शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
4
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
5
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
6
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
7
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
8
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
9
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
10
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
11
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
12
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
13
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
14
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
15
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
16
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
17
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
18
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
19
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
20
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...

निराश्रित अन् झोपडीत राहणारे लाभार्थी मात्र अपात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2021 23:43 IST

२०१८ मध्ये कॉम्प्युटर ऑपरेटर व प्रगणकांकडून घरकुल ड यादीचे सर्वेक्षण केले होते. या सर्व्हेत मोठा घोळ झाला. धनलक्ष्मी घेऊन सर्वेक्षकांनी अपात्र धारकांना पात्र ठरविले. मात्र, विधवा, परित्यक्ता, निराधार, निराश्रित, दिव्यांग, अनुसूचित जाती, मजूर, भूमिहीन लोकांची नावे आहेत. असे अनेक लाभार्थी अपात्र ठरले. एवढेच नाही, तर ज्यांची झोपडी आहे, असेही लाभार्थी अपात्र ठरविले गेले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी :  विधवा, दिव्यांग, निराश्रित व झोपडीत राहणाऱ्या लाभार्थ्यांनाच घरकुलापासून वंचित ठेवले गेले. असे लाभार्थी अपात्र कसे होऊ शकतात, असा सवाल उपस्थित होत आहे.मोहाडी तालुक्यात ७७ ग्रामपंचायती आहेत. २०१८  मध्ये ग्रामसभेतून घरकुल लाभार्थ्यांची यादी ‘’ड’’ मागविण्यात आली.  त्या याद्या मंजुरीसाठी शासनास पाठविण्यात आल्या होत्या. मंजुरीसाठी पाठविलेल्या २० हजार ९३४  पैकी १५ हजार ८८६ लाभार्थी पात्र ठरले. ५ हजार २४ लाभार्थ्यांना अपात्र घोषित करण्यात आले. अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांचे परत सर्वेक्षण करण्यात यावे.२०१८ मध्ये कॉम्प्युटर ऑपरेटर व प्रगणकांकडून घरकुल ड यादीचे सर्वेक्षण केले होते. या सर्व्हेत मोठा घोळ झाला. धनलक्ष्मी घेऊन सर्वेक्षकांनी अपात्र धारकांना पात्र ठरविले. मात्र, विधवा, परित्यक्ता, निराधार, निराश्रित, दिव्यांग, अनुसूचित जाती, मजूर, भूमिहीन लोकांची नावे आहेत. असे अनेक लाभार्थी अपात्र ठरले. एवढेच नाही, तर ज्यांची झोपडी आहे, असेही लाभार्थी अपात्र ठरविले गेले आहेत. त्यामुळे अनेकांना पावसाळ्यात पडक्या घरात व झोपडीत राहावे लागले. २०२२ पर्यंत सर्वांना घरे, असे केंद्र शासनाने जाहीर केले होते. तसेच निवासी प्रयोजनासाठी असलेली अतिक्रमणे कायम करण्यात आली नाहीत. ग्रामपंचायतींनी पाठविलेले अतिक्रमण नियमानुकूल करण्याचे प्रस्ताव शासनदरबारात पडून आहेत. गरिबांना घरे मिळवीत यासाठी व  मोहाडी तालुक्यातील अपात्र ठरलेल्या व पात्र घरलेल्या घरकुलांचे सर्वेक्षण  पुन्हा करण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी पक्षाचे तालुका अध्यक्ष सदाशिव ढेंगे यांनी केले आहे.

झोपडीत राहणारी कविता अपात्र सर्व लोकांना घरे देण्याची योजना नावाची आहे. हरदोली येथील झोपडीत राहणारी विधवा असणारी कविता झंझाड या विधवेला अपात्र ठरवून घरकुल मिळण्यापासून वंचित ठेवण्यात आले आहे. अशा अनेक लाभार्थ्यांना घरकुल योजनेपासून दूर ठेवण्यात आले आहे.एकाच गावाची तीनशे घरकुले अपात्रजांभोरा ग्रामपंचायतीमधील  ३१८  घरकुलांचे नाव यादीतून  बाद करण्यात आले आहे. तसेच पालोरा २९५, आंधळगाव २५९, डोंगरगाव २००, हरदोली १७८, कुशारी २१०, मांडेसर १८८, रोहा २१७ ,पिंपळगाव १७८ अशा ७७ ग्रामपंचायतींमधून पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांना अपात्र घोषित करण्यात आले आहे. 

 

टॅग्स :Pradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजना