शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
4
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
5
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
6
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
7
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
8
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
9
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
10
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
11
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
12
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
13
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
14
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
15
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
16
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
17
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
18
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
19
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
20
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं

भंडारा जिल्हा सन्मानित

By admin | Updated: June 5, 2017 00:15 IST

३१ मार्च २०१७ रोजी हागणदारीमुक्त घोषित झालेल्या भंडारा जिल्हा परिषदेचा गौरव केंद्र व राज्याच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने मुंबई....

स्वच्छ महाराष्ट्र पुरस्कार : अमिताभ बच्चन यांच्या हस्ते पुरस्कारलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : ३१ मार्च २०१७ रोजी हागणदारीमुक्त घोषित झालेल्या भंडारा जिल्हा परिषदेचा गौरव केंद्र व राज्याच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पार पडलेल्या सोहळ्यात केला. राज्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महानायक अमिताभ बच्चन यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र देऊन मुख्य कार्यकारी अधिकारी व त्यांच्या चमूला गौरविण्यात आले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंग तोमर, राज्याचे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, ना.सदाभाऊ खोत, केंद्रीय सचिव परमानंद अय्यर, राज्याचे प्रधान सचिव राजेशकुमार, वासोचे संचालक डॉ.सतिश उमरीकर, जलस्वराजचे प्रमुख राघवन यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज सूर्यवंशी यांना महानायक अमिताभ बच्चन यांच्या हस्ते माझा महाराष्ट्र स्वच्छ महाराष्ट्र हे सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी शहद अहिरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर आडे तसेच जिल्हा कक्षाची चमू उपस्थित होती. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २ आॅक्टोबर २०१९ पर्यंत संपूर्ण देश हागणदारीमुक्त करण्याचे आवाहन केले आहे. या अभियानाच्या अनुषंगाने सरकारने सन २०१६-१७ मध्ये १० जिल्ह्याची निवड केली होती. यात भंडारा जिल्ह्याचा समावेश होता. या अनुषंगाने जिल्ह्याचे ३१ मार्च २०१७ पर्यंत संपूर्ण जिल्हा हागणदारीमुक्त घोषित करण्यात आला आहे. सन २०१६-१७ या वर्षात जिल्हा परिषद अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनात हे अभियान यशस्वीपणे राबविण्यात आले. संपूर्ण हागणदारीमुक्त ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हे अतिशय महत्वाची बाब असून स्वच्छ भारत अभियानाच्या यशस्वितेची वाटचाल आहे.संपूर्ण जिल्हा हागणदारी मुक्त करण्याच्या दृष्टीने पाणी व स्वच्छता मिशन कक्षाने कृती आराखडा तयार करून योग्य पद्धतीने अंमलबजावणी केली. तसेच गावकऱ्यांच्या भागीदारीने व प्रशासनाच्या उत्तम नियोजनामुळे जिल्हा हागणदारीमुक्ती मुक्त होऊ शकला. जिल्हा परिषदेत राबविणार स्वच्छता अभियानजिल्हा परिषद कार्यालयात महिन्यातून एकदा स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सहभाग राहणार आहे. तसेच सर्व पंचायत समिती कार्यालयातही ही मोहिम हाती घेण्यात येणार आहे. यामुळे परिसर स्वच्छ राहून आरोग्य व कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेत भर पडणार आहे. जिल्हा परिषद इमारतीच्या छतावरील पाणी वाया जावू नये यासाठी रेन हार्व्हेस्टिंग करण्याची योजना असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज सूर्यवंशी यांनी दिली. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) मंजुषा ठवकर उपस्थित होत्या.