शहरं
Join us  
Trending Stories
1
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! 10 कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
2
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
3
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
4
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात
5
टॉप अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी; २०० रुपयांच्या खाली आला दिग्गज बँकेचा शेअर, प्रकरण काय?
6
तरुणीने भेटायला हॉटेलमध्ये बोलावलं, आनंदाने गेला तरुण; पण पुढे जे झालं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
7
पोलिसांनी गाडी अडवल्याने संतापले, ताजमहालजवळ केला गोळीबार; पर्यटकांमध्ये उडाली खळबळ!
8
Astro Tips: मिठाची पुडी जवळ ठेवा, भीती, नैराश्य, नकारात्मक ऊर्जा घालवा; उपाय सविस्तर वाचा!
9
१८ एकर जमिनीवर कब्जा करण्याचा डाव फसला; प्रियकरासोबत मिळून पतीला मधुचंद्राच्या रात्रीचं संपवलं, मग...
10
Jio BlackRock नं लाँच केले तीन म्युच्युअल फंड, सलग पाचव्या दिवशी शेअरमध्ये जोरदार तेजी
11
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
12
'पंचायत'मध्ये सचिव जी अन् रिंकीचा असणार होता किसींग सीन, सानविकाने दिला नकार
13
जय मराठी! ५ जुलैला विजयी मेळावा होईल, पण तो कोणत्याही पक्षाचा नसेल; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
14
चॉकलेटच्या डब्यात लपवून आणले तब्बल १६ साप अन्...; मुंबई विमानतळावर प्रवाशाला पोलिसांनी घेतले ताब्यात!
15
भारतात राहण्यासाठी काहीही! ५ बांगलादेशी पुरुषांनी निवडला 'विचित्र' मार्ग, कसे सापडले पोलिसांच्या तावडीत?
16
पतीसमोरच पत्नीने प्रियकरासोबत लग्न केले; निळ्या ड्रमची धडकीच मनात भरली, पतीने उलगडलं रहस्य
17
घसरणीनंतर पुन्हा वाढले सोन्याचे दर... खरेदीची संधी गेली का? २४ कॅरेटचा आजचा भाव काय?
18
हिंदी सक्ती : "समिती कोणतीही असू दे, आता सक्ती विषय..."; उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारला इशारा 
19
Vastu Tips: श्रीमंतांसारखं आयुष्य जगायचं असेल, तर आजच करा 'हे' सात प्रभावी वास्तू उपाय!
20
ऐकावे ते नवलंच! एकटा दरोडेखोरांशी भिडला; कंबरेत गोळी घुसली, २ km पर्यंत कळालेही नाही...

झाडीबोली चळवळीने बोली जीवंत ठेवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 00:21 IST

बोलीशिवाय भाषा म्हणजे चैतन्य हरपलेल्या शब्दांचा ढिगारा. बोलीतील समृद्ध वाक्यप्रचार, म्हणी, उखाणे, लोकगीते वेगवेगळ्या वस्तूंना असणारी वेगवेगळी नावे, एकाच वस्तूला असणारी अनेक नांवे यांचा समृद्ध ठेवा, जेव्हा प्रमाण भाषेत समाविष्ट होईल, तेव्हा भाषा अधिक समृद्ध होईल.

ठळक मुद्देसंमेलनाध्यक्ष बंडोपंत बोढेकर : रौप्य महोत्सवी झाडीबोली साहित्य संमेलनाचे थाटात उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कजवाहरनगर : बोलीशिवाय भाषा म्हणजे चैतन्य हरपलेल्या शब्दांचा ढिगारा. बोलीतील समृद्ध वाक्यप्रचार, म्हणी, उखाणे, लोकगीते वेगवेगळ्या वस्तूंना असणारी वेगवेगळी नावे, एकाच वस्तूला असणारी अनेक नांवे यांचा समृद्ध ठेवा, जेव्हा प्रमाण भाषेत समाविष्ट होईल, तेव्हा भाषा अधिक समृद्ध होईल. एखाद्या म्हातारीने आपली जरतारी पण फाटकी वस्त्रे जपून ठेवावीत त्याप्रमाणे झाडीबोली चळवळीने या बोलीचे महत्त्व, उपयोगिता पटवून दिली आहे. बोली जिवंत ठेवण्याचे ऐतिहासिक कार्य झाडीबोली चळवळीने केले आहे, असे प्रतिपादन रौप्यमहोत्सवी झाडीबोली साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांनी केले.तुलसी बहुउद्देशीय शिक्षण संस्था, महात्मा गांधी अभ्यास केंद्राद्वारा जवाहरनगर येथील कला वाणिज्य महाविद्यालयात आयोजित झाडीबोली साहित्य मंडळाच्या रौप्य महोत्सवी झाडीबोली साहित्य संमेलनात ते बोलत होते. उद्घाटन अ.भा. मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ.श्रीपाद भालचंद्र जोशी यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी भवई लोकनाट्याचे विशेषज्ञ मोतीभाई नायक गुजरात, राष्ट्रीय बालगोष्टीचे आयोजक उदय किरोला अलमोडा उत्तराखंड, डॉ.अनिल नितनवरे, डॉ. तीर्थराज कापगते नागपूर, डॉ.हरिश्चंद्र बोरकर, स्वागताध्यक्ष डॉ.मनिष टेंभरे, नरेश देशमुख, डॉ.गुरूप्रसाद पाकमोडे, प्राचार्य अजय मोहबंसी व सर्व पुर्वाध्यक्ष उपस्थित होते.प्रास्ताविकातून डॉ.गुरूप्रसाद पाकमोडे यांनी झाडीबोली चळवळीचा इतिहास कथन केला डॉ.हरिश्चंद्र बोरकर यांनी या चळवळीचे वेगळेपण उदाहरणासह स्पष्ट केले. पूर्व स्वागताध्यक्ष मधुसुदन दोनोडे यांनी अनुभव कथन केल्यानंतर विद्यमान स्वागताध्यक्ष डॉ.मनिष टेंभरे स्वागतपर भाषण केले.याप्रसंगी उत्तराखंडचे उदय किरोला आणि गुजरातचे मोतीभाई नायक यांनी स्वप्रांतातील आठवणी सांगून झाडीबोली चळवळीची प्रशंसा केली. डॉ.अनिल नितनवरे, डॉ. तीर्थराज कापगते यांनी मार्गदर्शन केले. लोकराम शेंडे यांनी ‘झाडीगौरव’ गीतांचे गायन केले. संचालन प्रा.नरेश आंबिलकर यांनी तर आभारप्रदर्शन प्राचार्य अजय मोहबंसी यांनी केले.रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने २५ ग्रंथाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.