शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
2
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
3
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
4
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
5
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा
6
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
7
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नव्हते म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
8
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
9
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
10
Barvi Dam: ठाणेकरांची चिंता मिटली! बारवी धरण १०० टक्के भरले; सात दरवाजे उघडले
11
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
12
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
13
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
14
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
15
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
16
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
17
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
18
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
19
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
20
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!

दुष्काळग्रस्त गावांना मिळणार लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 23:07 IST

ज्या तालुक्यांचे सरासरी पर्जन्यमान ३० सप्टेंबरपर्यंत ५० टक्यांपेक्षा कमी असेल, अशा गावांना दुष्काळग्रस्त योजनांचा लाभ मिळणार आहे,....

ठळक मुद्देनाना पटोले : पत्रपरिषदेत माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा :ज्या तालुक्यांचे सरासरी पर्जन्यमान ३० सप्टेंबरपर्यंत ५० टक्यांपेक्षा कमी असेल, अशा गावांना दुष्काळग्रस्त योजनांचा लाभ मिळणार आहे, अशी माहिती खासदार नाना पटोले यांनी दिली. या आशयाचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झालेल्या चर्चेत दिल्याचेही पटोले यांनी सांंिगतले.बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी नगरसेवक नितीन धकाते, विकास मदनकर आदी उपस्थित होते. खा. पटोले म्हणाले, जिल्ह्यातील शेतकºयांची अवस्था फार वाईट आहे. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत ओरीसा राज्याप्रमाणेच धानाला २,९९० रूपये प्रति क्विंटल हमीभाव देण्याची मागणी केली आहे.मे महिन्यात पाण्याची पातळी जेवढी खाली गेली नाही तेवढी सप्टेंबर महिन्यात खालावली आहे. दुष्काळसदृष्य परिस्थीतीत धान्यासह बियाणांचाही पुरवठा केला जातो. मात्र पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही ऐरणीवर येणार आहे.पावसाचा फक्त एक नक्षत्र उर्वरित असून या कालावधीत हव्या त्या मार्गाने वाहणारे पाणी अडविणे अत्यंत गरजेचे झाले आहे. जेणकरुन भविष्यकालीन स्थिती हाताळता येईल.दिवाळीच्या तोंडावर स्वस्त धान्य दुकानातून साखरेचा पुरवठा करण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी रेटून धरली. महिन्याभराच्या काळात ग्रामपंचायतच्या निवडणूका असल्याने त्यात आपण कुठेही मध्यस्थी करणार नसून ग्रामस्थांनी या निवडणूका शांततेत पार पाडाव्यात, असे आवाहन त्यांनी केले.मी फक्त जनतेचाच सेवकमागील महिन्याभरापासून प्रधामंत्री व मुख्यमंत्री यांच्या धोरणाविरुध्द सुर उमटविणा-या खा. नाना पटोले यांना या बाबत छेडले असता ते म्हणाले, मी फक्त जनतेचा सेवक आहे. जिथे कुठे गरीब व माझा बळीराजाला कुणी संकटात आणू पाहत असेल तर मी आपल्या पदाचीही पर्वा करणार नाही. कुठे चुकत असेल तर ते ठामपणे सांगणे हा माझा संवैधानिक अधिकार आहे. मी कुठल्याही परिस्थीतीत शेतकºयांची साथ सोडणार नाही.