शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

भंडारा-बालाघाट रस्त्याचे होणार चौपदरीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:40 IST

चुल्हाड (सिहोरा) : भंडारा-बपेरा-बालाघाट या १०६ किमी अंतराच्या राज्यमार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात आल्यानंतर रस्त्याच्या कडेला असणाऱ्या व्यावसायिकांत चौपदरीकरण ...

चुल्हाड (सिहोरा) : भंडारा-बपेरा-बालाघाट या १०६ किमी अंतराच्या राज्यमार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात आल्यानंतर रस्त्याच्या कडेला असणाऱ्या व्यावसायिकांत चौपदरीकरण रस्ता बांधकामावरून चिंता वाढली आहे. यात अनेक दुकान आणि घरांवर बुलडोझर चालणार असल्याने अनेकांची झोपच उडाली आहे. सिहोरा परिसरात अनेक नवीन घरांचे बांधकाम थांबविण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. किती मीटर रुंदीकरण असणार अशी चौकशी नागरिक करत आहेत. रस्ता चौपदरीकरणाची मागणी जुनीच आहे.

भंडारा-बपेरा-बालाघाट हा राज्यमार्ग राष्ट्रीय महामार्ग घोषित करण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विटरवरून दिली असता श्रेय घेण्यासाठी आता चढाओढ सुरू झाली आहे. सत्तापक्ष व विरोधी पक्षातील नेत्यांनी श्रेयासाठी प्रयत्न सुरू केला आहे. चौपदरीकरण रस्ता बांधमाला सुरुवात झाल्यास अनेक दुकाने, घरे, शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, शाळा, कॉलेज व अन्य इमारतींवर बुलडोझर चालणार आहे. चौपदरीकरण महामार्गाचे रुंदीवरून अनेक कयास लावले जात आहेत.

बपेरा सीमा आंतरराज्यीय असल्याने चेक पोस्ट लागणार की नाही, अशा चर्चा रंगल्या आहेत. रस्त्याचे चौपदरीकरण होणार असल्याने मार्गाच्या कडेची कामे व्यावसायिकांनी थांबविली आहेत. अनेकांची घरे व दुकाने तोडण्यात येणार असल्याने नागरिकांची झोप उडाली आहे. अनेक व्यावसायिकांनी नव्या जागेचा शोध सुरू केला आहे. नागरिकांनी नवीन घरांचे बांधकाम थांबविले आहे. चौपदरीकरण रस्ता बांधकामामुळे सर्वाधिक फटका ग्रामपंचायतच्या गाळे बांधकामाला बसणार आहे. रस्ता बांधकाम मंजुरीने नागरिक, व्यावसायिकांत कही खुशी, कही गम असे चित्र आहे.

बाक्स

तीर्थक्षेत्र, पर्यटनस्थळे वाढणार

सिहोरा परिसरातून जाणाऱ्या राज्यमार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात आल्यानंतर चौपदरीकरण होणार आहे. बावणथडी नदीवरील पुलाचे बांधकाम पुन्हा नव्याने होणार असले तरी या परिसरात रोजगाराच्या संधी नाहीत. राष्ट्रीय महामार्ग या संधी उपलब्ध करणार आहे. ग्रीन व्हॅली चांदपूर पर्यटनस्थळ, जागृत हनुमान देवस्थान तीर्थक्षेत्र भक्त भाविक, पर्यटकांनी फुलणार आहे. याच मार्गावर कान्हा किसली व्याघ्र प्रकल्प असल्याने पर्यटनाची संधी उपलब्ध होणार आहे. ग्रीन व्हॅली चांदपूर पर्यटन विकासाकरिता राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे. पर्यटनस्थळ राज्य शासनाच्या अखत्यारित येत असल्याने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला हस्तांतरण करण्यात आल्याने विकासकार्याची अपेक्षा आहे. मार्गावरील ग्रीन व्हॅली चांदपूर, तीर्थक्षेत्र विकासकामासाठी निधी उपलब्ध करण्याची मागणी युवानेते किशोर राहगडाले, ग्रामपंचायत सदस्य शीतल चिंचखेडे, सरपंच ऊर्मिला लांजे, सरपंच ममता राऊत यांनी केली आहे.