शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मनरेगात भंडारा राज्यात अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 00:13 IST

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायद्याची अंमलबजावणी करताना मजुरांना विहित वेळेत मजुरी देण्यासाठी शासनाने प्राधान्य दिले आहे.

भंडारा पॅटर्न राज्यात लागू : आधार लिंकमध्येही प्रथम, जिओ टॅगिंगमध्ये सर्वात पुढेलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायद्याची अंमलबजावणी करताना मजुरांना विहित वेळेत मजुरी देण्यासाठी शासनाने प्राधान्य दिले आहे. मनरेगामध्ये मजुरांना विहित वेळेत मजुरी देण्यामध्ये भंडारा जिल्हा राज्यात अव्वलस्थानी ठरला आहे. जिल्ह्यात ९३.५८ टक्के मजुरीचे विहित वेळेत वाटप करण्यात आले असून वेळेत मजूरी देण्याचा ‘भंडारा पॅटर्न’ राज्यात लागू करण्याच्या सूचना रोहयोचे प्रधान सचिवांनी दिले आहेत.मनरेगा अंतर्गत करण्यात येणाऱ्या कामाची मजूरी वेळेत देण्याचे कायद्यात नमूद आहे. भंडारा जिल्ह्यात आर्थिक वर्ष २०१६-१७ मध्ये ९२ टक्के व आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये ९३.५८ टक्के मजूरी विहित वेळेत देण्यात आली. या वर्षाअखेर ५५ टक्क्यापेक्षा जास्त मजूरांना वेळेत मजूरी देण्याचे नियोजन करण्यात आले, यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष कार्यप्रणाली अवलंबिली आहे.भंडारा जिल्ह्यातील सातही तालुक्यात ही कार्यप्रणाली अंमलात आणल्यामुळे प्रत्येक तालुक्यात वेळेत मजुरी देण्यात आली. याची दखल घेत रोहयो सचिवांनी राज्यभर भंडारा पॅटर्न लागू करण्याचा निर्णय घेतला. यासाठी रोहयोचे प्रधान सचिवाकडे भंडारा पॅर्टनचे सादरीकरण करण्यात आले होते.मजुरांना वेळेत मजूरी देण्यासोबतच आधारलिंक करण्यात भंडारा जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. जिल्ह्यात २ लाख ९० हजार ८६७ सक्रीय मजुरांपैकी आतापर्यंत १ लाख ६० हजार सक्रीय मजुरांना आधार प्रणालीद्वारे मजुरी देण्यात आली असून त्याची टक्केवारी ६० आहे. मनरेगा योजनेंअंतर्गत मजुरी देणे हे आधार लिंकद्वारे सुलभ होत असल्याने जास्तीत जास्त मजुरांनी स्वत:चे खाते क्रमांक व आधार क्रमांक लिंक करण्याकरीता पुढाकार घेतला आहे. मनरेगा योजनेत ग्रामीण भागातील महिलांचा सर्वाधिक सहभाग आहे. भंडारा पंचायत समिती अंतर्गत या योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या सर्वच अधिकारी, कर्मचारी या महिला आहे. त्यामुळे भंडारा तालुका मनरेगा अंमलबजावणीत देश पातळीवर चमकला आहे. मनरेगा सुरू झाल्यापासून जिओ टॅगिंग करण्यामध्येही भंडारा जिल्हा राज्यात अव्वल असून आतापर्यंत निर्माण झालेल्या २६ हजार ३६८ कामांपैकी २० हजार २६२ कामांचे जिओ टॅगिग करण्यात आले आहे. मनरेगांतर्गत वेळेत मजुरी देण्यासाठी भंडारा जिल्ह्यात जिल्हास्तरावर सनियंत्रण कक्ष स्थापन करून तालुकास्तरीय अधिकाऱ्यांसोबत थेट संवाद साधण्यात येतो. भंडारा जिल्ह्याची माहिती व व्यवस्थापन पध्दत (एम.आय.एस.) जलद ठेवण्यावर भर देण्यात आला आहे. मजुरांच्या समस्यांचे तातडीने निराकरण करण्यात येते. ग्रामविकास व अंमलबजावणी यंत्रणा यांच्यात समन्वय ठेवला जातो. यामुळे मनरेगाच्या अंमलबजावणीत भंडारा जिल्हा राज्यात अव्वल आहे. आता हा पॅटर्न राज्यभर राबविला जाणार असून ही बाब जिल्ह्यासाठी गौरवास्पद आहे.- सुहास दिवसे,जिल्हाधिकारी भंडारा.