शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमधील आंदोलनाला हिंसक वळण; राष्ट्रपती, गृहमंत्री आणि परराष्ट्रमंत्र्यांची घरे जमावाने जाळली
2
Gen-Z क्रांतीमुळे नेपाळमध्ये सत्तापालट? पंतप्रधान ओली दुबईला पळून जाण्याच्या प्रयत्नात, खाजगी विमान तयार
3
रणबीर कपूर 'या' कंपनीचे १२.५ लाख शेअर्स खरेदी करणार, सलग दुसऱ्या दिवशी अपर सर्किट; गुंतवणूकदार मालामाल
4
ओलाच्या नावाने शिमगा केला, बजाज चेतक भररस्त्यात पेटली; इचलकरंजीत शोला बनला आग का गोला...
5
नेपाळमध्ये सरकार कोसळण्याचं संकट, घटकपक्षाने सोडली साथ; आतापर्यंत ३ मंत्र्यांनी दिले राजीनामे
6
हेल्दी वाटणारा मिल्कशेक मेंदूसाठी ठरतोय 'विष'; आवडीने पिणाऱ्यांना धोक्याचा इशारा
7
डिफेन्स कंपनीचा शेअर ठरला 'मल्टीबॅगर', ६ महिन्यांत पैसे दुप्पट; ५ वर्षांत दिला २०००% परतावा
8
रशियन कच्च्या तेलावरील भारताच्या नफ्याला म्हटलं 'ब्लड मनी'; ट्रम्प यांच्या सहकाऱ्यानं पुन्हा गरळ ओकली
9
स्थानिक निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदेंनी डाव टाकला; भाजपाच्या शत्रूशी केली हातमिळवणी, काय घडलं?
10
Punjab Flood : पुराचे थैमान! पंजाबमधील मृतांचा आकडा ५१ वर; पिकं पाण्याखाली, शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा
11
Asia Cup 2025 : 'बॅग'सह 'लक फॅक्टर' घेऊन दुबईला पोहचलाय कोच गंभीर! नेमकी काय आहे ही भानगड?
12
गोराई बीचवर मिनीबस भरतीच्या पाण्यात अडकली; चालकाचे जीवघेणं धाडस, तीन तासांनी...
13
WhatsApp Web Down : लॅपटॉप किंवा माऊस खराब झाला नाही तर WhatsApp Web आहे डाऊन; स्क्रोलिंगला येतोय प्रॉब्लेम
14
"नेपाळसाठी काळा दिवस...", देशातील हिंसक परिस्थिती पाहून मनीषा कोईरालाची भावुक पोस्ट
15
केसगळती, अपचनावर 'रामबाण' उपाय; तुळशीची ३-४ पानं खा, शरीरात होतील चमत्कारिक बदल
16
सोनं १३०० रुपये तर चांदी ३००० रुपयांनी महागली, तुमच्या शहरातील आजचा दर काय?
17
‘ऑफिसात जीव गेला तरी बेहत्तर, पण नोकरी सोडणार नाही’, तरुणाने मांडली EMI मध्ये अडकलेल्या मध्यमवर्गीयाची व्यथा 
18
Uddhav Thackeray: शिवसेनेच्या (यूबीटी) मेळाव्याला राज ठाकरे उपस्थित राहणार नाही?
19
Apple iPhone : काय सांगता! प्रत्येक फोनवर अ‍ॅपल एवढा नफा मिळवते, आयफोन बनवण्यासाठी खर्च किती येतो?
20
पत्नीचं परपुरुषासोबत सुरू होत अफेयर, पतीला लागली कुणकुण अन् कांड झाला!

‘निष्ठी’ रेशीम गाव म्हणून नावलौकिक व्हावा

By admin | Updated: March 4, 2016 00:38 IST

टसर रेशीम उत्पादनात जिल्ह्याला १५० वषार्पासून पारंपारिक वैभवशाली परांपरा लाभलेली आहे.

भंडारा : टसर रेशीम उत्पादनात जिल्ह्याला १५० वषार्पासून पारंपारिक वैभवशाली परांपरा लाभलेली आहे. तसेच जिल्ह्यातील निष्ठी, सितेपार, जमनी, किटाळी असे रेशीम केंद्र आहेत. त्यातील रेशीम महाराष्ट्रात विक्रीसाठी आघाडीवर आहे. ही बाब प्रशंसनीय आहे. निष्ठीस रेशीम गाव म्हणून लौकिक मिळावा. यासाठी येथील लाभार्थ्यांनी रेशिम उत्पादनात वाढ करावी. त्यामुळे त्यांच्या उत्पन्नात वाढ होवून त्यांचे जीवनस्तर उंचावण्यास मदत होईल, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी येथे केले. संयुक्त वन व्यवस्थापन समिती, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा व रेशीम कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने पवनी तालुक्यातील टसर रेशीम धागा निर्मिती केंद्र निष्ठी येथे टसर रेशीम धागा निर्मिती प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी टसर रेशीम लाभार्थ्यांशी संवाद साधतांना बोलत होते. त्यांच्यासमवेत जिल्हाधिकारी धीरजकुमार, मुख्यकार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर, पवनी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पवनीत कौर, उपवनसंरक्षक एन. आर. प्रवीन, उपविभागीय अधिकारी डॉ. संपत खिलारी, आत्माच्या प्रकल्प संचालक प्रज्ञा गोडघाटे, माविमच्या ज्योती निंभोरकर, रेशीम विकास अधिकारी एस. के. शर्मा उपस्थित होते. अनुपकुमार म्हणाले, वन विभागातर्फे लाभार्थ्यांसाठी ५० टक्के वन लागवडीसाठी उपलब्ध आहे. त्याचा लाभार्थ्यांनी फायदा घेवून गावात कोष उत्पादन करावे. तसेच उत्पादनाची टक्केवारी वाढवावी. कोष निर्मिती, रिलींग व कापड निर्मिती गावातच झाली तर निश्चितच त्याचा फायदा लाभार्थ्यांना होऊन त्यांच्या उत्पन्नात वाढ होईल. यासाठी लागणारे सर्व सोयी उपलब्ध करण्यात येतील, असेही आयुक्त अनुपकुमार यांनी सांगितले. केंद्रास रेशिम धागा निर्मितीसाठी लाभार्थ्यांच्या मागणीप्रमाणे ४० रिलींग मशिन उपलब्ध करुन देण्यात येतील, असेही ते म्हणाले. गावातच कोषापासून सर्व प्रक्रिया करुन साडी निर्मिती केल्यास निश्चितच उत्पादनात वाढ होऊन उत्पन्न वाढीस मदत होईल असे त्यांनी सांगितले.जिल्हाधिकारी अनुपकुमार म्हणाले, जिल्ह्यात ५० लाख कोष उत्पादन व्हायला पाहिजे, त्यासाठी लाभार्थ्यांनी प्रयत्नशिल रहायला पाहिजे. दिवसेंदिवस वन नष्ट होत आहेत. त्यांची संवर्धन करणे गरजेचे आहे. त्यासाठी जिल्ह्यातील रेशीम लागवडीत वाढ झाली पाहिजे व जिल्ह्याचे नाव लौकिक रेशिम जिल्हा म्हणून कसे होईल, यावर भर दिला पाहिजे. लाभार्थ्यांनी रेशिम विक्रीसाठी सक्षम बनले पाहिजे तसेच योग्य भाव कसे मिळेल याविषयी प्रयत्नशिल राहिले पाहिजे. यावेळी अनुपकुमार यांनी टसर निर्मिती केंद्रास भेट देवून तेथील रेशीम धागा निर्मिती प्रक्रियेविषयी महिला कामगारांकडून माहिती घेतली. रेशिम उत्पादन वाढीसाठी प्रत्येक गावात रेशीमदूतांची नेमणूक करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. या वर्षात १५ लाख अंडीपूंजाची निमीर्ती करण्यात आली. परंतु त्या बाजारपेठसाठी सुविधा नसल्याने अत्यल्प भाव मिळत असल्याचे लाभार्थ्यांनी सांगितले. (नगर प्रतिनिधी)