शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

निराश्रित अन् झोपडीत राहणारे लाभार्थी मात्र अपात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2021 23:43 IST

२०१८ मध्ये कॉम्प्युटर ऑपरेटर व प्रगणकांकडून घरकुल ड यादीचे सर्वेक्षण केले होते. या सर्व्हेत मोठा घोळ झाला. धनलक्ष्मी घेऊन सर्वेक्षकांनी अपात्र धारकांना पात्र ठरविले. मात्र, विधवा, परित्यक्ता, निराधार, निराश्रित, दिव्यांग, अनुसूचित जाती, मजूर, भूमिहीन लोकांची नावे आहेत. असे अनेक लाभार्थी अपात्र ठरले. एवढेच नाही, तर ज्यांची झोपडी आहे, असेही लाभार्थी अपात्र ठरविले गेले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी :  विधवा, दिव्यांग, निराश्रित व झोपडीत राहणाऱ्या लाभार्थ्यांनाच घरकुलापासून वंचित ठेवले गेले. असे लाभार्थी अपात्र कसे होऊ शकतात, असा सवाल उपस्थित होत आहे.मोहाडी तालुक्यात ७७ ग्रामपंचायती आहेत. २०१८  मध्ये ग्रामसभेतून घरकुल लाभार्थ्यांची यादी ‘’ड’’ मागविण्यात आली.  त्या याद्या मंजुरीसाठी शासनास पाठविण्यात आल्या होत्या. मंजुरीसाठी पाठविलेल्या २० हजार ९३४  पैकी १५ हजार ८८६ लाभार्थी पात्र ठरले. ५ हजार २४ लाभार्थ्यांना अपात्र घोषित करण्यात आले. अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांचे परत सर्वेक्षण करण्यात यावे.२०१८ मध्ये कॉम्प्युटर ऑपरेटर व प्रगणकांकडून घरकुल ड यादीचे सर्वेक्षण केले होते. या सर्व्हेत मोठा घोळ झाला. धनलक्ष्मी घेऊन सर्वेक्षकांनी अपात्र धारकांना पात्र ठरविले. मात्र, विधवा, परित्यक्ता, निराधार, निराश्रित, दिव्यांग, अनुसूचित जाती, मजूर, भूमिहीन लोकांची नावे आहेत. असे अनेक लाभार्थी अपात्र ठरले. एवढेच नाही, तर ज्यांची झोपडी आहे, असेही लाभार्थी अपात्र ठरविले गेले आहेत. त्यामुळे अनेकांना पावसाळ्यात पडक्या घरात व झोपडीत राहावे लागले. २०२२ पर्यंत सर्वांना घरे, असे केंद्र शासनाने जाहीर केले होते. तसेच निवासी प्रयोजनासाठी असलेली अतिक्रमणे कायम करण्यात आली नाहीत. ग्रामपंचायतींनी पाठविलेले अतिक्रमण नियमानुकूल करण्याचे प्रस्ताव शासनदरबारात पडून आहेत. गरिबांना घरे मिळवीत यासाठी व  मोहाडी तालुक्यातील अपात्र ठरलेल्या व पात्र घरलेल्या घरकुलांचे सर्वेक्षण  पुन्हा करण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी पक्षाचे तालुका अध्यक्ष सदाशिव ढेंगे यांनी केले आहे.

झोपडीत राहणारी कविता अपात्र सर्व लोकांना घरे देण्याची योजना नावाची आहे. हरदोली येथील झोपडीत राहणारी विधवा असणारी कविता झंझाड या विधवेला अपात्र ठरवून घरकुल मिळण्यापासून वंचित ठेवण्यात आले आहे. अशा अनेक लाभार्थ्यांना घरकुल योजनेपासून दूर ठेवण्यात आले आहे.एकाच गावाची तीनशे घरकुले अपात्रजांभोरा ग्रामपंचायतीमधील  ३१८  घरकुलांचे नाव यादीतून  बाद करण्यात आले आहे. तसेच पालोरा २९५, आंधळगाव २५९, डोंगरगाव २००, हरदोली १७८, कुशारी २१०, मांडेसर १८८, रोहा २१७ ,पिंपळगाव १७८ अशा ७७ ग्रामपंचायतींमधून पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांना अपात्र घोषित करण्यात आले आहे. 

 

टॅग्स :Pradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजना