शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

नागपूरच्या महोत्सवात भंडाऱ्याचा तांदूळ

By admin | Updated: January 16, 2017 00:30 IST

नागपूरच्या कृषि महाविद्यालय परिसरात कृषिविद्या विभागात आत्मा भंडारा व नागपूरच्यावतीने आयोजित तांदुळ व संत्रा महोत्सवात भंडारा जिल्ह्यातील ३० शेतकरी गटांचे स्टॉल लावण्यात आले.

२७.५० लाखांचे तांदूळ विक्री : हिराणखी वाणास शंभर रूपयांचा दरभंडारा : नागपूरच्या कृषि महाविद्यालय परिसरात कृषिविद्या विभागात आत्मा भंडारा व नागपूरच्यावतीने आयोजित तांदुळ व संत्रा महोत्सवात भंडारा जिल्ह्यातील ३० शेतकरी गटांचे स्टॉल लावण्यात आले. यापैकी सेंद्रीय शेतीच्या १८ गटाच्या ५५० शेतकऱ्यांनी महोत्सवात सहभाग नोंदवून ३४ टन तांदळाची विक्री केली.या महोत्सवास नागपूर व परिसरातील नागरिकांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदविला. तांदुळ व संत्रा महोत्सवात आत्मा भंडारा अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या शेतकरी बचतगटांनी उत्पादित केलेल्या सेंद्रीय तांदळाचे विविध वाण व इतर शेतमालाची विक्री हे महोत्सवाचे विशेष आकर्षण ठरले. यात भंडारा जिल्ह्यातून लुप्त झालेले हिरानखी, सुगंधीत चिन्नोर, जयश्रीराम प्रणाली, केशर हे वाण ग्राहकांच्या पसंतीचे ठरले. भंडारा जिल्ह्यातील पहेला येथील भदुजी कायते यांनी उत्पादित केलेल्या हिरानखी या सुगंधित तांदळाच्या वाणाला ८० ते १०० रूपये प्रती किलोग्रॅम दर मिळाला. या वाणसाठी अनेक ग्राहकांनी पुढील वर्षासाठी अग्रिम बुकींग करून घेतले.या तांदुळ महोत्सवात भंडारा जिल्ह्यातील ३० शेतकरी गटांचे स्टॉल लावण्यात आले होते. या ३० गटांपैकी १८ गट हे परंपरागत कृषि विकास योजनेंतर्गत तयार करण्यात आलेले सेंद्रीय शेती क्लस्टर असून उर्वरित गट हे जिल्ह्यातील आत्मांतर्गत तयार करण्यात आलेले सेंद्रीय शेती उत्पादने तयार करणारे आहेत. महोत्सवासाठी भंडारा व नागपूर येथील आत्माचे प्रकल्प संचालक व तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांनी मोलाची भूमिका निभावली. (जिल्हा प्रतिनिधी)५५० शेतकऱ्यांचा सहभागया तांदूळ महोत्सवात ५५० शेतकऱ्यांनी सहभाग घेऊन सेंद्रीय शेतमालाची विक्री केली. यात ३४ टन तांदूळ, ७० क्विंटल गुळ, २० क्विंटल हळद, ४ क्विंटल तीळ, ९ क्विंटल विविध प्रकारच्या डाळी, जवस तेल, मोहरी, धने, मिरची पावडर, गहू, मशरूम, सीताफळ अशा विविध प्रकारची शेती उत्पादनांची २७.५० लाख रूपयांची विक्री करण्यात आली.