शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
3
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
6
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
7
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
8
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
9
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
10
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
11
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
12
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
13
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
14
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
15
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
16
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
17
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
18
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
19
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
20
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन

१०.०५ लाख लाभार्थ्यांना अन्न सुरक्षा योजनेचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 22:40 IST

केंद्र शासनाने सुरू केलेल्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेची भंडारा जिल्ह्यात फेब्रुवारी २०१४ पासून प्रभावी अंमलबजावणी होत असून जिल्ह्यातील २ लाख ५ हजार ४२८ शिधापत्रिकेवरील १० लाख ५ हजार ३४८ लाभार्थ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत अन्न धान्याचा लाभ मिळत आहे.

ठळक मुद्देभंडारा जिल्ह्यात २.५ लाख शिधापत्रिकाधारक : बीपीएलच्या सर्व लाभार्थ्यांचा योजनेत समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : केंद्र शासनाने सुरू केलेल्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेची भंडारा जिल्ह्यात फेब्रुवारी २०१४ पासून प्रभावी अंमलबजावणी होत असून जिल्ह्यातील २ लाख ५ हजार ४२८ शिधापत्रिकेवरील १० लाख ५ हजार ३४८ लाभार्थ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत अन्न धान्याचा लाभ मिळत आहे.सदर योजनेंतर्गत तिहेरी शिधापत्रिका पध्दती संपुष्टात येऊन प्राधान्य कुटूंब योजना लागू केली आहे. यामध्ये बीपीएलचे १०० टक्के लाभार्थी तसेच केशरी शिधापत्रिका मधून ग्रामीण क्षेत्राकरीता ४४ हजार पेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या व शहरी क्षेत्राकरीता ५९ हजार पेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या पात्र लाभार्थ्यांचा समावेश करण्यात आला. यामध्ये जिल्हयातून एकूण ७ लाख ११ हजार ६५ पात्र लाभार्थ्यांची निवड करुन प्रती व्यक्ती ५ किलो अन्न धान्याचा लाभ देण्यात येत आहे. अंत्योदय योजनाचे ६४ हजार ५८५ शिधापत्रिका मधील २ लाख ९४ हजार २८३ लाभार्थ्यांना प्रती कार्ड ३५ किलो अन्न धान्याचा लाभ देण्यात येत आहे.दोन्ही योजनेत जिल्हयातील एकूण २ लाख ५ हजार ४२८ शिधापत्रिका वरील लोकसंख्या १० लाख ५ हजार ३४८ एवढया लाभार्थ्यांना राष्ट्रीय अन्न्न सुरक्षा योजनांतर्गत अन्न धान्याचा लाभ देण्यात येत आहे. सदर लाभार्थ्यांना २ रुपये किलो गहू व ३ रुपये किलो तांदुळ या प्रमाणे धान्य वाटप करण्यात येत आहे. जिल्ह्यातील अजूनही ४१ हजार ७४१ केशरी शिधापत्रिका अन्न सुरक्षा योजनेच्या प्रतिक्षेत आहेत. याबाबत शासनास अवगत करण्यात आले असून वाढीव इष्टांकाची मागणी करण्यात आलेली आहे. सदर वाढीव इष्टांक प्राप्त होताच प्रतिक्षेत असलेल्या पात्र केशरी शिधापत्रिका धारकांना योजनेचा लाभ देण्यात येईल.राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत प्रतिक्षेत असलेल्या ४१ हजार ७४१ शिधापत्रिका धारकांना योजनेचा लाभ मिळावा यासाठी पुरवठा विभागातर्फे शासनास वाढीव इष्टांकाची मागणी करण्यात आली आहे. या लाभार्थ्यांना लवकरच या योजनेचा लाभ मिळणार आहे. जिल्ह्यात कुठलाही पात्र लाभार्थी अन्न सुरक्षा योजनेपासून वंचित राहू नये यासाठी प्रशासन प्रयत्नशिल आहे.