शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

भंडारा-गोंदियात ११ एप्रिलला मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 21:48 IST

लोकसभा निवडणुकीचा बिगूल वाजला असून भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघाची निवडणूक पहिल्या टप्प्यात होत आहे. ११ एप्रिल रोजी मतदान होणार असून २५ मार्च ही उमेदवारी दाखल करण्याची अंतिम तारीख आहे. निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या तारखांची घोषणा करताच राजकीय वातावरण तापले आहे.

ठळक मुद्देलोकसभा निवडणुकीचा बिगूल : उमेदवारी दाखल करण्याची अंतिम तारीख २५ मार्च

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : लोकसभा निवडणुकीचा बिगूल वाजला असून भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघाची निवडणूक पहिल्या टप्प्यात होत आहे. ११ एप्रिल रोजी मतदान होणार असून २५ मार्च ही उमेदवारी दाखल करण्याची अंतिम तारीख आहे. निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या तारखांची घोषणा करताच राजकीय वातावरण तापले आहे.भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघात निवडणुकीची अधिसूचना १८ मार्च रोजी जारी केली जाणार आहे. नामांकन दाखल करण्याची अंतिम तारीख २५ मार्च असून २६ मार्च रोजी नामांकन अर्जांची छाणनी केली जाईल. तर २८ मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. ११ एप्रिल रोजी प्रत्यक्ष मतदान होणार असून २३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. गत काही दिवसांपासून निवडणुकीच्या घोषणेची उत्सुकता लागली होती. रविवारी सायंकाळी भारत निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीची घोषणा केली. त्यानुसार भंडारा-गोंदिया मतदार संघात पहिल्या टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघात २० लाख ५२ हजार ६१४ मतदार आहेत. आदर्श आचार संहिता रविवारपासून लागू झाली आहे. जिल्ह्यात ईव्हीएमसह व्हीव्हीपॅड मशीन पुरेशा असून सर्व मशीनची तांत्रिक तपासणी पूर्ण झाल्याची माहिती जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांनी येथे आयोजित पत्रपरिषदेत दिली.भंडारा जिल्ह्यात ९ लाख ७७ हजार ६१४ मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. यात १२ हजार ९३७ नवमतदार आहेत. नामांकन अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवसापर्यंत मतदार नोंदणी करता येणार असल्याचे सांगितले. जिल्ह्यात १२०६ मतदान केंद्र असून ईव्हीएम पुरेशी असल्याचे त्यांनी सांगितले. मतदान करण्यासाठी निवडणूक आयोगाचे ओळखपत्रासह आयोगाने ठरवून दिलेले ओळखपत्र ग्राह्य धरले जाणार आहे. फोटो व्होटर स्लिप ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरली जाणार नाही. तसेच मतदान करण्यासाठी मतदान यादीत नाव असने आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.मतदारसंघात वाढले ४ लाख मतदारगत लोकसभा निवडणुकीपेक्षा यंदा चार लाख ९२८ मतदारांची वाढ झाल्याचे दिसून येत आहे. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघात २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत १६ लाख ५१ हजार ६८६ मतदार होते. यंदा २० लाख ५२ हजार ६१४ मतदारांची नोंद झाली आहे. भंडारा आणि गोंदिया या दोन्ही जिल्ह्यात मतदारांची संख्या वाढल्याने निवडणूक विभागाने जारी केलेल्या मतदान यादीवरुन दिसून येत आहे.आचार संहितेची काटेकोर अंमलबजावणीआदर्श आचार संहिता लागू झाली असून त्याची जिल्ह्यात काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाणार आहे. आचारसंहिता भंगाबाबत निवडणूक आयोगाच्या अधिकृत अ‍ॅपवर तक्रार दाखल करता येईल, असे जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीत उमेदवारासाठी खर्च मर्यादा ७० लाख रुपये असून जिल्हा निवडणूक विभाग प्रत्येक गोष्टीवर बारीक लक्ष ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.