शहरं
Join us  
Trending Stories
1
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
2
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
3
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
4
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
5
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
6
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
7
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
8
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
9
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
10
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
11
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
12
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
13
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
14
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
15
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
16
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
17
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी
18
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
19
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
20
भाजपा नगरसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव

नवोदयसाठी भंडारा वेटिंगवर

By admin | Updated: January 8, 2015 22:48 IST

भंडारा - गोंदिया जिल्ह्याच्या विभाजानानंतर एकमेव नवोदय विद्यालय गोंदियात गेल्यामुळे मागील १५ वर्षांपासून भंडारा जिल्हा या विद्यालयापासून वंचित आहे. मागील १५ वर्षापासूनच्या

दुर्लक्ष : साकोली येथील विद्यालयाचे नवेगावबांध येथे स्थानांतरणसाकोली : भंडारा - गोंदिया जिल्ह्याच्या विभाजानानंतर एकमेव नवोदय विद्यालय गोंदियात गेल्यामुळे मागील १५ वर्षांपासून भंडारा जिल्हा या विद्यालयापासून वंचित आहे. मागील १५ वर्षापासूनच्या मागणीकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालणे गरजेचे आहे. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या नवोदय विद्यालयाची स्थापना देशातील प्रत्येक जिल्ह्यात एक विद्यालय यानुसार झाली. ही निवासी शाळा गुणवंत व गरीब विद्यार्थ्यांना उच्च व शहरातील नामवंत शाळेच्या तोडीचे शिक्षण देण्यासाठी अस्तित्वात आणण्यात आली. सद्यस्थितीला भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यासाठी एकच नवोदय विद्यालय असल्याने विद्यार्थ्यांना याचा फटका बसत आहे. भंडारा जिल्ह्यातील साकोली येथील एकमेव नवोदय विद्यालय गोंदिया येथील नवेगावबांध येथे समाविष्ट झाले आहे.माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी १९८६ ला प्रायोगीक तत्वावर जवाहर नवोदय विद्यालय महाराष्ट्राच्या अमरावती येथे व दुसरी राजस्थानच्या झंझर येथे सुरु केली होती. या यशस्वी प्रयोगानंतर भारताच्या सर्व राज्यातील प्रत्येक जिल्ह्याला एक नवोदय विद्यालय स्थापन करण्याचे लक्ष्य भारत सरकारच्या मानव विकास विभागाद्वारे ठेवण्यात आले.यात तामीळनाडू हे एकच असे राज्य आहे की त्यात नवोदयाच्या शाळा उघडण्यास तेथील राज्य सरकारने विरोध केला. त्याला कारणही तसेच होते. भंडारा जिल्ह्याकरिता साकोली येथे नवोदय विद्यालय देण्यात आले. येथे चार पाच वर्षे ही विद्यालय सुरळीत सुरु होती. मात्र मालकीची जागा नसल्याने शासनाने ही नवोदय विद्यालय नवेगावबांध येथे हलविली. त्यावेळी भंडारा व गोंदिया ही दोन्ही जिल्हे एकत्र होती.मात्र १९९९ मध्ये जिल्ह्याची फाळणी झाली व ही नवोदय विद्यालय गोंदिया जिल्ह्यात त्यामुळे या नवोदय विद्यालयात भंडारा व गोंदिया या दोन्ही जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यातील विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे.ज्या विद्यार्थ्यांना या नवोदय विद्यालयात शिक्षण घ्यावयाचे असेल त्या विद्यार्थ्यांना शासनातर्फे आयोजित प्रवेश पूर्ण परीक्षा द्यावी लागते. यात परीक्षेला बसलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी गुणवत्ता यादीनुसार विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. ही परीक्षा दरवर्षी वर्षातून एकदाच घेतली जाऊन परीक्षा नि:शुल्क असते. (तालुका प्रतिनिधी)