शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
2
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
3
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
4
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
6
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
7
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
8
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
9
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
10
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
11
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
12
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले
13
Navratri 2025: नवरात्रीला घटस्थापना कशी करावी? जाणून घ्या साहित्य, मुहूर्त आणि शास्त्रोक्त विधी!
14
निलेश साबळेनेच मला बाईचं कॅरेक्टर करायला सांगितलं होतं, भाऊ कदमचा खुलासा
15
भूपतीचा शस्त्रसंधीचा प्रस्ताव, जगन म्हणतो शस्त्र ठेवणार नाही ! माओवादी संघटनेतील वाद चव्हाट्यावर
16
अमेरिकेत करिअरचे दार उघडणारा H-1B व्हिसा काय आहे? कोणाला मिळतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती...
17
पुढच्या आठवड्यात येणार IPO चा पाऊस, २२ आयपीओंमध्ये मिळणार गुंतवणूकीची संधी; कोणत्या आहेत कंपन्या?
18
हृदयस्पर्शी! "आई-वडिलांना सोडून मुलगी गेली लंडनला"; ८० वर्षांचे आजोबा ट्रेनमध्ये विकतात पदार्थ
19
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
20
GST Rate Cut: ५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?

भंडारा जिल्हा सन्मानित

By admin | Updated: June 5, 2017 00:15 IST

३१ मार्च २०१७ रोजी हागणदारीमुक्त घोषित झालेल्या भंडारा जिल्हा परिषदेचा गौरव केंद्र व राज्याच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने मुंबई....

स्वच्छ महाराष्ट्र पुरस्कार : अमिताभ बच्चन यांच्या हस्ते पुरस्कारलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : ३१ मार्च २०१७ रोजी हागणदारीमुक्त घोषित झालेल्या भंडारा जिल्हा परिषदेचा गौरव केंद्र व राज्याच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पार पडलेल्या सोहळ्यात केला. राज्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महानायक अमिताभ बच्चन यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र देऊन मुख्य कार्यकारी अधिकारी व त्यांच्या चमूला गौरविण्यात आले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंग तोमर, राज्याचे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, ना.सदाभाऊ खोत, केंद्रीय सचिव परमानंद अय्यर, राज्याचे प्रधान सचिव राजेशकुमार, वासोचे संचालक डॉ.सतिश उमरीकर, जलस्वराजचे प्रमुख राघवन यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज सूर्यवंशी यांना महानायक अमिताभ बच्चन यांच्या हस्ते माझा महाराष्ट्र स्वच्छ महाराष्ट्र हे सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी शहद अहिरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर आडे तसेच जिल्हा कक्षाची चमू उपस्थित होती. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २ आॅक्टोबर २०१९ पर्यंत संपूर्ण देश हागणदारीमुक्त करण्याचे आवाहन केले आहे. या अभियानाच्या अनुषंगाने सरकारने सन २०१६-१७ मध्ये १० जिल्ह्याची निवड केली होती. यात भंडारा जिल्ह्याचा समावेश होता. या अनुषंगाने जिल्ह्याचे ३१ मार्च २०१७ पर्यंत संपूर्ण जिल्हा हागणदारीमुक्त घोषित करण्यात आला आहे. सन २०१६-१७ या वर्षात जिल्हा परिषद अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनात हे अभियान यशस्वीपणे राबविण्यात आले. संपूर्ण हागणदारीमुक्त ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हे अतिशय महत्वाची बाब असून स्वच्छ भारत अभियानाच्या यशस्वितेची वाटचाल आहे.संपूर्ण जिल्हा हागणदारी मुक्त करण्याच्या दृष्टीने पाणी व स्वच्छता मिशन कक्षाने कृती आराखडा तयार करून योग्य पद्धतीने अंमलबजावणी केली. तसेच गावकऱ्यांच्या भागीदारीने व प्रशासनाच्या उत्तम नियोजनामुळे जिल्हा हागणदारीमुक्ती मुक्त होऊ शकला. जिल्हा परिषदेत राबविणार स्वच्छता अभियानजिल्हा परिषद कार्यालयात महिन्यातून एकदा स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सहभाग राहणार आहे. तसेच सर्व पंचायत समिती कार्यालयातही ही मोहिम हाती घेण्यात येणार आहे. यामुळे परिसर स्वच्छ राहून आरोग्य व कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेत भर पडणार आहे. जिल्हा परिषद इमारतीच्या छतावरील पाणी वाया जावू नये यासाठी रेन हार्व्हेस्टिंग करण्याची योजना असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज सूर्यवंशी यांनी दिली. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) मंजुषा ठवकर उपस्थित होत्या.