शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

भंडारा जिल्ह्यात वन्यप्राण्यांमुळे उभ्या पिकांची नासाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2019 20:14 IST

तीन अभयारण्य आणि दहा वनपरिक्षेत्रात विभागलेल्या भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांपुढे वन्यप्राण्यांचे संकट वर्षानुवर्ष कायम आहे.

ठळक मुद्देभरपाईसाठी पायपीटरानडुकरांमुळे शेतकरी हैराण

देवानंद नंदेश्वर।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : तीन अभयारण्य आणि दहा वनपरिक्षेत्रात विभागलेल्या भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांपुढे वन्यप्राण्यांचे संकट वर्षानुवर्ष कायम आहे. उभ्या पिकात शिरून पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी केली जात असून रानडुकरांमुळे तर शेतकरी हैराण झाले आहेत. वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा तर वन्यजीव विभागाचे कायदे आड येतात. दुसरीकडे नुकसानभरपाईसाठी शेतकऱ्यांना पायपीट करावी लागते.भंडारा हा प्रमुख धान उत्पादक जिल्हा आहे. यासोबतच जिल्ह्यात भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात पीक घेतले जाते. बहुतांश शेतीही जंगलालगत आहे. जंगलातील रानडुक्कर, हरिण, माकड आदी प्राणी शेतात शिरून पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी करतात. धानाचे पीक हे अत्यंत नाजूक असते. एकदा खाली पडले की ते उभे होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. रानडुकरांचा कळप शेतात शिरला की धानाचे पट च्या पट आडवे पाडले जातात. तसेच भाजीपाला पिकात हरिणासह इतर प्राणी शिरून मोठे नुकसान करतात. तृणभक्षी प्राण्यासोबतच हिंस्त्र प्राण्यांचीही भीती कायम असते. वाघ, बिबट आदी प्राणी शेतशिवारानजीक दिसले की शेतात जायला भीती निर्माण होते. मजूर तर शेतात यायला तयार नसतात.भंडारा जिल्ह्यात नागझिरा व नवेगाव व्याघ्र प्रकल्प, कोका अभयारण्य आणि उमरेड कºहांडला अभयारण्य आहे. याठिकाणी वन्यप्राण्यांचा मुक्त अधिवास असतो. उन्हाळ्याच्या दिवसात प्राणी शेतशिवारात फिरून मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. शेतकरी या वन्य प्राण्यांपासून रक्षण करण्यासाठी विविध उपाय योजतात. परंतु त्यात यश येत नाही. वन्यप्राण्यांची शिकार झाली तर शेतकऱ्यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जाते. त्यामुळे अनेक शेतकरी पीक वाऱ्यावर सोडून शेती करताना दिसून येतात. वन्यप्राण्यांची शेतीपिकांचे नुकसान केले तर वनविभागामार्फत भरपाई दिली जाते. परंतु या भरपाईसाठी शेतकऱ्यांना महिनोंमहिने पायपीट करावी लागते. ही प्रक्रिया अत्यंत किचकट असल्याने अनेक शेतकरी तक्रार करण्यासही पुढे येत नाही.जिल्ह्यात १२०० चौरस किमी वनक्षेत्रभंडारा जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र ३ हजार ७१६.६५ चौरस किलोमीटर आहे. त्यापैकी १२०३.५५६ चौरस किलोमीटर वनक्षेत्र आहे. त्यात वन्यजीव विभागाकडे २२५.४८२ चौरस किलोमीटर तर मोहघाट रिसर्च सेंटरकडे ४.७८४ चौरस किलोमीटर वनक्षेत्र आहे. २७७.७६७ चौरस किलोमीटरमध्ये संरक्षीत वन आणि ९९.६५४ किमीमध्ये झुडूपी जंगल आहे. या जंगलात मोठ्या प्रमाणात वन्यजीवांचा मुक्त संचार सुरु असतो आणि हेच प्राणी शेतात शिरून नुकसान करतात.

टॅग्स :agricultureशेती