शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

विद्युत सहायक भरतीचे भिजतघोंगडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 21:48 IST

स्कील इंडिया, मेकिंग इंडिया योजना आली आहे, लवकर नोकरी लागेल असा विचार करून महाराष्ट्रातील असंख्य विद्यार्थी, आयटीआयकडे वळले. खरे परंतु सध्या महाराष्ट्रात वेगळेच चित्र पहायला मिळत आहे. महावितरण ने गेल्या ४ ते ५ वर्षापासून विद्युत सहायक भरतीच घेतलेली नाही.

ठळक मुद्देप्रशिक्षक उपाशी : मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे सर्वांचेच लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : स्कील इंडिया, मेकिंग इंडिया योजना आली आहे, लवकर नोकरी लागेल असा विचार करून महाराष्ट्रातील असंख्य विद्यार्थी, आयटीआयकडे वळले. खरे परंतु सध्या महाराष्ट्रात वेगळेच चित्र पहायला मिळत आहे. महावितरण ने गेल्या ४ ते ५ वर्षापासून विद्युत सहायक भरतीच घेतलेली नाही.असंख्य सुशिक्षित आयटीआय प्रशिक्षणार्थी हे दिव्यांग, ग्रामीण भागातील गरीब कुटुंबातील, कष्टकऱ्यांची, मोलमजुरी करणाºयांची शेतकºयांची मुले असून महाराष्ट्र शासनाने घोषणा केलेल्या ७२ हजार जागांमध्ये महावितरणचा सामवेश नसल्याने, एक प्रकारे महाराष्ट्र शासन गरीब कष्ट करणारे दिव्यांग, शेतकरी, शेतमजुरांच्या विद्यार्थ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करीत असल्याचे दिसते. विद्यमान महाराष्ट्राचे उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, आता त्यांच्याच गृहजिल्ह्यातून आयटीआय बेरोजगारांची फौज निर्माण झालेली असताना, जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारणारे पालकमंत्री साहेब, स्वत:च्या मुलांबाळांशी उपाशी ठेवत, मंत्रीमंडळात काय करतात, हा खरा यक्ष प्रश्न आहे.त्या अनुषंगाने शासनाला जागे करण्याकरिता भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील आयटीआय विजतंत्री बेरोजगार प्रशिक्षणार्थ्यांच्या वतीने विद्युत सहायकांची पदे तातडीने भरण्यता यावी, विद्युत सहायक भरतीमध्ये दिव्यांग, विधवा, अनाथ, उमेदवारांच्या आरक्षीत जागा तातडीने भराव्या. भरतीमध्ये बीपीएल, अंतोदय, उमेदवारांना विशेष गुण द्यावे. ग्रामविद्युत व्यवस्थापक भरती त्वरीत थांबवावी या मागण्यांना होवून १० जानेवारीला प्रशिक्षणार्थ्यांच्या वतीने जिल्हाधिकारी भंडारा यांचे मार्फत उर्जामंत्री, मुख्यमंत्री यांना भंडारा जिल्हाध्यक्ष शांतीलाल तिरपुडे, गोंदिया जिल्हाध्यक्ष ओमकार बोटकर यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले. यावेळी शिल्पकार खोब्रागडे, पंकज शहारे, शिल्पा मसराम, कृष्णकुमार पंधरे, प्रिया कोटांगले, योगेश निंबेकर, हिमांशू गिरीपुंजे, नरेंद्र चौधरी तथा असंख्य भंडारा गोंदियातील प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.