शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

घरकुलाच्या निधीसाठी लाभार्थ्यांची पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 22:40 IST

दारिद्रयरेषेखाली जीवन जगणाऱ्या कुटुंबाना शासनाकडून पक्के घर बांधण्याकरिता विविध योजनेतून निधी देण्यात येतो. लाभार्थ्यांना हा निधी तीन ते चार टक्क्याने दिला जातो.

ठळक मुद्देपालोरा येथील प्रकरण : घरांचे बांधकाम रखडले

आॅनलाईन लोकमतपालोरा (चौ.) : दारिद्रयरेषेखाली जीवन जगणाऱ्या कुटुंबाना शासनाकडून पक्के घर बांधण्याकरिता विविध योजनेतून निधी देण्यात येतो. लाभार्थ्यांना हा निधी तीन ते चार टक्क्याने दिला जातो. अनेक लाभार्थ्यांनी घर बांधण्याचे काम सुरू केले. पहिला धनादेश लाभार्थ्यांना मिळाला म्हणून बांधकाम सुरू केले. मात्र अनेक लाभार्थ्यांचे दोन टप्प्यांचा निधी महिना लोटूनसुद्धा न मिळाल्याने अर्थातच बांधकाम रखडले आहे. हा निधी केव्हा मिळणार यासाठी लाभार्थी प्रतिक्षेत आहेत. संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन निधी द्यावा, अशी मागणी लाभार्थ्यांनी केली आहे.घरकुल योजनेसंदर्भात शासनाचा उद्देश चांगला असला तरी कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षित धोरणांमुळे लाभार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पवनी तालुक्यात पंतप्रधान आवास योजना व रमाई घरकुल योजनेचे कामे सुरू आहेत. अल्पशा निधीमध्ये घरकुलाचे बांधकाम पूर्ण होत नाही तरीही गरजू लाभार्थी घरकुलाचे कामे करीत आहे. मात्र एक ते दोन महिन्यापासून टप्प्याटप्प्याने निधी वेळेवर मिळत नसल्यामुळे जनता त्रस्त झाली आहे. अनेक लाभार्थी उघड्यावर पडले आहेत. राहते घर पडल्यामुळे आता राहायचे कुठे म्हणून जवळच झोपडी तयार करून अनेक जण वास्तव्य करीत आहेत. बँकेच्या खात्यात निधी जमा न झाल्यामुळे आता कुठे राहावे आणि कसे जगावे? अशा प्रश्नांनी लाभार्थ्यांची झोप उडाली आहे. त्यामुळे पंचायत समितीच्या संबंधित विभागाने घरकुलाच्या प्रश्नाकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे लाभार्थ्यांनी म्हटले आहे.लाभार्थी योजनेपासून वंचितपवनी तालुक्यातील पालोरा परिसरात अनेक गावामध्ये गरजू लाभार्थी आहेत. घरकुल योजना मिळविण्यासाठी संबंधित विभागात पायपीट करीत आहेत. पक्के घर नसल्यामुळे भाड्याने राहत आहेत. गरजू लाभार्थ्यांना वगळण्यात आले असून धनाड्यांचा समावेश करण्यात आला आहे हे बोलके चित्र परिसरात पाहायला मिळत आहेत. लोणारा येथील रजनी शंकर भेंडारकर यांचे घर कोसळले आहे. मुलाचे हृदयाचे आॅपरेशन झाले आहे. मात्र घरकुलमध्ये त्याचे नाव समाविष्ठ नाही. घर पाहणी करणारे संबंधित विभागाचे कर्मचारी व गावातील लोकप्रतिनिधी जबाबदारीने काम करतात का? हे यावरून दिसून येते, असा लाभार्थ्यांचा आरोप आहे.