शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
2
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
3
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
4
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन
5
भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला!
6
India Pakistan War: पाकिस्तानचा रडीचा डाव, अंधार पडताच केला हल्ला; काय काय घडलं, पहा व्हिडीओ
7
युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...
8
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला; पाकने राजस्थान बॉर्डरच्या दिशेने पाठवले रणगाडे, भारतीय सैन्यही सज्ज
9
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
10
ऑपरेशन सिंदूरबाबत मोठी अपडेट! भारताने हल्ल्यात दोन पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली
11
पाकिस्तान सुधरेना, जम्मू विमानतळावर हल्ल्याचा प्रयत्न, नियंत्रण रेषेपलीकडून भीषण गोळीबार
12
भारताने हाणून पाडला 'नापाक' हल्ल्याचा प्रयत्न! 'या' ठिकाणी पाकिस्तानची मिसाईल्स केली नष्ट
13
Video: सायरन वाजले!! पाकिस्तानची ८ मिसाईल्स भारताने पाडली, 'नापाक' हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर
14
IPL 2025 PBKS vs DC : पंजाब-दिल्ली यांच्यातील सामना अचानक थांबवण्याची वेळ: नेमकं काय घडलं?
15
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
16
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
17
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
18
मैत्रिणींनी केला घात! ठाण्यात नशेचे इंजेक्शन देऊन तरुणीवर सामूहिक बलात्कार
19
लालू प्रसाद यादव पुन्हा अडचणीत; राष्ट्रपतींनी 'या' प्रकरणात खटला चालवण्याची दिली परवानगी
20
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   

भंडारावासी दूषित पाणी पिण्यास बाध्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 23:25 IST

शुद्ध पाण्यासाठी भंडारावासीयांचे नशीब बलवत्तर नाही, असे म्हणण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्देपालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष : विविध आजारांना खतपाणी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शुद्ध पाण्यासाठी भंडारावासीयांचे नशीब बलवत्तर नाही, असे म्हणण्याची वेळ आली आहे. या उपरही भंडारावासीयांना दूषित पाणी पिण्यास पालिका प्रशासन बाध्य करीत आहे की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कुठे काळेकुट्ट पाणीपुरवठा तर कुठे पाण्यासाठी बोंब ही बाब नित्याचीच झाली आहे.दीड लाखांपेक्षा जास्त लोकवस्ती असलेल्या भंडारा शहरात पाण्याची ही मुख्य समस्या आहे. परंतु ही समस्या सोडविण्यास पालिका प्रशासन सपेशल फेल ठरली आहे. सत्ता कुणाचीही असो, मुलभूत सुविधांच्या विशेषत: जल हे जीवन आहे, असे म्हणत असतानाही शुद्ध पाण्याच्या पुरवठेबाबत पालिकेने कधीही गांभीर्याने घेतले नाही. दोन दशकांपासून पाण्याची समस्या हळूहळू उग्र रूप धारण करीत असताना भविष्यकालीन वाढीव पाणीपुरवठा योजना कागदावरच रंगविण्यात आल्या.नवीन योजना मंजुर व्हायला व कार्यान्वीत व्हायला बराच कालावधी शिल्लक असताना तोपर्यंत नागरिकांनी फेसाळयुक्त व घाण पाणी प्यायचे काय, असा संतप्त सवाल नागरिक विचारू लागले आहे. पाण्यासाठी पालिकेसमोर आंदोलन करणारेही आता का बोलत नाही, हा मुख्य प्रश्नही भंडारेकरांना सतावत आहे.युद्ध पातळीवर पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी लिकेज शोधत असले तरी त्यावर कधीही शंभर टक्के निराकरण होणे अशक्य बाब आहे. जलशुद्धीकरणाची क्षमताही योग्य असली तरी कालबाह्य झालेल्या जलवाहिन्यांमुळे हजारो नागरिकांचा जीव दूषित पाण्यामुळे धोक्यात आला आहे.शहरातील मोठा बाजार परिसर, माधवनगर परिसर, खात रोड, शुक्रवारी परिसर, मेंढा परिसरासह शहरातील बहुतांश भागात दूषित पाणीपुरवठा होत आहे.मेंढा येथे पाण्यासाठी हाहाकारशहराच्या पूर्व उत्तर दिशेला वसलेल्या मेंढा परिसरात मागील दहा दिवसांपासून अत्यल्प पाणीपुरवठा होत आहे. नगरपालिकेचे पदाधिकारी याकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत आहे. नागरिक पाण्यासाठी तरसत असताना पालिका प्रशासनाचे दुटप्पी धोरण नागरिकांच्या जीवावर बेतले आहे. महिला-पुरूष सकाळपासून पाण्यासाठी वनवन भटकंती करताना दिसून येतात. याबाबत पालिका प्रशासनाला कळवूनही पाणीपुरवठ्याबाबत गांभीर्याने घेतलेले नाही.