शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
2
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
3
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्त्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
4
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
7
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
8
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
9
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
10
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
11
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
12
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
13
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
14
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
15
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
16
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
17
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
18
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
19
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
20
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली

१०.०५ लाख लाभार्थ्यांना अन्न सुरक्षा योजनेचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 22:40 IST

केंद्र शासनाने सुरू केलेल्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेची भंडारा जिल्ह्यात फेब्रुवारी २०१४ पासून प्रभावी अंमलबजावणी होत असून जिल्ह्यातील २ लाख ५ हजार ४२८ शिधापत्रिकेवरील १० लाख ५ हजार ३४८ लाभार्थ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत अन्न धान्याचा लाभ मिळत आहे.

ठळक मुद्देभंडारा जिल्ह्यात २.५ लाख शिधापत्रिकाधारक : बीपीएलच्या सर्व लाभार्थ्यांचा योजनेत समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : केंद्र शासनाने सुरू केलेल्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेची भंडारा जिल्ह्यात फेब्रुवारी २०१४ पासून प्रभावी अंमलबजावणी होत असून जिल्ह्यातील २ लाख ५ हजार ४२८ शिधापत्रिकेवरील १० लाख ५ हजार ३४८ लाभार्थ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत अन्न धान्याचा लाभ मिळत आहे.सदर योजनेंतर्गत तिहेरी शिधापत्रिका पध्दती संपुष्टात येऊन प्राधान्य कुटूंब योजना लागू केली आहे. यामध्ये बीपीएलचे १०० टक्के लाभार्थी तसेच केशरी शिधापत्रिका मधून ग्रामीण क्षेत्राकरीता ४४ हजार पेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या व शहरी क्षेत्राकरीता ५९ हजार पेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या पात्र लाभार्थ्यांचा समावेश करण्यात आला. यामध्ये जिल्हयातून एकूण ७ लाख ११ हजार ६५ पात्र लाभार्थ्यांची निवड करुन प्रती व्यक्ती ५ किलो अन्न धान्याचा लाभ देण्यात येत आहे. अंत्योदय योजनाचे ६४ हजार ५८५ शिधापत्रिका मधील २ लाख ९४ हजार २८३ लाभार्थ्यांना प्रती कार्ड ३५ किलो अन्न धान्याचा लाभ देण्यात येत आहे.दोन्ही योजनेत जिल्हयातील एकूण २ लाख ५ हजार ४२८ शिधापत्रिका वरील लोकसंख्या १० लाख ५ हजार ३४८ एवढया लाभार्थ्यांना राष्ट्रीय अन्न्न सुरक्षा योजनांतर्गत अन्न धान्याचा लाभ देण्यात येत आहे. सदर लाभार्थ्यांना २ रुपये किलो गहू व ३ रुपये किलो तांदुळ या प्रमाणे धान्य वाटप करण्यात येत आहे. जिल्ह्यातील अजूनही ४१ हजार ७४१ केशरी शिधापत्रिका अन्न सुरक्षा योजनेच्या प्रतिक्षेत आहेत. याबाबत शासनास अवगत करण्यात आले असून वाढीव इष्टांकाची मागणी करण्यात आलेली आहे. सदर वाढीव इष्टांक प्राप्त होताच प्रतिक्षेत असलेल्या पात्र केशरी शिधापत्रिका धारकांना योजनेचा लाभ देण्यात येईल.राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत प्रतिक्षेत असलेल्या ४१ हजार ७४१ शिधापत्रिका धारकांना योजनेचा लाभ मिळावा यासाठी पुरवठा विभागातर्फे शासनास वाढीव इष्टांकाची मागणी करण्यात आली आहे. या लाभार्थ्यांना लवकरच या योजनेचा लाभ मिळणार आहे. जिल्ह्यात कुठलाही पात्र लाभार्थी अन्न सुरक्षा योजनेपासून वंचित राहू नये यासाठी प्रशासन प्रयत्नशिल आहे.