शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
2
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
3
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
4
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
5
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
8
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
9
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
10
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
11
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 
12
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
13
केदारनाथ येथील हेलिकॉप्टर अपघातात पायलट मुलाचा मृत्यू, पुत्रवियोगाने दु:खी आईने १३ दिवसांनी सोडले प्राण  
14
Aadhaar Card वर तुम्ही मोबाइल नंबर ऑनलाइन बदलू शकता का? काय आहे सर्वात सोपी प्रोसेस, पाहा
15
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
16
₹५००० ची सामान्य एसआयपी की स्टेप अप SIP; कोणती पद्धत लवकर बनवू शकते श्रीमंत? पाहा नफ्याचं गणित
17
'लेडी सेहवाग'च्या 'कमबॅक'मध्ये सचिन तेंडुलकरचा हात! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
18
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
19
राज्यातील सर्वांत मोठे स्क्रॅपिंग सेंटर STच्या जागेवर उभारले जाणार; प्रताप सरनाईकांची माहिती
20
"भाषा धोरणात भाजपाचा दुटप्पीपणा उघड, गुजरातमध्ये पहिलीपासून हिंदीची सक्ती नाही तर महाराष्ट्रातच कशासाठी?’’ काँग्रेसचा सवाल   

वर्षभरात अपत्य झाले तरच लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 23:36 IST

पुरूषोत्तम डोमळे ।लोकमत न्यूज नेटवर्कसानगडी : शीर्षक वाचून आश्चर्य वाटले. परंतू हे सत्य आहे. गोसेखुर्द पुनर्वसन विभागाच्या फतव्यानुसार, लग्नानंतर एका वर्षाच्या आत अपत्य झाल्यास वाढीव कुटुंबांना नोकरी ऐवजी एकमुस्त रकमेचा लाभ मिळणार अन्यथा लाभ मिळणार नाही, असे म्हटले आहे. परिणामी अनेक कुटुंब वाढीव मोबदल्यापासून वंचित आहेत.विदर्भातील महत्वाकांक्षी राष्ट्रीय प्रकल्प गोसेखुर्द ...

ठळक मुद्देगोसेखुर्द पुनर्वसन विभागाचा फतवा : अनेक कुटुंब वाढीव मोबदल्यापासून वंचित

पुरूषोत्तम डोमळे ।लोकमत न्यूज नेटवर्कसानगडी : शीर्षक वाचून आश्चर्य वाटले. परंतू हे सत्य आहे. गोसेखुर्द पुनर्वसन विभागाच्या फतव्यानुसार, लग्नानंतर एका वर्षाच्या आत अपत्य झाल्यास वाढीव कुटुंबांना नोकरी ऐवजी एकमुस्त रकमेचा लाभ मिळणार अन्यथा लाभ मिळणार नाही, असे म्हटले आहे. परिणामी अनेक कुटुंब वाढीव मोबदल्यापासून वंचित आहेत.विदर्भातील महत्वाकांक्षी राष्ट्रीय प्रकल्प गोसेखुर्द प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील बाधीतांना १.११९ कोटीचे विशेष आर्थिक पॅकेज मंजुर करण्यात आले. या पॅकेजनुसार प्रकल्पबाधीत १८ हजार ४४४ कुटुंबांना नोकरी ऐवजी एकमुस्त रकमेचा लाभ देण्यात आला. लाभ देतेवेळी निवाडा हा मुख्य घटक धरण्यात आला होता. परंतु एका एकाच कुटुंबात अनेक विवाहित कुटुंब वास्तव्य करीत होते. अशा कुटुंबाना वाढीव कुटूंब म्हणून गणना केली गेली. वाढीव कुटुंबांना सुद्धा नोकरी ऐवजी एकमुस्त रक्कमेचा लाभ देण्याचा शासनाचा विचाराधीन होता.त्या संदर्भात आदेश काढून २१ मार्च १९९७ पुर्वी लग्न झालेले असावे. १९९७ च्या मतदार यादीत नाव असावे. बाधित गावाचा रहिवासी असावा, अशी अट घातलेली आहे.याशिवाय विवाहित भाऊ किंवा मुलगा यांचे कुटुंब वाढीव कुटुंबात समावेश असेल, असा कुटुंबानीच वाढीव मोबदल्यासाठी प्रस्ताव सादर करावा, असे आदेशात नमूद आहे.प्रकल्प बाधीत वाढीव कुटुंबानी एकमुस्त रक्कमेचा लाभ मिळण्यासाठी जिल्हाधिकारी पुनर्वसन विभाग यांचेकडे प्रस्ताव सादर केला.ग्रामपंचायतची विवाह नोंदणी प्रमाणपत्र मला मान्य नाही. लग्न झालेल्या वर्षीच नोंदणी का केली नाही. अशी उत्तरे उपजिल्हाधिकारी भुसंपादन पुनर्वसन यांच्याकडून मिळतात.जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा येथील कर्मचाºयांना एका वर्षाच्या आत अपत्य झाली काय, लग्न होताच विवाहाची नोंदणी केली होती काय, असा संतप्त सवालही प्रकल्पग्रस्तांना विचारला जात आहे. यासाठी वाढीव कुटुंबानी रकमेसाठी प्रस्ताव सादर करून मोबदला मिळवून द्यावा, अशीही प्रकल्पग्रस्तांची आर्त हाक आहे.लग्नतारखेनंतर एका वर्षाच्या आत अपत्य झाले असेल तरच २१ मार्च १९९७ पुर्वी लग्न झाले, असे ग्राह्य धरून वाढीव कुटुंबाना एकमुस्त रकमेचा लाभ देण्यात येईल. अटीत न बसलेल्या वाढीव कुटुंबाचे प्रस्ताव अपात्र करण्यात आले आहेत.-जी.जी. जोशी, उपजिल्हाधिकारी भुसंपादन विभाग (विशेष) भंडारा.