शहरं
Join us  
Trending Stories
1
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
2
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
3
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
4
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
5
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
6
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
7
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
8
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
9
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
10
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
11
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
12
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
13
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
14
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
15
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
16
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
17
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
18
“मुंबई महापालिका कुणी लुटली, हे मुंबईच्या जनतेला माहिती आहे”; संजय राऊतांचा पलटवार
19
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
20
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस

भंडारा जिल्ह्यात वन्यप्राण्यांमुळे उभ्या पिकांची नासाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2019 20:14 IST

तीन अभयारण्य आणि दहा वनपरिक्षेत्रात विभागलेल्या भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांपुढे वन्यप्राण्यांचे संकट वर्षानुवर्ष कायम आहे.

ठळक मुद्देभरपाईसाठी पायपीटरानडुकरांमुळे शेतकरी हैराण

देवानंद नंदेश्वर।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : तीन अभयारण्य आणि दहा वनपरिक्षेत्रात विभागलेल्या भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांपुढे वन्यप्राण्यांचे संकट वर्षानुवर्ष कायम आहे. उभ्या पिकात शिरून पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी केली जात असून रानडुकरांमुळे तर शेतकरी हैराण झाले आहेत. वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा तर वन्यजीव विभागाचे कायदे आड येतात. दुसरीकडे नुकसानभरपाईसाठी शेतकऱ्यांना पायपीट करावी लागते.भंडारा हा प्रमुख धान उत्पादक जिल्हा आहे. यासोबतच जिल्ह्यात भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात पीक घेतले जाते. बहुतांश शेतीही जंगलालगत आहे. जंगलातील रानडुक्कर, हरिण, माकड आदी प्राणी शेतात शिरून पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी करतात. धानाचे पीक हे अत्यंत नाजूक असते. एकदा खाली पडले की ते उभे होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. रानडुकरांचा कळप शेतात शिरला की धानाचे पट च्या पट आडवे पाडले जातात. तसेच भाजीपाला पिकात हरिणासह इतर प्राणी शिरून मोठे नुकसान करतात. तृणभक्षी प्राण्यासोबतच हिंस्त्र प्राण्यांचीही भीती कायम असते. वाघ, बिबट आदी प्राणी शेतशिवारानजीक दिसले की शेतात जायला भीती निर्माण होते. मजूर तर शेतात यायला तयार नसतात.भंडारा जिल्ह्यात नागझिरा व नवेगाव व्याघ्र प्रकल्प, कोका अभयारण्य आणि उमरेड कºहांडला अभयारण्य आहे. याठिकाणी वन्यप्राण्यांचा मुक्त अधिवास असतो. उन्हाळ्याच्या दिवसात प्राणी शेतशिवारात फिरून मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. शेतकरी या वन्य प्राण्यांपासून रक्षण करण्यासाठी विविध उपाय योजतात. परंतु त्यात यश येत नाही. वन्यप्राण्यांची शिकार झाली तर शेतकऱ्यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जाते. त्यामुळे अनेक शेतकरी पीक वाऱ्यावर सोडून शेती करताना दिसून येतात. वन्यप्राण्यांची शेतीपिकांचे नुकसान केले तर वनविभागामार्फत भरपाई दिली जाते. परंतु या भरपाईसाठी शेतकऱ्यांना महिनोंमहिने पायपीट करावी लागते. ही प्रक्रिया अत्यंत किचकट असल्याने अनेक शेतकरी तक्रार करण्यासही पुढे येत नाही.जिल्ह्यात १२०० चौरस किमी वनक्षेत्रभंडारा जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र ३ हजार ७१६.६५ चौरस किलोमीटर आहे. त्यापैकी १२०३.५५६ चौरस किलोमीटर वनक्षेत्र आहे. त्यात वन्यजीव विभागाकडे २२५.४८२ चौरस किलोमीटर तर मोहघाट रिसर्च सेंटरकडे ४.७८४ चौरस किलोमीटर वनक्षेत्र आहे. २७७.७६७ चौरस किलोमीटरमध्ये संरक्षीत वन आणि ९९.६५४ किमीमध्ये झुडूपी जंगल आहे. या जंगलात मोठ्या प्रमाणात वन्यजीवांचा मुक्त संचार सुरु असतो आणि हेच प्राणी शेतात शिरून नुकसान करतात.

टॅग्स :agricultureशेती