शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

दमदार पावसाने रोवणीला वेग

By admin | Updated: July 18, 2016 01:32 IST

गेल्या काही दिवसांपासून पावसाने सतत थैमान घातल्याने रोवणीच्या कामाला वेग आलेला दिसत आहे.

कृषी विभागाचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन : मागील वर्षापेक्षा जास्त पाऊस बोंडगावदेवी : गेल्या काही दिवसांपासून पावसाने सतत थैमान घातल्याने रोवणीच्या कामाला वेग आलेला दिसत आहे. बांध्यांमध्ये भरपूर पाणी आहे. परंतु भाताचे पऱ्हे (नर्सरी) रोवणी योग्य नसल्यामुळे काही शेतकऱ्यांनी रोवणीच्या कामाला सुरुवात केलेली दिसत नाही. कृषी विभागाच्या माहितीनुसार जवळपास आठशे हेक्टरमध्ये रोवणी झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. बऱ्याच लांबणीनंतर परिसरात सतत तीन-चार दिवस पावसाने चांगलीच हजेरी लावली. त्यामुळे शेतकरीबांधवांनी मोठ्या लगबगीने रोवणीच्या कामाला सुरुवात केली. यावर्षीचा शेती हंगाम मागेपुढे सुरू झाल्याने सध्यातरी मजुरांची कमतरता जाणवत नाही. पाहिजे तशी रोवण्याच्या कामाची मजुरी अपेक्षेपेक्षा वाढलेली दिसत नाही. भाताच्या पऱ्हे टाकणीला काही शेतकऱ्यांना विलंब झाल्याने, एकाच वेळी रोवणीच्या कामाला सुरुवात झालेली दिसत नाही. मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील २२ हजार ५८४ हेक्टरमध्ये भाताची लागवड करण्यात आली आहे. यामध्ये २१ हजार ३८४ हेक्टर क्षेत्रामध्ये रोवणी तर १ हजार २०० हेक्टर मध्ये आवत्या पद्धतीने भाताची लागवड करण्यात आली आहे. तालुक्यातील ८०० हेक्टर क्षेत्रामध्ये रोवणी झाली. १३ जुलैपर्यंत तालुक्यात एकूण ४०१.२ मि.मी. पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली आहे. मागील वर्षी याच कालावधीत ३५२.६ मि.मी. पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली होती. मागील वर्षीच्या तुलनेत यावेळी चांगला दमदार पाऊस पडल्याने आजतरी बळीराजा सुखावलेला दिसत आहे. पावसाने उसंत दिल्याने सामान्य माणूस इतर महत्वाच्या कामाला वळलेला दिसतो आहे. याचप्रमाणे पावसाचा वेग पाहीला तर हलक्या धानाची रोवणी होण्याला वेळ लागणार नाही. यामुळे उत्पादनावर कोणताही परिणाम होणार नाही अशी शक्यता कृषी विभाग वर्तवीत आहे. (वार्ताहर) कृषी विभागाकडून जनजागृती कृषी जागृती सप्ताहानिमित्त गावागावात शेतकऱ्यांमध्ये जागृती केली जात आहे. धान रोवणी आदि पऱ्ह्यांमध्ये ५०० मिली क्लोरोफायरी फास्ट २० टक्केची ड्रेनचिंग करावे. जेणेकरुन गादमाशी व खोडकिडा याचे नियंत्रण करता येईल. भात रोवणी करताना मिश्रखताचा व संयुक्त खताचा डोज चिखलावरच द्यावा. उगवठा पूर्ण तननाशकाचा वापर रोवणीनंतर ५ दिवसांच्या आत करावा, अन्यथा करु नये. असा मार्मिक सल्ला तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्यावतीने देण्यात येत आहे.