शहरं
Join us  
Trending Stories
1
India Lifts First ODI World Cup Trophy: हरमनप्रीतसह संघातील खेळाडूंनी खास अंदाजात उंचावली ट्रॉफी (VIDEO)
2
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
3
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
4
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
5
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
6
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
7
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
8
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
9
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
10
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
11
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
12
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
13
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
14
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
15
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
16
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
17
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
18
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
19
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
20
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास

खेळण्या-बागडण्याच्या वयात साहिल खिळला अंथरूणाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 21:48 IST

खेळण्या बागडण्याच्या वयात साहिलला स्नायूंचा दुर्मिळ आजार झाला. वडिलांनी शक्य तेवढे उपचार केले. मुंबईत शस्त्रक्रिया केली. यावर चार ते पाच लाख रुपये खर्चही झाले. मात्र वेदनातून साहिलची सुटका झाली नाही. आता १४ वर्षीय साहिल अंथरुणाला खिळून असून आरोग्य विम्याचाही उपयोग शून्य आहे. अशा या बालकाला आता समाजाकडूनच मदतीची आस आहे.

ठळक मुद्देमदतीची आस : स्नायूच्या दुर्मिळ आजाराने ग्रस्त, आरोग्यविमा असूनही मदत नाही

तथागत मेश्राम।लोकमत न्यूज नेटवर्कवरठी : खेळण्या बागडण्याच्या वयात साहिलला स्नायूंचा दुर्मिळ आजार झाला. वडिलांनी शक्य तेवढे उपचार केले. मुंबईत शस्त्रक्रिया केली. यावर चार ते पाच लाख रुपये खर्चही झाले. मात्र वेदनातून साहिलची सुटका झाली नाही. आता १४ वर्षीय साहिल अंथरुणाला खिळून असून आरोग्य विम्याचाही उपयोग शून्य आहे. अशा या बालकाला आता समाजाकडूनच मदतीची आस आहे.साहिल रामलाल गणवीर असे या बालकाचे नाव आहे. सात वर्षाचा असताना त्याच्या प्रकृतीत अचानक बदल दिसायला लागला. स्थानिक डॉक्टरांकडून उपचार करूनही सुधारणा होत नव्हती. त्यामुळे नागपूर येथील अस्थिरोग तज्ज्ञांकडे उपचारासाठी नेण्यात आले. त्यावेळी तेथे त्याला स्नायूचा दुर्मिळ आजार असल्याचे निदान झाले. साहिलचे वडील रामलाल सनफ्लॅग कंपनीत कंत्राटी कर्मचारी आहेत. घरची परिस्थिती बेताची असतानाही त्यांनी साहिलच्या उपचारात कुठेही कमी पडू दिले नाही. परंतु या दुर्मिळ आजारावर हवे तसे उपचार उपलब्ध नाही. त्यामुळे साहिलचे शरीर कमजोर झाले. स्नायूत रक्तपेशी दाटल्याने खेळणारा साहिल अंथरुणाला खिळला.पाच महिन्यापूर्वी साहिलवर मुंबई येथील खासगी दवाखान्यात शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यावर चार ते पाच लाख रुपये खर्च झाले. उधार, उसणवार करून त्यांनी ही शस्त्रक्रिया केली. आता पुन्हा मुंबईला उपचारासाठी न्यायचे आहे. पुन्हा चार ते पाच लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. याही उपचाराने तो बरा होईल असे कुणी सांगत नाही. परंतु असह्य वेदना कमी होतील. त्याला दुसऱ्यावर अवलंबून राहावे लागणार नाही अशी आस आहे. कमावलेले पैसे उपचारात गेले. कंत्राटी कामगार पाच लाख रुपयांची व्यवस्था करणार तरी कशी. यासाठी समाजातील दानशूर दात्यांनी पुढे यावे आणि साहिलला वेदनेतून मुक्त करावे अशी अपेक्षा आहे.आरोग्य विमा कुचकामीरामलाल गणवीर यांनी आपल्या तुटपुंज्या वेतनातून आरोग्य विमा काढला. दरवर्षी त्यांच्या खात्यातून ३३७५ रुपये कापले जातात. आपल्या कुटुंबाची यातून आरोग्याची तरतूद होईल अशी अपेक्षा होती. परंतु आता साहिलच्या आरोग्यासाठी होणारा खर्च देण्यास विमा कंपनीने नकार दिल्याचे रामलाल यांनी सांगितले. आमदारापासून मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत आवश्यक कागदपत्रे गोळा करूनही मुख्यमंत्री सहाय्यता निधीही मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले.