शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

खबरदार! उघड्यावर शौचास बसाल तर

By admin | Updated: December 21, 2014 22:55 IST

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियान सुरू केल्याने राज्यातसुद्धा त्याची अंमलबजावणी होताना दिसत आहे. आपले गाव स्वच्छ, सुंदर व हागणदारी मुक्त व्हावे, यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक गावात प्रयत्न सुरू आहेत.

भंडारा : केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियान सुरू केल्याने राज्यातसुद्धा त्याची अंमलबजावणी होताना दिसत आहे. आपले गाव स्वच्छ, सुंदर व हागणदारी मुक्त व्हावे, यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक गावात प्रयत्न सुरू आहेत. यात प्रशासनाने सदर अभियान अधिक तीव्र करीत उघड्यावर शौच्छास बसल्यास १ हजार २०० रुपये दंड ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या नियमाची ग्रामीण भागातील नागरिकांनी चांगलीच धास्ती घेतल्याचे चित्र सर्वत्र आहे. ‘१२ हजार रुपयांचे अनुदान घ्या व शौचालय बांधा’ असे फर्मान जिल्हा परिषद प्रशासनाने काढल्याने शौचालयाच्या पूर्ततेसाठी शासकीय यंत्रणा कामाला लागली आहे.रस्त्यात सांडपाणी सोडणे, सार्वजनिक उघड्या जागेवर, घराजवळ लोकांच्या ये-जा करण्याच्या ठिकाणी शौच्छास बसणे, मलमूत्र विसर्जन करणे, रस्त्यावर थुंकणे, प्लास्टिक कागद, केरकचरा उघड्यावर टाकणे आदी बाबी आढळल्यास पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ११५ ख ११७ नुसार एक हजार २०० रुपये दंड ठोठावण्याची तरतूद नव्या नियमात करण्यात आली आहे. उघड्यावर शौच्छास बसल्यास बाहेरची घाण माशीद्वारे घरात शिरते व विविध रोगांचा प्रादुर्भाव जाणवतो. हगवण, कॉलरा, टायफाईड, पोटदुखी आदी रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. तसेच घरासमोरील तसेच परिसरात अस्वच्छता असेल तर विविध आजारांची नागरिकांना लागण होते. त्यामुळे स्वच्छता व शौचाालय ही बाब मानवी जीवनासाठी महत्वाची आहे. त्याची अंमलबजावणी आता तिव्रतेने केली जात आहे. विशेषत: शौचालयासाठी नागरिकांमध्ये याविषयी जनजागृती करीत आहेत. त्याला नागरिकांचा प्रतिसाद देखील मिळत आहे. या योजनेला व्यापक स्वरूप यावे, यासाठी महसूल कर्मचारी, वनविभागाचे कर्मचारी तसेच जिल्हा परिषदेंतर्गत येणारे सर्व कर्मचारी यात विशेषत: शाळेतील शिक्षक व ग्रामसेवक यांना शौचालयाच्या पूर्ततेसाठी विशेष प्रयत्न करण्यासाठी आग्रह केला जाणार असल्याचे संकेत जिल्हा परिषद प्रशासनाने दिले आहेत. (शहर प्रतिनिधी)कर्मचारी सरसावलेग्रामीण भागात सध्या १२ हजार रुपये अनुदान घ्या व शौचालय बांधा या योजनेवर विशेष भर दिला असल्याने ग्रामीण भागात शौचालयाच्या पुतर्तेसाठी कर्मचाऱ्यांची धावपळ सुरू असल्याचे दिसून येते. प्रतिव्यक्ती एक हजार २०० रुपये दंड असल्याने मोलमजुरी करून राबणाऱ्या व्यक्तीला शौचालय बांधणे अत्यंत आवश्यक झाले आहे. शौचालय बांधून ते सहकार्य करतील, अशी अपेक्षा आहे. जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील सर्व गावांना स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत एक स्लोगनरूपी संदेश पाठविला आहे. या संदेशातून महिलांची लाज राखण्यासाठी तरी शौचालय बांधा. ही बाब प्रकर्षाने यातून सांगण्यात आली आहे.