शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
2
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
3
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
4
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
5
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
6
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
7
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
8
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
9
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
10
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
11
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
12
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
13
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
14
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
15
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
16
भारतीय ऑटो बाजारातील सर्वात मोठी बातमी! फोक्सवॅगनची हजारो कर्मचाऱ्यांना व्हीआरएसची ऑफर, फोर्डच्याच वाटेवर?
17
पुतिन मायदेशी परतताच भारताने तयार केली ३०० वस्तूंची यादी, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन
18
१६ डिसेंबर पासून सुरु होत आहे धनुर्मास; आहार, आरोग्य, लक्ष्मी उपासनेसाठी महत्त्वाचा महिना!
19
Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा अपमान; बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजी करण्यापासून रोखलं! नेमकं प्रकरण काय?
20
भारताच्या निर्यातीला मोठा 'बूस्ट'! नोव्हेंबरमध्ये १९.३७% ची वाढ; व्यापार तुटीतही मोठा दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

भंडारा जिल्ह्यात वन्यप्राण्यांमुळे उभ्या पिकांची नासाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2019 20:14 IST

तीन अभयारण्य आणि दहा वनपरिक्षेत्रात विभागलेल्या भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांपुढे वन्यप्राण्यांचे संकट वर्षानुवर्ष कायम आहे.

ठळक मुद्देभरपाईसाठी पायपीटरानडुकरांमुळे शेतकरी हैराण

देवानंद नंदेश्वर।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : तीन अभयारण्य आणि दहा वनपरिक्षेत्रात विभागलेल्या भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांपुढे वन्यप्राण्यांचे संकट वर्षानुवर्ष कायम आहे. उभ्या पिकात शिरून पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी केली जात असून रानडुकरांमुळे तर शेतकरी हैराण झाले आहेत. वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा तर वन्यजीव विभागाचे कायदे आड येतात. दुसरीकडे नुकसानभरपाईसाठी शेतकऱ्यांना पायपीट करावी लागते.भंडारा हा प्रमुख धान उत्पादक जिल्हा आहे. यासोबतच जिल्ह्यात भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात पीक घेतले जाते. बहुतांश शेतीही जंगलालगत आहे. जंगलातील रानडुक्कर, हरिण, माकड आदी प्राणी शेतात शिरून पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी करतात. धानाचे पीक हे अत्यंत नाजूक असते. एकदा खाली पडले की ते उभे होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. रानडुकरांचा कळप शेतात शिरला की धानाचे पट च्या पट आडवे पाडले जातात. तसेच भाजीपाला पिकात हरिणासह इतर प्राणी शिरून मोठे नुकसान करतात. तृणभक्षी प्राण्यासोबतच हिंस्त्र प्राण्यांचीही भीती कायम असते. वाघ, बिबट आदी प्राणी शेतशिवारानजीक दिसले की शेतात जायला भीती निर्माण होते. मजूर तर शेतात यायला तयार नसतात.भंडारा जिल्ह्यात नागझिरा व नवेगाव व्याघ्र प्रकल्प, कोका अभयारण्य आणि उमरेड कºहांडला अभयारण्य आहे. याठिकाणी वन्यप्राण्यांचा मुक्त अधिवास असतो. उन्हाळ्याच्या दिवसात प्राणी शेतशिवारात फिरून मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. शेतकरी या वन्य प्राण्यांपासून रक्षण करण्यासाठी विविध उपाय योजतात. परंतु त्यात यश येत नाही. वन्यप्राण्यांची शिकार झाली तर शेतकऱ्यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जाते. त्यामुळे अनेक शेतकरी पीक वाऱ्यावर सोडून शेती करताना दिसून येतात. वन्यप्राण्यांची शेतीपिकांचे नुकसान केले तर वनविभागामार्फत भरपाई दिली जाते. परंतु या भरपाईसाठी शेतकऱ्यांना महिनोंमहिने पायपीट करावी लागते. ही प्रक्रिया अत्यंत किचकट असल्याने अनेक शेतकरी तक्रार करण्यासही पुढे येत नाही.जिल्ह्यात १२०० चौरस किमी वनक्षेत्रभंडारा जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र ३ हजार ७१६.६५ चौरस किलोमीटर आहे. त्यापैकी १२०३.५५६ चौरस किलोमीटर वनक्षेत्र आहे. त्यात वन्यजीव विभागाकडे २२५.४८२ चौरस किलोमीटर तर मोहघाट रिसर्च सेंटरकडे ४.७८४ चौरस किलोमीटर वनक्षेत्र आहे. २७७.७६७ चौरस किलोमीटरमध्ये संरक्षीत वन आणि ९९.६५४ किमीमध्ये झुडूपी जंगल आहे. या जंगलात मोठ्या प्रमाणात वन्यजीवांचा मुक्त संचार सुरु असतो आणि हेच प्राणी शेतात शिरून नुकसान करतात.

टॅग्स :agricultureशेती