शहरं
Join us  
Trending Stories
1
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
2
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
3
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
4
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
5
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
6
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
7
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
8
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
9
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
10
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
11
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
12
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
13
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
14
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
15
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
16
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
17
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
18
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
19
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
20
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?

भंडारा शहरातील ‘हायवे’ होणार ‘फोरवे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 05:00 IST

भंडारा शहरातून मुंबई-कोलकाता हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ जातो. मुजबीपासून ते शिंगोरीपर्यंत हा राष्ट्रीय महामार्ग दुपदरी आहे. भंडारा शहराच्या मध्य भागातून हा रस्ता जातो. अहोरात्र या रस्त्यावर वाहनांची वर्दळ असते. अपघाताचे प्रमाण मोठे आहे. गत सहा महिन्यात या रस्त्यावर ८४ अपघात होऊन ७२ व्यक्तींचा मृत्यू झाला. आता अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी या रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात येणार आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाने ७० कोटी रुपये मंजूर केले असून या निधीतून ५.८ किमी रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे७० कोटी मंजूर : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाच्या निधीतून ५.८ किमी रस्ता

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : अपघातासाठी कुप्रसिद्ध असलेल्या भंडारा शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे आता भाग्य फळफळणार आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाने या रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी ७० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे ५.८ किमी हायवे आता फोरवे होणार आहे. या रस्त्याच्या कामाला प्रारंभ होणार आहे. जिल्हा सुरक्षा समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी ही माहिती दिली. भंडारा शहरातून मुंबई-कोलकाता हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ जातो. मुजबीपासून ते शिंगोरीपर्यंत हा राष्ट्रीय महामार्ग दुपदरी आहे. भंडारा शहराच्या मध्य भागातून हा रस्ता जातो. अहोरात्र या रस्त्यावर वाहनांची वर्दळ असते. अपघाताचे प्रमाण मोठे आहे. गत सहा महिन्यात या रस्त्यावर ८४ अपघात होऊन ७२ व्यक्तींचा मृत्यू झाला. आता अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी या रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात येणार आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाने ७० कोटी रुपये मंजूर केले असून या निधीतून ५.८ किमी रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात येणार आहे. या रस्त्याचे काम लवकरच सुरू करण्यासाठी प्रयत्न करावे, अशी सूचना  दिली.या बैठकीला उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र वर्मा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आर. एस. फारूखी, उपविभागीय अभियंता अ.द. गणगे, पोलीस उपनिरीक्षक महामार्ग अमित पांडे, उपविभागीय अभियंता महामार्ग संजीव जगताप, आगार व्यवस्थापक फाल्गुन राखडे, नगर अभियंता अतुल पाटील, उपशिक्षणाधिकारी आर.बी. भांबोरे, प्रभारी पोलीस उपअधीक्षक गृह राजेश थोरात, वाहतूक शाखेचे प्रमुख शिवाजी कदम आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे राजन पाली उपस्थित होते. 

सहा महिन्यात  १५८ रस्ते अपघात- जानेवारी ते मे या सहा महिन्याच्या कालावधीत १५८ रस्ते अपघात झाले. गतवर्षीपेक्षा अपघातात २७ ने वाढ झाली. बहुतांश अपघात राष्ट्रीय महामार्गावरील आहेत. या अपघातात ७२ व्यक्तींनी आपला जीव गमावला आहे. गत वर्षी जानेवारी ते मे या कालावधीत ५५ व्यक्तीचा अपघातात जीव गेला होता. 

 

टॅग्स :highwayमहामार्ग