शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

१०.०५ लाख लाभार्थ्यांना अन्न सुरक्षा योजनेचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 22:40 IST

केंद्र शासनाने सुरू केलेल्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेची भंडारा जिल्ह्यात फेब्रुवारी २०१४ पासून प्रभावी अंमलबजावणी होत असून जिल्ह्यातील २ लाख ५ हजार ४२८ शिधापत्रिकेवरील १० लाख ५ हजार ३४८ लाभार्थ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत अन्न धान्याचा लाभ मिळत आहे.

ठळक मुद्देभंडारा जिल्ह्यात २.५ लाख शिधापत्रिकाधारक : बीपीएलच्या सर्व लाभार्थ्यांचा योजनेत समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : केंद्र शासनाने सुरू केलेल्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेची भंडारा जिल्ह्यात फेब्रुवारी २०१४ पासून प्रभावी अंमलबजावणी होत असून जिल्ह्यातील २ लाख ५ हजार ४२८ शिधापत्रिकेवरील १० लाख ५ हजार ३४८ लाभार्थ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत अन्न धान्याचा लाभ मिळत आहे.सदर योजनेंतर्गत तिहेरी शिधापत्रिका पध्दती संपुष्टात येऊन प्राधान्य कुटूंब योजना लागू केली आहे. यामध्ये बीपीएलचे १०० टक्के लाभार्थी तसेच केशरी शिधापत्रिका मधून ग्रामीण क्षेत्राकरीता ४४ हजार पेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या व शहरी क्षेत्राकरीता ५९ हजार पेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या पात्र लाभार्थ्यांचा समावेश करण्यात आला. यामध्ये जिल्हयातून एकूण ७ लाख ११ हजार ६५ पात्र लाभार्थ्यांची निवड करुन प्रती व्यक्ती ५ किलो अन्न धान्याचा लाभ देण्यात येत आहे. अंत्योदय योजनाचे ६४ हजार ५८५ शिधापत्रिका मधील २ लाख ९४ हजार २८३ लाभार्थ्यांना प्रती कार्ड ३५ किलो अन्न धान्याचा लाभ देण्यात येत आहे.दोन्ही योजनेत जिल्हयातील एकूण २ लाख ५ हजार ४२८ शिधापत्रिका वरील लोकसंख्या १० लाख ५ हजार ३४८ एवढया लाभार्थ्यांना राष्ट्रीय अन्न्न सुरक्षा योजनांतर्गत अन्न धान्याचा लाभ देण्यात येत आहे. सदर लाभार्थ्यांना २ रुपये किलो गहू व ३ रुपये किलो तांदुळ या प्रमाणे धान्य वाटप करण्यात येत आहे. जिल्ह्यातील अजूनही ४१ हजार ७४१ केशरी शिधापत्रिका अन्न सुरक्षा योजनेच्या प्रतिक्षेत आहेत. याबाबत शासनास अवगत करण्यात आले असून वाढीव इष्टांकाची मागणी करण्यात आलेली आहे. सदर वाढीव इष्टांक प्राप्त होताच प्रतिक्षेत असलेल्या पात्र केशरी शिधापत्रिका धारकांना योजनेचा लाभ देण्यात येईल.राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत प्रतिक्षेत असलेल्या ४१ हजार ७४१ शिधापत्रिका धारकांना योजनेचा लाभ मिळावा यासाठी पुरवठा विभागातर्फे शासनास वाढीव इष्टांकाची मागणी करण्यात आली आहे. या लाभार्थ्यांना लवकरच या योजनेचा लाभ मिळणार आहे. जिल्ह्यात कुठलाही पात्र लाभार्थी अन्न सुरक्षा योजनेपासून वंचित राहू नये यासाठी प्रशासन प्रयत्नशिल आहे.