शहरं
Join us  
Trending Stories
1
लूथरा बंधूंच्या मागे आता ईडी देखील हात धुवून लागणार; दिल्लीतील एकाच पत्त्यावर ४२ बनावट कंपन्या...
2
११ वर्षांच्या यशस्वी मोहिमेनंतर NASA च्या 'MAVEN' मार्स ऑर्बिटरशी अचानक संपर्क तुटला; वैज्ञानिक चिंतेत
3
बँक खाते, पेन्शन, टॅक्स स्लॅब ते GST बदल... २०२५ मध्ये पैशांसंबंधी झाले ७ मोठे बदल; तुम्हाला किती फायदा?
4
Shashi Tharoor: "पत्नीच्या संमतीशिवाय संबंध ठेवणे वैवाहिक बलात्कारच, पतीला सूट का द्यावी?"- शशी थरूर
5
"शिवराज पाटील यांची अलीकडेच भेट झाली होती, ते..." PM नरेंद्र मोदींनी दिला आठवणींना उजाळा
6
Nashik Leopard: बिबट्याची नाशिक पोलीस महानिरीक्षकांच्या कार्यालय आवारातच एन्ट्री, सीसीटीव्हीमध्ये दिसला
7
"२ लाख घरे, ३५० स्क्वेअर फूटचं घर, १ कोटींची किंमत..."; धारावी प्रकल्पानं मुंबईचा चेहरा बदलणार
8
आता परत सलमानवर जोक करणार का? पापाराझीच्या प्रश्नावर प्रणित मोरेने हातच जोडले; म्हणाला...
9
...हे ५६ हजार लोक जगातील संपत्तीवर ठेवतात नियंत्रण; श्रीमंतीच्या नव्या आकडेवारीनं सर्वच हैराण
10
पाकिस्तान हेरगिरी नेटवर्क: गुरुग्राम कोर्टातील वकील नय्यूमला अटक, हवाला कनेक्शनचा संशय!
11
U19 Asia Cup 2025 : वैभव सूर्यवंशीचा धमाका! सिक्सर मारत स्टाईलमध्ये साजरी केली फिफ्टी
12
खळबळजनक! ३ वर्षे इंजिनिअरने केले रुग्णांवर उपचार; भावोजींची डिग्री, पण औषधं द्यायचा मेहुणा
13
‘शेतात जाणाऱ्या महिलाही सुरक्षित नाहीत’, पूर्वांचल एक्स्प्रेस वेवर हजारो जोडप्यांचे व्हिडीओ बनल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट
14
नगराध्यक्ष ते राज्यपाल! कसा होता शिवराज पाटील चाकूरकरांचा प्रवास; तब्बल ७ वेळा बनले खासदार
15
उत्तर प्रदेशातील दुसरी सीमा हैदर! लग्नानंतर बांगलादेशी महिला रीना बेगम नेपाळमार्गे थेट भारतात
16
Flipperachi Net Worth: धुरंदरचं व्हायरल गाणं FA9LA गाणाऱ्या फ्लिपरॅचीची संपत्ती किती? दरवर्षी किती करतो कमाई, जाणून घ्या
17
Ghodbunder Road Update: घोडबंदर मार्गावर पुन्हा ३ दिवस अवजड वाहनांना बंदी,  पर्यायी मार्ग कोणते?
18
"मनोरंजनाच्या नावाखाली फक्त हिंसाच...", सध्याच्या कंटेंटवर राधिका आपटेने व्यक्त केली चिंता
19
मेक्सिकोच्या ५०% टॅक्समागे अमेरिकेचा हात? भारतातील 'या' क्षेत्राला बसणार सर्वाधिक झळ
20
IND vs SA: द.आफ्रिकेचा मोठा पराक्रम, भारताविरुद्ध सर्वाधिक टी-२० सामने जिंकणारा पहिलाच संघ
Daily Top 2Weekly Top 5

झाडीबोली चळवळीने बोली जीवंत ठेवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 00:21 IST

बोलीशिवाय भाषा म्हणजे चैतन्य हरपलेल्या शब्दांचा ढिगारा. बोलीतील समृद्ध वाक्यप्रचार, म्हणी, उखाणे, लोकगीते वेगवेगळ्या वस्तूंना असणारी वेगवेगळी नावे, एकाच वस्तूला असणारी अनेक नांवे यांचा समृद्ध ठेवा, जेव्हा प्रमाण भाषेत समाविष्ट होईल, तेव्हा भाषा अधिक समृद्ध होईल.

ठळक मुद्देसंमेलनाध्यक्ष बंडोपंत बोढेकर : रौप्य महोत्सवी झाडीबोली साहित्य संमेलनाचे थाटात उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कजवाहरनगर : बोलीशिवाय भाषा म्हणजे चैतन्य हरपलेल्या शब्दांचा ढिगारा. बोलीतील समृद्ध वाक्यप्रचार, म्हणी, उखाणे, लोकगीते वेगवेगळ्या वस्तूंना असणारी वेगवेगळी नावे, एकाच वस्तूला असणारी अनेक नांवे यांचा समृद्ध ठेवा, जेव्हा प्रमाण भाषेत समाविष्ट होईल, तेव्हा भाषा अधिक समृद्ध होईल. एखाद्या म्हातारीने आपली जरतारी पण फाटकी वस्त्रे जपून ठेवावीत त्याप्रमाणे झाडीबोली चळवळीने या बोलीचे महत्त्व, उपयोगिता पटवून दिली आहे. बोली जिवंत ठेवण्याचे ऐतिहासिक कार्य झाडीबोली चळवळीने केले आहे, असे प्रतिपादन रौप्यमहोत्सवी झाडीबोली साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांनी केले.तुलसी बहुउद्देशीय शिक्षण संस्था, महात्मा गांधी अभ्यास केंद्राद्वारा जवाहरनगर येथील कला वाणिज्य महाविद्यालयात आयोजित झाडीबोली साहित्य मंडळाच्या रौप्य महोत्सवी झाडीबोली साहित्य संमेलनात ते बोलत होते. उद्घाटन अ.भा. मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ.श्रीपाद भालचंद्र जोशी यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी भवई लोकनाट्याचे विशेषज्ञ मोतीभाई नायक गुजरात, राष्ट्रीय बालगोष्टीचे आयोजक उदय किरोला अलमोडा उत्तराखंड, डॉ.अनिल नितनवरे, डॉ. तीर्थराज कापगते नागपूर, डॉ.हरिश्चंद्र बोरकर, स्वागताध्यक्ष डॉ.मनिष टेंभरे, नरेश देशमुख, डॉ.गुरूप्रसाद पाकमोडे, प्राचार्य अजय मोहबंसी व सर्व पुर्वाध्यक्ष उपस्थित होते.प्रास्ताविकातून डॉ.गुरूप्रसाद पाकमोडे यांनी झाडीबोली चळवळीचा इतिहास कथन केला डॉ.हरिश्चंद्र बोरकर यांनी या चळवळीचे वेगळेपण उदाहरणासह स्पष्ट केले. पूर्व स्वागताध्यक्ष मधुसुदन दोनोडे यांनी अनुभव कथन केल्यानंतर विद्यमान स्वागताध्यक्ष डॉ.मनिष टेंभरे स्वागतपर भाषण केले.याप्रसंगी उत्तराखंडचे उदय किरोला आणि गुजरातचे मोतीभाई नायक यांनी स्वप्रांतातील आठवणी सांगून झाडीबोली चळवळीची प्रशंसा केली. डॉ.अनिल नितनवरे, डॉ. तीर्थराज कापगते यांनी मार्गदर्शन केले. लोकराम शेंडे यांनी ‘झाडीगौरव’ गीतांचे गायन केले. संचालन प्रा.नरेश आंबिलकर यांनी तर आभारप्रदर्शन प्राचार्य अजय मोहबंसी यांनी केले.रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने २५ ग्रंथाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.