शहरं
Join us  
Trending Stories
1
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
2
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
3
"विविहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
4
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
5
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
6
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
7
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
8
भारतीय ऑटो बाजारातील सर्वात मोठी बातमी! फोक्सवॅगनची हजारो कर्मचाऱ्यांना व्हीआरएसची ऑफर, फोर्डच्याच वाटेवर?
9
पुतिन मायदेशी परतताच भारताने तयार केली ३०० वस्तूंची यादी, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन
10
१६ डिसेंबर पासून सुरु होत आहे धनुर्मास; आहार, आरोग्य, लक्ष्मी उपासनेसाठी महत्त्वाचा महिना!
11
Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा अपमान; बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजी करण्यापासून रोखलं! नेमकं प्रकरण काय?
12
भारताच्या निर्यातीला मोठा 'बूस्ट'! नोव्हेंबरमध्ये १९.३७% ची वाढ; व्यापार तुटीतही मोठा दिलासा
13
MNS: मनपा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी मोठा राडा! आयोगाच्या कार्यालयात मनसेची तोडफोड, काय घडलं?
14
याला म्हणतात ढासू स्टॉक...! पॉवर कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 30% नं वधारला; दिलाय 6500% चा बंपर परतावा, करतोय मालामाल
15
"मुलाचे कान धरू शकतो, सूनेचे धरू शकत नाही; मी उद्धव ठाकरेंना कॉल करून..."; विनोद घोसाळकरांच्या डोळ्यात पाणी
16
'मनरेगा' बंद! मोदी सरकार आणणार 'विकसित भारत-जी राम जी' योजना; राज्यांवर पडणार अतिरिक्त भार
17
"मी पोहून आलो, सकाळी घरी..."; बॉन्डी बीचवर हल्ला करण्यापूर्वी दहशतवाद्याचा आईला कॉल
18
लेडी सेहवागची कमाल! वर्ल्ड कपमध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री; एका मॅचमधील धमाक्यासह जिंकला ICC पुरस्कार
19
ना स्वतःचे विमानतळ, ना चलन, ना भाषा..; तरीदेखील 'हा' आहे युरोपमधील सर्वात श्रीमंत देश
20
Astrology: नवीन वर्षात नवीन वास्तूमध्ये प्रवेश करण्यासाठी २०२६ मधील तारखा आणि शुभ मुहूर्त 
Daily Top 2Weekly Top 5

खबरदार! उघड्यावर शौचास बसाल तर

By admin | Updated: December 21, 2014 22:55 IST

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियान सुरू केल्याने राज्यातसुद्धा त्याची अंमलबजावणी होताना दिसत आहे. आपले गाव स्वच्छ, सुंदर व हागणदारी मुक्त व्हावे, यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक गावात प्रयत्न सुरू आहेत.

भंडारा : केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियान सुरू केल्याने राज्यातसुद्धा त्याची अंमलबजावणी होताना दिसत आहे. आपले गाव स्वच्छ, सुंदर व हागणदारी मुक्त व्हावे, यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक गावात प्रयत्न सुरू आहेत. यात प्रशासनाने सदर अभियान अधिक तीव्र करीत उघड्यावर शौच्छास बसल्यास १ हजार २०० रुपये दंड ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या नियमाची ग्रामीण भागातील नागरिकांनी चांगलीच धास्ती घेतल्याचे चित्र सर्वत्र आहे. ‘१२ हजार रुपयांचे अनुदान घ्या व शौचालय बांधा’ असे फर्मान जिल्हा परिषद प्रशासनाने काढल्याने शौचालयाच्या पूर्ततेसाठी शासकीय यंत्रणा कामाला लागली आहे.रस्त्यात सांडपाणी सोडणे, सार्वजनिक उघड्या जागेवर, घराजवळ लोकांच्या ये-जा करण्याच्या ठिकाणी शौच्छास बसणे, मलमूत्र विसर्जन करणे, रस्त्यावर थुंकणे, प्लास्टिक कागद, केरकचरा उघड्यावर टाकणे आदी बाबी आढळल्यास पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ११५ ख ११७ नुसार एक हजार २०० रुपये दंड ठोठावण्याची तरतूद नव्या नियमात करण्यात आली आहे. उघड्यावर शौच्छास बसल्यास बाहेरची घाण माशीद्वारे घरात शिरते व विविध रोगांचा प्रादुर्भाव जाणवतो. हगवण, कॉलरा, टायफाईड, पोटदुखी आदी रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. तसेच घरासमोरील तसेच परिसरात अस्वच्छता असेल तर विविध आजारांची नागरिकांना लागण होते. त्यामुळे स्वच्छता व शौचाालय ही बाब मानवी जीवनासाठी महत्वाची आहे. त्याची अंमलबजावणी आता तिव्रतेने केली जात आहे. विशेषत: शौचालयासाठी नागरिकांमध्ये याविषयी जनजागृती करीत आहेत. त्याला नागरिकांचा प्रतिसाद देखील मिळत आहे. या योजनेला व्यापक स्वरूप यावे, यासाठी महसूल कर्मचारी, वनविभागाचे कर्मचारी तसेच जिल्हा परिषदेंतर्गत येणारे सर्व कर्मचारी यात विशेषत: शाळेतील शिक्षक व ग्रामसेवक यांना शौचालयाच्या पूर्ततेसाठी विशेष प्रयत्न करण्यासाठी आग्रह केला जाणार असल्याचे संकेत जिल्हा परिषद प्रशासनाने दिले आहेत. (शहर प्रतिनिधी)कर्मचारी सरसावलेग्रामीण भागात सध्या १२ हजार रुपये अनुदान घ्या व शौचालय बांधा या योजनेवर विशेष भर दिला असल्याने ग्रामीण भागात शौचालयाच्या पुतर्तेसाठी कर्मचाऱ्यांची धावपळ सुरू असल्याचे दिसून येते. प्रतिव्यक्ती एक हजार २०० रुपये दंड असल्याने मोलमजुरी करून राबणाऱ्या व्यक्तीला शौचालय बांधणे अत्यंत आवश्यक झाले आहे. शौचालय बांधून ते सहकार्य करतील, अशी अपेक्षा आहे. जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील सर्व गावांना स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत एक स्लोगनरूपी संदेश पाठविला आहे. या संदेशातून महिलांची लाज राखण्यासाठी तरी शौचालय बांधा. ही बाब प्रकर्षाने यातून सांगण्यात आली आहे.