शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

भिलेवाडा-खडकी रस्ता भोगतोय मरणयातना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 21:49 IST

भंडारा या जिल्ह्याच्या मुख्यालयाला जोडणाºया भिलेवाडा ते खडकी रस्त्याची पार एैसीतैसी झालेली असून अनेक वर्षांपासून मरणयातना भोगत आहे.

ठळक मुद्देसार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष : उत्तम कळपते यांचा आंदोलनाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा): भंडारा या जिल्ह्याच्या मुख्यालयाला जोडणाºया भिलेवाडा ते खडकी रस्त्याची पार एैसीतैसी झालेली असून अनेक वर्षांपासून मरणयातना भोगत आहे. खोल खड्डे, आडव्या नाल्या, धोकादायक रस्त्याच्या कडा व तुटलेल्या पुलांच्या रॅलींगमुळे अनेक अपघात या ठिकाणी झाले आहेत. परंतु सार्वजनिक बांधकाम उपविभाग भंडारा झोपत आहे. विभागाला आणखी बळी तर हवे नाहीत ना? असा प्रश्न उपस्थित करीत त्वरीत रस्ता दुरुस्तीची मागणी जि.प.सदस्य उत्तम कळपते व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली असून दुर्लक्ष केल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.राज्याच्या मागील अर्थसंकल्पात भिलेवाडा ते खडकी मार्गाच्या दुरुस्तीसाठी सुमारे ३ कोटींचा निधी मंजुर करण्यात आला. सदर निधी अपूर्ण असून यात फक्त रस्त्याच्या दुरुस्तीचे नियोजन केले जाणार असल्याचे विभागाच्या अधिकाºयांचे म्हणणे आहे. संपूर्ण रस्ता उखडलेला असून दुरुस्तीसह डांबरीकरण व मजबुतीकरणासाठी सुमारे २० कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता असल्याचे अभियंत्यांकडून सांगितले जात आहे. मात्र, पुरेसा निधी दिला जात नसल्याचे कारण समोर करीत विभाग रस्त्याच्या दुरावस्थेकडे डोळेझाक करुन आणखी मोठया अपघातांची प्रतिक्षा करीत असल्याचा आरोप जि.प. सदस्य उत्तम कळपते यांचा आहे.भाजपाचे सरकार लोकांना ‘अच्छे दिन’ आणण्याचे वचन देऊन सत्तेत आले. मात्र, नागरिकांचे ‘बुरे दिन’ आल्याचे दिसत आहे. नोटबंदी व जीएसटीमुळे नागरिकांच्या व्यापार व व्यवसायावर विपरीत परिणाम जाणवत आहे. निव्वळ खोटे भाषणे देवून तसेच लोकांना विकासाचे रंजक स्वप्न दाखवून दिशाभुल करण्याचा प्रयत्न सत्ताधारी लोकप्रतिनिधींकडून होत आहे. त्यामुळे लोकांत निराशेचे वातावरण आहे. भिलेवाडा ते खडकी सुमारे १८ किमी लांबीच्या रस्त्याची सालपटे निघाली आहेत. खोल खड्डे व आडव्या नाल्यांमुळे वाहन चालविणे दुरापस्थ ठरले आहे. रस्त्याच्या कडा पूर्णत: उध्वस्त झालेल्या असून कडेला वाहने थांबविता येत नाही. पावसाळ््यात तर कडेला वाहन थांबविल्याने अनेक वाहने उलटली. रस्त्यावर चिखल आल्याने घसरुन अनेकांना अपंगत्व आले. संपूर्ण रस्ताच खोल खडयांच्या गर्तेत बुडाला असतांना या क्षेत्राचे लोकप्रतिनिधी गावागावात मोठमोठी भाषणे ठोकून स्वत:ची पाठ थोपटून घेण्यात व्यस्त आहेत. लोकांना मात्र, रस्त्याच्या दुरावस्थेचा सामना करावा लागत आहे. भिलेवाडा ते खडकी मार्गावरील अनेक पुलांचे रेलींग तुटलेल्या आहेत. करचखेडा, सुरेवाडा, ढिवरवाडा व खडकी खेथील पुलाच्या रेलींग तुटलेल्या असतांना विभागाने दुरुस्तीचे सौजन्य दाखविलेले नाही. विभागाने त्वरीत दखल देवून रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा जि.प. सदस्य उत्तम कळपते, पंचायत समिती सदस्या नितू सेलोकर, सुरेखा फेंडर, तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष हितेश सेलोकर व नागरिकांनी केली आहे.