शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

भंडारा जिल्हा सन्मानित

By admin | Updated: June 5, 2017 00:15 IST

३१ मार्च २०१७ रोजी हागणदारीमुक्त घोषित झालेल्या भंडारा जिल्हा परिषदेचा गौरव केंद्र व राज्याच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने मुंबई....

स्वच्छ महाराष्ट्र पुरस्कार : अमिताभ बच्चन यांच्या हस्ते पुरस्कारलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : ३१ मार्च २०१७ रोजी हागणदारीमुक्त घोषित झालेल्या भंडारा जिल्हा परिषदेचा गौरव केंद्र व राज्याच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पार पडलेल्या सोहळ्यात केला. राज्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महानायक अमिताभ बच्चन यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र देऊन मुख्य कार्यकारी अधिकारी व त्यांच्या चमूला गौरविण्यात आले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंग तोमर, राज्याचे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, ना.सदाभाऊ खोत, केंद्रीय सचिव परमानंद अय्यर, राज्याचे प्रधान सचिव राजेशकुमार, वासोचे संचालक डॉ.सतिश उमरीकर, जलस्वराजचे प्रमुख राघवन यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज सूर्यवंशी यांना महानायक अमिताभ बच्चन यांच्या हस्ते माझा महाराष्ट्र स्वच्छ महाराष्ट्र हे सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी शहद अहिरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर आडे तसेच जिल्हा कक्षाची चमू उपस्थित होती. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २ आॅक्टोबर २०१९ पर्यंत संपूर्ण देश हागणदारीमुक्त करण्याचे आवाहन केले आहे. या अभियानाच्या अनुषंगाने सरकारने सन २०१६-१७ मध्ये १० जिल्ह्याची निवड केली होती. यात भंडारा जिल्ह्याचा समावेश होता. या अनुषंगाने जिल्ह्याचे ३१ मार्च २०१७ पर्यंत संपूर्ण जिल्हा हागणदारीमुक्त घोषित करण्यात आला आहे. सन २०१६-१७ या वर्षात जिल्हा परिषद अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनात हे अभियान यशस्वीपणे राबविण्यात आले. संपूर्ण हागणदारीमुक्त ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हे अतिशय महत्वाची बाब असून स्वच्छ भारत अभियानाच्या यशस्वितेची वाटचाल आहे.संपूर्ण जिल्हा हागणदारी मुक्त करण्याच्या दृष्टीने पाणी व स्वच्छता मिशन कक्षाने कृती आराखडा तयार करून योग्य पद्धतीने अंमलबजावणी केली. तसेच गावकऱ्यांच्या भागीदारीने व प्रशासनाच्या उत्तम नियोजनामुळे जिल्हा हागणदारीमुक्ती मुक्त होऊ शकला. जिल्हा परिषदेत राबविणार स्वच्छता अभियानजिल्हा परिषद कार्यालयात महिन्यातून एकदा स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सहभाग राहणार आहे. तसेच सर्व पंचायत समिती कार्यालयातही ही मोहिम हाती घेण्यात येणार आहे. यामुळे परिसर स्वच्छ राहून आरोग्य व कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेत भर पडणार आहे. जिल्हा परिषद इमारतीच्या छतावरील पाणी वाया जावू नये यासाठी रेन हार्व्हेस्टिंग करण्याची योजना असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज सूर्यवंशी यांनी दिली. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) मंजुषा ठवकर उपस्थित होत्या.