शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण स्वच्छता सर्वेक्षणात भंडारा विदर्भात अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 10:49 IST

भारत सरकारच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्यावतीने करण्यात आलेल्या देशव्यापी ग्रामीण स्वच्छता सर्वेक्षणात भंडारा जिल्ह्याने विदर्भात प्रथम क्रमांक पटकाविला आहे.

ठळक मुद्देदेशव्यापी मोहीम पेयजल व स्वच्छता मंत्रालयाचा उपक्रम

ज्ञानेश्वर मुंदे।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भारत सरकारच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्यावतीने करण्यात आलेल्या देशव्यापी ग्रामीण स्वच्छता सर्वेक्षणात भंडारा जिल्ह्याने विदर्भात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. राज्यस्तरावर १३ व्या स्थानी असलेल्या भंडारा शहराने स्वच्छतेत पैकीच्या पैकी गुण प्राप्त केले आहेत.देशभरातील जिल्ह्यांचे स्वच्छता गुणांकन ठरविणे, स्वच्छतेच्या सवयींमध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी संपूर्ण देशात १ ते ३१ आॅगस्टपर्यंत सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यात राज्यातील ३४ जिल्हे सहभागी झाले होते. भंडारा जिल्ह्यातील गावांचे सर्वेक्षण केंद्र सरकारच्या पथकाचे प्रमुख ईश्वर काटेखाये यांच्या नेतृत्वात करण्यात आले होते. त्यांनी जिल्ह्यातील नऊ गावांना भेटी देऊन तपासणी केली. त्यात सार्वजनिक जागेवरील स्वच्छता, नागरिकांचे अभिप्राय, स्वच्छताविषयक सद्यस्थिती आदींचा समावेश होता. पेयजल व स्वच्छता मंत्रालयाने या सर्वेक्षणाचा अहवाल नुकताच घोषित केला. त्यात विदर्भातील अकराही जिल्ह्यात भंडारा जिल्ह्याला सर्वाधिक १०० पैकी ८६.९७ गुण मिळाले. प्रत्यक्ष तपासणीत ३० पैकी २६.९४ गुण, नागरिकांच्या प्रतिसादात ३५ पैकी २५.०३ गुण तर स्वच्छता विषयक सद्यस्थितीत ३५ पैकी ३५ गुण प्राप्त केले आहेत.ग्रामीण स्वच्छता सर्वेक्षणात विदर्भात द्वितीय स्थानावर वर्धा आणि तृतीयस्थानी नागपूर जिल्हा आहे. भंडारा जिल्हा राष्ट्रीयस्तरावर १६० व्या क्रमांकावर आणि राज्यात १३ व्या स्थानावर आहे. भंडारा जिल्ह्याने ग्रामीण स्वच्छतेकडे विशेष लक्ष देऊन ग्रामीण भागाचा कायापालट करण्याचा निर्धार केला आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे, मुख्यकार्यकारी अधिकारी रवींद्र जगताप यांच्या मार्गदर्शनात जिल्हा परिषदेचा पाणी व स्वच्छता कक्ष यासाठी परिश्रम घेत आहेत.जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनच्या माध्यमातून ग्रामीण भागात केलेल्या कामाची ही पावती होय. नागरिकांना स्वच्छता विषयक सवयी लावण्यात काही प्रमाणात यश मिळाले असले तरी आणखी मोठी मजल गाठायची आहे. भंडारा जिल्हा देशात अव्वल आणण्यासाठी प्रयत्न केले जातील.-ज्ञानेश्वर सपाटेउपमुख्य कार्यकारी अधिकारी,पाणी व स्वच्छता विभाग,जिल्हा परिषद, भंडारा.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान