शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

झाडीबोली चळवळीने बोली जीवंत ठेवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 00:21 IST

बोलीशिवाय भाषा म्हणजे चैतन्य हरपलेल्या शब्दांचा ढिगारा. बोलीतील समृद्ध वाक्यप्रचार, म्हणी, उखाणे, लोकगीते वेगवेगळ्या वस्तूंना असणारी वेगवेगळी नावे, एकाच वस्तूला असणारी अनेक नांवे यांचा समृद्ध ठेवा, जेव्हा प्रमाण भाषेत समाविष्ट होईल, तेव्हा भाषा अधिक समृद्ध होईल.

ठळक मुद्देसंमेलनाध्यक्ष बंडोपंत बोढेकर : रौप्य महोत्सवी झाडीबोली साहित्य संमेलनाचे थाटात उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कजवाहरनगर : बोलीशिवाय भाषा म्हणजे चैतन्य हरपलेल्या शब्दांचा ढिगारा. बोलीतील समृद्ध वाक्यप्रचार, म्हणी, उखाणे, लोकगीते वेगवेगळ्या वस्तूंना असणारी वेगवेगळी नावे, एकाच वस्तूला असणारी अनेक नांवे यांचा समृद्ध ठेवा, जेव्हा प्रमाण भाषेत समाविष्ट होईल, तेव्हा भाषा अधिक समृद्ध होईल. एखाद्या म्हातारीने आपली जरतारी पण फाटकी वस्त्रे जपून ठेवावीत त्याप्रमाणे झाडीबोली चळवळीने या बोलीचे महत्त्व, उपयोगिता पटवून दिली आहे. बोली जिवंत ठेवण्याचे ऐतिहासिक कार्य झाडीबोली चळवळीने केले आहे, असे प्रतिपादन रौप्यमहोत्सवी झाडीबोली साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांनी केले.तुलसी बहुउद्देशीय शिक्षण संस्था, महात्मा गांधी अभ्यास केंद्राद्वारा जवाहरनगर येथील कला वाणिज्य महाविद्यालयात आयोजित झाडीबोली साहित्य मंडळाच्या रौप्य महोत्सवी झाडीबोली साहित्य संमेलनात ते बोलत होते. उद्घाटन अ.भा. मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ.श्रीपाद भालचंद्र जोशी यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी भवई लोकनाट्याचे विशेषज्ञ मोतीभाई नायक गुजरात, राष्ट्रीय बालगोष्टीचे आयोजक उदय किरोला अलमोडा उत्तराखंड, डॉ.अनिल नितनवरे, डॉ. तीर्थराज कापगते नागपूर, डॉ.हरिश्चंद्र बोरकर, स्वागताध्यक्ष डॉ.मनिष टेंभरे, नरेश देशमुख, डॉ.गुरूप्रसाद पाकमोडे, प्राचार्य अजय मोहबंसी व सर्व पुर्वाध्यक्ष उपस्थित होते.प्रास्ताविकातून डॉ.गुरूप्रसाद पाकमोडे यांनी झाडीबोली चळवळीचा इतिहास कथन केला डॉ.हरिश्चंद्र बोरकर यांनी या चळवळीचे वेगळेपण उदाहरणासह स्पष्ट केले. पूर्व स्वागताध्यक्ष मधुसुदन दोनोडे यांनी अनुभव कथन केल्यानंतर विद्यमान स्वागताध्यक्ष डॉ.मनिष टेंभरे स्वागतपर भाषण केले.याप्रसंगी उत्तराखंडचे उदय किरोला आणि गुजरातचे मोतीभाई नायक यांनी स्वप्रांतातील आठवणी सांगून झाडीबोली चळवळीची प्रशंसा केली. डॉ.अनिल नितनवरे, डॉ. तीर्थराज कापगते यांनी मार्गदर्शन केले. लोकराम शेंडे यांनी ‘झाडीगौरव’ गीतांचे गायन केले. संचालन प्रा.नरेश आंबिलकर यांनी तर आभारप्रदर्शन प्राचार्य अजय मोहबंसी यांनी केले.रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने २५ ग्रंथाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.