिझर्व्ह बॅकेचे राव, जिल्हा अग्रणी बँकेचे प्रबंधक संजय पाठक, नाबार्डचे महाव्यवस्थापक अरविंद खापर्डे उपस्थित होते. यावेळी खा. पटोले म्हणाले, प्रधानमंत्री मुद्रा योजना ग्रामीण भागातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहचली पाहिजे. बँकेच्या व्यवहाराशी तळागाळातील माणुस जोडला पाहिजे. पुर्वी सबसिडीच्या योजनांचा लाभ लोकांना झाला नाही, त्यामुळे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ९ ते १० टक्के व्याजदराने ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण माणूस उभा राहिला पाहिजे. त्यासाठी कर्जदारांनी सुध्दा काळजी घेऊन कर्ज परतफेड केली पाहिजे. कुठलिही हमी न घेता कर्ज देण्याची व्यवस्था शासनाने उभी केली आहे. केवळ विश्वासावर कर्ज देण्यात येत आहे. हे मोठे पाऊल असून या विश्वासाला तडा जाणार नाही, याची काळजी कर्जदारांनी घ्यावी, असेही ते म्हणाले. यावेळी त्यांच्या हस्ते अलाहाबाद बँक, बँक आॅफ इंडिया, सेंट्रल बँक आॅफ इंडिया, विजया बँक, सिंडीकेट बँक, वैनगंगा बँकेच्या ३० कर्जदारांना १५ लाखाचे कर्ज वितरण करण्यात आले. तुमसर येथे सेंट्रल बँक आॅफ इंडिया, कॅनरा बँक, युनियन बँक, बँक आॅफ बडोदाच्या ३० कर्जदारांना १५ लाखाचे कर्ज वाटप करण्यात आले. जिल्ह्यात १,५६२ कर्जदारांना कर्ज वाटपाच्या उद्दिष्ट देण्यात आले. प्रास्ताविकात प्रधानमंत्री मुद्रा योजनेविषयी माहिती देताना राव म्हणाले, ही योजना तीन टप्यात असून शिशु, किशोर व तरुणांना या योजनेचा लाभ देण्यात येतो. शिशु योजनेत ० ते ५० हजारपर्यंत, किशोर योजनेंतर्गत ५० हजार ते ५ लाखपर्यंत कर्ज देण्यात येते. व्याजाचा दर मार्च २०१६ पर्यंत ७ टक्के व पुढे ७.५ टक्के असा आहे. ही योजना ग्रामपातळीवर पोहचविण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. लघु उद्योजकांच्या विकासासाठी ही योजना राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी बँकेचे प्रबंधक, कर्जधारक उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)