शहरं
Join us  
Trending Stories
1
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
2
ट्रम्प यांनी भारतावर का लावलंय मोठ्या प्रमाणात टॅरिफ, अखेर व्हाईट हाऊसनं सांगितलं कारण
3
'नोरा फतेहीसारखी फिगर बनव'; पतीने केला पत्नीचा अतोनात छळ, चिडलेल्या तिने शिकवला 'असा' धडा!
4
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
5
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
6
Mumbai Rain Updates Live: मुंबईसाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट, मुंबई रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू
7
गृहकर्जाचे हप्ते डोईजड झालेत? सरकार स्वस्तात देतंय २५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज; कोण घेऊ शकतो लाभ?
8
'मुंबईचा फौजदार' सिनेमाचा रिमेक येणार? गश्मीर म्हणाला- "मी सिनेमा बनवेन पण प्राजक्ता माळीला..."
9
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
10
Ritul: मासिक पाळीदरम्यान केस का धुवू नयेत? जाणून घ्या शास्त्र आणि विज्ञान!
11
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
12
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
13
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
14
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
15
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
16
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
17
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
18
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
19
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
20
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...

वर्षभरात अपत्य झाले तरच लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 23:36 IST

पुरूषोत्तम डोमळे ।लोकमत न्यूज नेटवर्कसानगडी : शीर्षक वाचून आश्चर्य वाटले. परंतू हे सत्य आहे. गोसेखुर्द पुनर्वसन विभागाच्या फतव्यानुसार, लग्नानंतर एका वर्षाच्या आत अपत्य झाल्यास वाढीव कुटुंबांना नोकरी ऐवजी एकमुस्त रकमेचा लाभ मिळणार अन्यथा लाभ मिळणार नाही, असे म्हटले आहे. परिणामी अनेक कुटुंब वाढीव मोबदल्यापासून वंचित आहेत.विदर्भातील महत्वाकांक्षी राष्ट्रीय प्रकल्प गोसेखुर्द ...

ठळक मुद्देगोसेखुर्द पुनर्वसन विभागाचा फतवा : अनेक कुटुंब वाढीव मोबदल्यापासून वंचित

पुरूषोत्तम डोमळे ।लोकमत न्यूज नेटवर्कसानगडी : शीर्षक वाचून आश्चर्य वाटले. परंतू हे सत्य आहे. गोसेखुर्द पुनर्वसन विभागाच्या फतव्यानुसार, लग्नानंतर एका वर्षाच्या आत अपत्य झाल्यास वाढीव कुटुंबांना नोकरी ऐवजी एकमुस्त रकमेचा लाभ मिळणार अन्यथा लाभ मिळणार नाही, असे म्हटले आहे. परिणामी अनेक कुटुंब वाढीव मोबदल्यापासून वंचित आहेत.विदर्भातील महत्वाकांक्षी राष्ट्रीय प्रकल्प गोसेखुर्द प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील बाधीतांना १.११९ कोटीचे विशेष आर्थिक पॅकेज मंजुर करण्यात आले. या पॅकेजनुसार प्रकल्पबाधीत १८ हजार ४४४ कुटुंबांना नोकरी ऐवजी एकमुस्त रकमेचा लाभ देण्यात आला. लाभ देतेवेळी निवाडा हा मुख्य घटक धरण्यात आला होता. परंतु एका एकाच कुटुंबात अनेक विवाहित कुटुंब वास्तव्य करीत होते. अशा कुटुंबाना वाढीव कुटूंब म्हणून गणना केली गेली. वाढीव कुटुंबांना सुद्धा नोकरी ऐवजी एकमुस्त रक्कमेचा लाभ देण्याचा शासनाचा विचाराधीन होता.त्या संदर्भात आदेश काढून २१ मार्च १९९७ पुर्वी लग्न झालेले असावे. १९९७ च्या मतदार यादीत नाव असावे. बाधित गावाचा रहिवासी असावा, अशी अट घातलेली आहे.याशिवाय विवाहित भाऊ किंवा मुलगा यांचे कुटुंब वाढीव कुटुंबात समावेश असेल, असा कुटुंबानीच वाढीव मोबदल्यासाठी प्रस्ताव सादर करावा, असे आदेशात नमूद आहे.प्रकल्प बाधीत वाढीव कुटुंबानी एकमुस्त रक्कमेचा लाभ मिळण्यासाठी जिल्हाधिकारी पुनर्वसन विभाग यांचेकडे प्रस्ताव सादर केला.ग्रामपंचायतची विवाह नोंदणी प्रमाणपत्र मला मान्य नाही. लग्न झालेल्या वर्षीच नोंदणी का केली नाही. अशी उत्तरे उपजिल्हाधिकारी भुसंपादन पुनर्वसन यांच्याकडून मिळतात.जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा येथील कर्मचाºयांना एका वर्षाच्या आत अपत्य झाली काय, लग्न होताच विवाहाची नोंदणी केली होती काय, असा संतप्त सवालही प्रकल्पग्रस्तांना विचारला जात आहे. यासाठी वाढीव कुटुंबानी रकमेसाठी प्रस्ताव सादर करून मोबदला मिळवून द्यावा, अशीही प्रकल्पग्रस्तांची आर्त हाक आहे.लग्नतारखेनंतर एका वर्षाच्या आत अपत्य झाले असेल तरच २१ मार्च १९९७ पुर्वी लग्न झाले, असे ग्राह्य धरून वाढीव कुटुंबाना एकमुस्त रकमेचा लाभ देण्यात येईल. अटीत न बसलेल्या वाढीव कुटुंबाचे प्रस्ताव अपात्र करण्यात आले आहेत.-जी.जी. जोशी, उपजिल्हाधिकारी भुसंपादन विभाग (विशेष) भंडारा.