शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'व्होट क्रॉसिंग'वर सर्वात मोठा दावा
2
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
3
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
4
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
5
रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांची फसवणूक, जबरदस्ती सैन्यात भरती केल्याची माहिती
6
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 
7
आईनं सोडलं, शिक्षणही सुटलं; तरीही उभं केलं ₹३३ लाख कोटींचं साम्राज्य; कसा आहे लॅरी एलिसन यांचा प्रवास?
8
मित्रासोबत मिळून बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडवर केला अत्याचार; गुन्हा लपवण्यासाठी केलं असं काही की ऐकून होईल संताप!
9
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
10
Pitru Paksha 2025: पितृदोष दूर केला नाही तर किती पिढ्यांना त्रास होतो? गरुड पुराणात सापडते उत्तर!
11
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
12
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
13
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!
14
Thane Fraud: पोलिसालाही ‘तो’ शेअर्स महागात, कोट्यवधीचा ऑनलाइन डल्ला
15
IPS Archit Chandak : देशसेवेचं स्वप्न! तब्बल ३५ लाखांचं पॅकेज नाकारलं अन् पहिल्याच प्रयत्नात IPS, पत्नीही आहे IAS
16
iPhone 17 Series:'फोल्ड करून दाखवा', आयफोन १७ सिरीज लाँच होताच सॅमसंगने अ‍ॅपलची खिल्ली उडवली
17
"घाई काय आहे, अजिबात नाही"; भारत-पाक सामन्यावर सुप्रीम कोर्टाने दिला तीन वाक्यात निकाल
18
एफडी विसरा... पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत ५.५५ लाख रुपयांचा फिक्स परतावा; दरमहा मिळेल व्याज
19
Navya Malik : आधी मैत्री, मग ग्राहक बनवायची; नेत्यांच्या मुलांना केलं वेडं, ड्रग्ज क्वीनने ८५० श्रीमंतांना लावलं व्यसन
20
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या

मोबाईलवर संभाषण करीत वाहन चालविणे बनले ‘स्टाईल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 00:58 IST

माणसाच्या हातात स्मार्ट फोन आला खरा, पण माणसं स्मार्ट झाली का? हा प्रश्न खऱ्या अर्थाने अजूनही अनुत्तरीतच आहेत. अनेक वाहनांमध्ये मोबाईलवर बोलत स्विंग स्विंग करत वेगाने चालविणे तुम्हाला जमत नसेल, तर तुम्ही दुचाकी चालक नाहीतच अशी काहीशी भावना तरुणात पहावयास मिळत आहे.

ठळक मुद्देसंडे अँकर । वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष, अपघाताच्या संख्येत वाढ, पाल्यांना योग्य मार्गदर्शन करणे गरजेचे

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : माणसाच्या हातात स्मार्ट फोन आला खरा, पण माणसं स्मार्ट झाली का? हा प्रश्न खऱ्या अर्थाने अजूनही अनुत्तरीतच आहेत. अनेक वाहनांमध्ये मोबाईलवर बोलत स्विंग स्विंग करत वेगाने चालविणे तुम्हाला जमत नसेल, तर तुम्ही दुचाकी चालक नाहीतच अशी काहीशी भावना तरुणात पहावयास मिळत आहे.एका तरुणाने कानात हेडफोन घालुन 'राँग साईड'ने गाडी चालवत समोरुन आलेल्या एका वृध्दाला धडक दिल्याच्या प्रकरणात तरुणाला न्यायालयाने दिलेली शिक्षा हे नुकतेच उदाहरण आहे. मात्र अशी अनेक उदाहरणे शहरात सर्रास घडतात.एकीकडे शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिस तारेवरची कसरत करीत आहेत. तर दुसरीकडे अल्पयीन वाहन चालकांची संख्या वरचेवर वाढत असून उनाड तरूण इतर वाहनधारकांसाठी जीवघेणे ठरत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. यावर पोलिस लगाम घालतील काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. गरीब असो की श्रीमंत घराण्यातील तरूण वाहन चालविण्याच्या हट्ट माता पित्यांकडे करीत आहेत. वाहन चालविण्यासाठी वयोमर्यादा लक्षात घेऊन वाहन चालविण्याचा परवाना अत्यावश्यक आहे. असे असतांनाही माता पिता हट्ट पुरविण्यासाठी अल्पवयीन मुलांकडे वाहनांचा ताबा सोपवितात. अशा प्रयत्नात अनेक मुले बळी पडत असल्याच्या घटना अनेक वेळा उघडकीस आल्या आहेत. परंतु लगाम बसत नसल्याचे दिसून येते.शहरातील मुख्य रस्त्यावरून कट मारणे, शाळा महाविद्यालयीन विद्यार्थिनीना पाहून हिरोगिरी करणे, दोन्ही कानात हेडफोन लावुन गाणे ऐकत कुणांशीतरी संभाषण करीत वाहन चालविण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे इतर वाहन धारकांना त्याचा परिणाम भोगावा लागतच आहे. परंतु वाहन चालविणाºया अल्पवयीन मुलाला आपला जीव गमवावा लागत आहे. याकडे पालकांना लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच वाहतूक पोलिसांनी यावर लगाम घालणे अत्यंत गरजचे बनले आहे. तसेच पालकांनाही आपल्या पाल्यांना योग्य मार्गदर्शन करणे गरजेचे झाले आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन होत असले तरी कारवाई मात्र नगण्य आहे. यामुळे वाहनचालकांचे मनोबल उंचावले असून वाहतूक नियमांची अमंलबजावणी होत नाही.सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची गरजमहत्वाच्या ठिकाणी वाहनधारकांवर नियंत्रण आणण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेºयाची नजर असणे आवश्यक आहे. यातून वाहनधारकांवर कारवाई करत अपघात आणि वाहन चालवताना मोबाईल वापर करणाºयांवर आळा बसवता येईल. त्यासाठी शहरात सीसीटी कॅमरे लावणे गरजेचे झाले आहे.कारवाई शून्यवाहन चालविताला भ्रमणध्वीवर संभाषण करणे कायद्याने गुन्हा आहे. परंतु आजही तरूण तरूणी भ्रमणध्वनीवर संभाषण करत वाहन चालविण्याची स्टाईल करीत असल्याचे चित्र पहावयास मिळते. अशावेळी आजूबाजूंनी किंवा पाठीमागून आलेल्या वाहनांचा थांगपत्ता लागत नाही. अशावेळी वाहतूक पोलिसांनी वाहन थांबवून थातूर मातूर कारवाई करण्याऐवजी योग्य ती कारवाई केल्यास सदर प्रकार थांबवून होणाºया अपघातापासून निदान सुटका तरी होऊ शकते. परंतु पोलिस योग्य ती कारवाई करीत नसल्याने अशा मुलांचे बळ वाढत आहे.

टॅग्स :Mobileमोबाइल