शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

भंडारा शहरातील ‘हायवे’ होणार ‘फोरवे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 05:00 IST

भंडारा शहरातून मुंबई-कोलकाता हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ जातो. मुजबीपासून ते शिंगोरीपर्यंत हा राष्ट्रीय महामार्ग दुपदरी आहे. भंडारा शहराच्या मध्य भागातून हा रस्ता जातो. अहोरात्र या रस्त्यावर वाहनांची वर्दळ असते. अपघाताचे प्रमाण मोठे आहे. गत सहा महिन्यात या रस्त्यावर ८४ अपघात होऊन ७२ व्यक्तींचा मृत्यू झाला. आता अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी या रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात येणार आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाने ७० कोटी रुपये मंजूर केले असून या निधीतून ५.८ किमी रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे७० कोटी मंजूर : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाच्या निधीतून ५.८ किमी रस्ता

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : अपघातासाठी कुप्रसिद्ध असलेल्या भंडारा शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे आता भाग्य फळफळणार आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाने या रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी ७० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे ५.८ किमी हायवे आता फोरवे होणार आहे. या रस्त्याच्या कामाला प्रारंभ होणार आहे. जिल्हा सुरक्षा समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी ही माहिती दिली. भंडारा शहरातून मुंबई-कोलकाता हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ जातो. मुजबीपासून ते शिंगोरीपर्यंत हा राष्ट्रीय महामार्ग दुपदरी आहे. भंडारा शहराच्या मध्य भागातून हा रस्ता जातो. अहोरात्र या रस्त्यावर वाहनांची वर्दळ असते. अपघाताचे प्रमाण मोठे आहे. गत सहा महिन्यात या रस्त्यावर ८४ अपघात होऊन ७२ व्यक्तींचा मृत्यू झाला. आता अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी या रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात येणार आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाने ७० कोटी रुपये मंजूर केले असून या निधीतून ५.८ किमी रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात येणार आहे. या रस्त्याचे काम लवकरच सुरू करण्यासाठी प्रयत्न करावे, अशी सूचना  दिली.या बैठकीला उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र वर्मा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आर. एस. फारूखी, उपविभागीय अभियंता अ.द. गणगे, पोलीस उपनिरीक्षक महामार्ग अमित पांडे, उपविभागीय अभियंता महामार्ग संजीव जगताप, आगार व्यवस्थापक फाल्गुन राखडे, नगर अभियंता अतुल पाटील, उपशिक्षणाधिकारी आर.बी. भांबोरे, प्रभारी पोलीस उपअधीक्षक गृह राजेश थोरात, वाहतूक शाखेचे प्रमुख शिवाजी कदम आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे राजन पाली उपस्थित होते. 

सहा महिन्यात  १५८ रस्ते अपघात- जानेवारी ते मे या सहा महिन्याच्या कालावधीत १५८ रस्ते अपघात झाले. गतवर्षीपेक्षा अपघातात २७ ने वाढ झाली. बहुतांश अपघात राष्ट्रीय महामार्गावरील आहेत. या अपघातात ७२ व्यक्तींनी आपला जीव गमावला आहे. गत वर्षी जानेवारी ते मे या कालावधीत ५५ व्यक्तीचा अपघातात जीव गेला होता. 

 

टॅग्स :highwayमहामार्ग