शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
2
मराठी तरुणीला मारहाण करून पळालेल्या परप्रांतीय तरुणाला मनसैनिकांनी पकडले, चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले 
3
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
4
महिलांना लग्नाच्या जाळ्यात ओढून उकळायचा पैसे; मंदिरात लग्न उरकायचा अन्...
5
७/११ बॉम्बस्फोटाच्या निकालाविराेधात सरकार सुप्रीम कोर्टात; गुरुवारी सुनावणी
6
भोंग्याबाबतचे नियम दुसऱ्यांदा मोडल्यास गुन्हा नोंदवा! राज्याच्या पोलिस महासंचालकांचे आदेश
7
नवे उपराष्ट्रपती निवडताना भाजपला नाही चिंता; ४२२ सदस्यांचे समर्थन; बहुमताने एकच उमेदवार
8
अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार; शिक्षिकेला मिळाला जामीन
9
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा वादात; म्हणे ‘शासनच भिकारी’
10
दिल्लीत लँडिंग होताच विमानाला अचानक आग; सर्व प्रवासी व कर्मचारी सुखरूप
11
मतदार यादीवरून विरोधक आक्रमकच; पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाज ठप्प
12
धनखड यांनी राजीनामा नेमका का दिला? संसदेबाहेर चर्चा
13
गडचिरोलीत विकासविरोधी कारवायांना विदेशातून फंडिंग! नक्षलींनी बंदुका सोडून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन
14
Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
15
कॅप्टनच्या 'सेंच्युरी'नंतर टीम इंडियाकडून क्रांतीचा 'सिक्सर'! टी-२० सह इंग्लंडला वनडेतही 'धोबीपछाड'
16
‘गँग्ज ऑफ उल्हासनगर’पुढे पोलिसांचे सपशेल लोटांगण; आरोपीची पीडित मुलीच्या घरासमोर मिरवणूक
17
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
18
रहस्यमय रस्ता, दिवसातून केवळ दोन तासच दिसतो, मग गायब होतो, कारण काय?
19
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
20
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा

१५ हजार कामगारांना मिळणार योजनेचा लाभ

By admin | Updated: January 3, 2017 00:28 IST

जिल्ह्यातील विविध उद्योगात काम करणाऱ्या सर्व कामगारांसाठी एक शुभवर्तमान आहे.

कामगार संघाच्या प्रयत्नांना यश : जिल्ह्यात लागू होणार ईएसआयसी योजना भंडारा : जिल्ह्यातील विविध उद्योगात काम करणाऱ्या सर्व कामगारांसाठी एक शुभवर्तमान आहे. जिल्ह्यातील जवळपास १५ हजार कामगारांना केंद्र शासनाची ईएसआयसी योजना लागू होणार आहे. या आशयाचा दुजोरा ईएसआयसीचे संचालक ए.के. शर्मा यांनी दिला आहे. याबाबतीत भंडारा जिल्हा इंजिनिअर कामगार संघाच्या वतीने सातत्याने प्रयत्न सुरू होते. संघाच्या प्रयत्नाला उशिरा का असेना यश मिळाले आहे. केंद्र शासन पुरस्कृत ईएसआयसी (राज्य विमा योजना) राज्यातील २० जिल्ह्यांमध्ये लागू आहे. यात भंडारा जिल्ह्याचा समावेश करावा, अशी मागणी कामगार संघाचे भंडारा जिल्हाध्यक्ष श्रीकांत पंचबुद्धे यांच्यासह कामगारांनी केली होती. यासंदर्भात ईएसआयसीचे संचालक ए.के. शर्मा यांच्याशी कामगार संघटनेच्या शिष्टमंडळाने भेट घेत चर्चा केली. यावेळी पंचबुद्धे यांनी भंडारा जिल्ह्यातील कामगारांची स्थिती व त्यांच्या कुटूंबियांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून ईएसआयसी योजना प्रभाविपणे लागू करावी, अशी आग्रही मागणी केली. यावेळी शर्मा यांनी सदर योजना लागू करण्याचे आश्वासन दिले. विशेष म्हणजे पहिल्या फेरी अंतर्गत गोंदिया जिल्ह्यासाठी योजना लागू झाली आहे. आता भविष्यात भंडारा जिल्ह्याचाही समावेश होणार असल्याने कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या शिष्टमंडळात श्रीकांत पंचबुद्धे, मुनेश्वर टिचकुले, लाला बारसागडे, पुरूषोत्तम नन्होरे, संजय कोचे, संजय बडोले, संजय गजभिये, शशिकिशोर बांडेबुचे, भास्कर टिचकुले, भुपेंद्र ढेेंगे, सचिन गोमासे, मुरली कनपटे, कैलास दामन, रामदास हलमारे, मिलिंद वासनिक, अतुल खोब्रागडे अशोक गायधने आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)