शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईलवर संभाषण करीत वाहन चालविणे बनले ‘स्टाईल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 00:58 IST

माणसाच्या हातात स्मार्ट फोन आला खरा, पण माणसं स्मार्ट झाली का? हा प्रश्न खऱ्या अर्थाने अजूनही अनुत्तरीतच आहेत. अनेक वाहनांमध्ये मोबाईलवर बोलत स्विंग स्विंग करत वेगाने चालविणे तुम्हाला जमत नसेल, तर तुम्ही दुचाकी चालक नाहीतच अशी काहीशी भावना तरुणात पहावयास मिळत आहे.

ठळक मुद्देसंडे अँकर । वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष, अपघाताच्या संख्येत वाढ, पाल्यांना योग्य मार्गदर्शन करणे गरजेचे

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : माणसाच्या हातात स्मार्ट फोन आला खरा, पण माणसं स्मार्ट झाली का? हा प्रश्न खऱ्या अर्थाने अजूनही अनुत्तरीतच आहेत. अनेक वाहनांमध्ये मोबाईलवर बोलत स्विंग स्विंग करत वेगाने चालविणे तुम्हाला जमत नसेल, तर तुम्ही दुचाकी चालक नाहीतच अशी काहीशी भावना तरुणात पहावयास मिळत आहे.एका तरुणाने कानात हेडफोन घालुन 'राँग साईड'ने गाडी चालवत समोरुन आलेल्या एका वृध्दाला धडक दिल्याच्या प्रकरणात तरुणाला न्यायालयाने दिलेली शिक्षा हे नुकतेच उदाहरण आहे. मात्र अशी अनेक उदाहरणे शहरात सर्रास घडतात.एकीकडे शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिस तारेवरची कसरत करीत आहेत. तर दुसरीकडे अल्पयीन वाहन चालकांची संख्या वरचेवर वाढत असून उनाड तरूण इतर वाहनधारकांसाठी जीवघेणे ठरत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. यावर पोलिस लगाम घालतील काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. गरीब असो की श्रीमंत घराण्यातील तरूण वाहन चालविण्याच्या हट्ट माता पित्यांकडे करीत आहेत. वाहन चालविण्यासाठी वयोमर्यादा लक्षात घेऊन वाहन चालविण्याचा परवाना अत्यावश्यक आहे. असे असतांनाही माता पिता हट्ट पुरविण्यासाठी अल्पवयीन मुलांकडे वाहनांचा ताबा सोपवितात. अशा प्रयत्नात अनेक मुले बळी पडत असल्याच्या घटना अनेक वेळा उघडकीस आल्या आहेत. परंतु लगाम बसत नसल्याचे दिसून येते.शहरातील मुख्य रस्त्यावरून कट मारणे, शाळा महाविद्यालयीन विद्यार्थिनीना पाहून हिरोगिरी करणे, दोन्ही कानात हेडफोन लावुन गाणे ऐकत कुणांशीतरी संभाषण करीत वाहन चालविण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे इतर वाहन धारकांना त्याचा परिणाम भोगावा लागतच आहे. परंतु वाहन चालविणाºया अल्पवयीन मुलाला आपला जीव गमवावा लागत आहे. याकडे पालकांना लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच वाहतूक पोलिसांनी यावर लगाम घालणे अत्यंत गरजचे बनले आहे. तसेच पालकांनाही आपल्या पाल्यांना योग्य मार्गदर्शन करणे गरजेचे झाले आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन होत असले तरी कारवाई मात्र नगण्य आहे. यामुळे वाहनचालकांचे मनोबल उंचावले असून वाहतूक नियमांची अमंलबजावणी होत नाही.सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची गरजमहत्वाच्या ठिकाणी वाहनधारकांवर नियंत्रण आणण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेºयाची नजर असणे आवश्यक आहे. यातून वाहनधारकांवर कारवाई करत अपघात आणि वाहन चालवताना मोबाईल वापर करणाºयांवर आळा बसवता येईल. त्यासाठी शहरात सीसीटी कॅमरे लावणे गरजेचे झाले आहे.कारवाई शून्यवाहन चालविताला भ्रमणध्वीवर संभाषण करणे कायद्याने गुन्हा आहे. परंतु आजही तरूण तरूणी भ्रमणध्वनीवर संभाषण करत वाहन चालविण्याची स्टाईल करीत असल्याचे चित्र पहावयास मिळते. अशावेळी आजूबाजूंनी किंवा पाठीमागून आलेल्या वाहनांचा थांगपत्ता लागत नाही. अशावेळी वाहतूक पोलिसांनी वाहन थांबवून थातूर मातूर कारवाई करण्याऐवजी योग्य ती कारवाई केल्यास सदर प्रकार थांबवून होणाºया अपघातापासून निदान सुटका तरी होऊ शकते. परंतु पोलिस योग्य ती कारवाई करीत नसल्याने अशा मुलांचे बळ वाढत आहे.

टॅग्स :Mobileमोबाइल