शहरं
Join us  
Trending Stories
1
वाद चिघळणार! ठाण्यात शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण; भाजपाच्या माजी नगरसेवकावर आरोप
2
गौतम गंभीरचे प्रयोग टीम इंडियाला झेपेना; दीड वर्षात नंबर ३ वर खेळवले तब्बल सात फलंदाज
3
TATA ची 'ही' कंपनी ५० टक्के कर्मचाऱ्यांची कपात करणार, यापूर्वी TCS मधून १२ हजार कर्मचाऱ्यांना दिलेला नारळ
4
आई आमदार बनली, पण मंत्रिपद मुलाला मिळालं; नितीश कुमारांच्या नव्या सरकारमध्ये संधी, सगळेच हैराण
5
दरवर्षी जमा करा १.५ लाख, मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल; मुलीच्या भविष्यासाठी सुरक्षित आहे सरकारी स्कीम
6
Uddhav Thackeray: "बाबा, मला मारले म्हणत दिल्लीला गेले" अमित शाह- एकनाथ शिंदे यांच्या भेटीवरून ठाकरेंचा टोला
7
Mumbai: मुंबईकरांसाठी खुशखबर...! नव्या इमारतीतील घरांसाठी नोंदणी शुल्क माफ
8
BJP vs Shinde Sena: मुद्रांक शुल्क सवलतीच्या निर्णयावरून शिंदेसेना-भाजपमध्ये क्रेडिट वॉर सुरू!, कोण काय बोलतंय? वाचा
9
आजचे राशीभविष्य - २१ नोव्हेंबर २०२५, कार्यपूर्ती, यश आणि कीर्ती मिळविण्याच्या दृष्टीने अनुकूल दिवस
10
Elections: मुंबईत ११.८० लाख तर, ठाण्यात ४.२१ लाख मतदार वाढले; महिला मतदारांची संख्या अधिक!
11
SC: राज्यपाल, राष्ट्रपतींना विधेयकांच्या मंजुरीसाठी डेडलाइन देता येणार नाही, न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
12
India- Israel: भारत-इस्रायल समृद्धीचे नवे पर्व सुरू, मुक्त व्यापारासाठी उभयतांत सहमती
13
काँग्रेस सिद्धारामय्यांना हटवणार? कर्नाटकात CM पदावरून पुन्हा वाद पेटला, डीके गटातील आमदारांनी दिल्लीत तळ ठोकला
14
चीन-जपान तणावात भारताची 'बल्ले-बल्ले'! झाला बंपर फायदा, बाजार 11% नं वधारला; आता ट्रम्प टॅरिफचं 'नो-टेंशन'!
15
पाकिस्तानचे डोळे उघडले! चक्क चक्क चिनी कंपन्यांना ठणकावले; म्हणाले, 'आमची लूट थांबवा, अन्यथा काम बंद करा'
16
"बौद्ध धर्माचे पालन करतो, पण..., आज जो काही आहे तो..."; निवृत्तीपूर्वी CJI बीआर गवई यांचं मोठं विधान!
17
विशेष लेख: मिस्टर/मिसेस 'पसेंटेज' आणि बंगल्यावरचे 'ठेके'
18
लेख: बिन भिंतींच्या उघड्या शाळेत तुमचे स्वागत आहे...
19
भाजपने आणखी एक नगरपालिका बिनविरोध जिंकली; मविआच्या तिन्ही उमेदवारांनी अर्ज मागे घेतले... 
20
Breaking: भारत - इस्रायल समृद्धीच्या नव्या पर्वाचे 'टेक ऑफ'; मुक्त व्यापार करार, थेट विमानसेवा अन् बरंच काही...
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरात अपत्य झाले तरच लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 23:36 IST

पुरूषोत्तम डोमळे ।लोकमत न्यूज नेटवर्कसानगडी : शीर्षक वाचून आश्चर्य वाटले. परंतू हे सत्य आहे. गोसेखुर्द पुनर्वसन विभागाच्या फतव्यानुसार, लग्नानंतर एका वर्षाच्या आत अपत्य झाल्यास वाढीव कुटुंबांना नोकरी ऐवजी एकमुस्त रकमेचा लाभ मिळणार अन्यथा लाभ मिळणार नाही, असे म्हटले आहे. परिणामी अनेक कुटुंब वाढीव मोबदल्यापासून वंचित आहेत.विदर्भातील महत्वाकांक्षी राष्ट्रीय प्रकल्प गोसेखुर्द ...

ठळक मुद्देगोसेखुर्द पुनर्वसन विभागाचा फतवा : अनेक कुटुंब वाढीव मोबदल्यापासून वंचित

पुरूषोत्तम डोमळे ।लोकमत न्यूज नेटवर्कसानगडी : शीर्षक वाचून आश्चर्य वाटले. परंतू हे सत्य आहे. गोसेखुर्द पुनर्वसन विभागाच्या फतव्यानुसार, लग्नानंतर एका वर्षाच्या आत अपत्य झाल्यास वाढीव कुटुंबांना नोकरी ऐवजी एकमुस्त रकमेचा लाभ मिळणार अन्यथा लाभ मिळणार नाही, असे म्हटले आहे. परिणामी अनेक कुटुंब वाढीव मोबदल्यापासून वंचित आहेत.विदर्भातील महत्वाकांक्षी राष्ट्रीय प्रकल्प गोसेखुर्द प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील बाधीतांना १.११९ कोटीचे विशेष आर्थिक पॅकेज मंजुर करण्यात आले. या पॅकेजनुसार प्रकल्पबाधीत १८ हजार ४४४ कुटुंबांना नोकरी ऐवजी एकमुस्त रकमेचा लाभ देण्यात आला. लाभ देतेवेळी निवाडा हा मुख्य घटक धरण्यात आला होता. परंतु एका एकाच कुटुंबात अनेक विवाहित कुटुंब वास्तव्य करीत होते. अशा कुटुंबाना वाढीव कुटूंब म्हणून गणना केली गेली. वाढीव कुटुंबांना सुद्धा नोकरी ऐवजी एकमुस्त रक्कमेचा लाभ देण्याचा शासनाचा विचाराधीन होता.त्या संदर्भात आदेश काढून २१ मार्च १९९७ पुर्वी लग्न झालेले असावे. १९९७ च्या मतदार यादीत नाव असावे. बाधित गावाचा रहिवासी असावा, अशी अट घातलेली आहे.याशिवाय विवाहित भाऊ किंवा मुलगा यांचे कुटुंब वाढीव कुटुंबात समावेश असेल, असा कुटुंबानीच वाढीव मोबदल्यासाठी प्रस्ताव सादर करावा, असे आदेशात नमूद आहे.प्रकल्प बाधीत वाढीव कुटुंबानी एकमुस्त रक्कमेचा लाभ मिळण्यासाठी जिल्हाधिकारी पुनर्वसन विभाग यांचेकडे प्रस्ताव सादर केला.ग्रामपंचायतची विवाह नोंदणी प्रमाणपत्र मला मान्य नाही. लग्न झालेल्या वर्षीच नोंदणी का केली नाही. अशी उत्तरे उपजिल्हाधिकारी भुसंपादन पुनर्वसन यांच्याकडून मिळतात.जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा येथील कर्मचाºयांना एका वर्षाच्या आत अपत्य झाली काय, लग्न होताच विवाहाची नोंदणी केली होती काय, असा संतप्त सवालही प्रकल्पग्रस्तांना विचारला जात आहे. यासाठी वाढीव कुटुंबानी रकमेसाठी प्रस्ताव सादर करून मोबदला मिळवून द्यावा, अशीही प्रकल्पग्रस्तांची आर्त हाक आहे.लग्नतारखेनंतर एका वर्षाच्या आत अपत्य झाले असेल तरच २१ मार्च १९९७ पुर्वी लग्न झाले, असे ग्राह्य धरून वाढीव कुटुंबाना एकमुस्त रकमेचा लाभ देण्यात येईल. अटीत न बसलेल्या वाढीव कुटुंबाचे प्रस्ताव अपात्र करण्यात आले आहेत.-जी.जी. जोशी, उपजिल्हाधिकारी भुसंपादन विभाग (विशेष) भंडारा.