शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

साकोलीला सौंदर्यीकरणाचा फटका

By admin | Updated: September 19, 2015 00:46 IST

जसजशी शहराची लोकसंख्या वाढत आहे. तसतशी अतिक्रमणाची समस्याही वाढत आहे.

साकोली : जसजशी शहराची लोकसंख्या वाढत आहे. तसतशी अतिक्रमणाची समस्याही वाढत आहे. वाढत्या अतिक्रमणामुळे शहरात वाहतुकीची समस्या बिकट होत चालली आहे. साकोली येथील चौक, रस्ते व गल्लीबोळात अतिक्रमणाचा विळखा आहे.अतिक्रमण निर्मूलनाकरीता नगरपंचायत व तहसील कार्यालय मोहीम राबवित असले तरी ती केवळ औपचारिकताच असते. या अतिक्रमणाच्या समुळ उच्चाटनाकरिता त्यांच्याकडे कोणतेही नियोजन नसल्याचे दरवेळी उघडकीला येते. या अतिक्रमणाच्या विळख्यामुळे सामान्य नागरिकांची मात्र रोज कोडी होते. शहराची लोकसंख्या २० हजारांच्या वर आहे. याच ठिकाणी असलेल्या साकोली शहरात रोज शेकडो नागरिक कामानिमित्त येतात. शहरात मुख्य बाजारपेठ, शासकीय निमशासकीय विविध कार्यालये, व्यापारी प्रतिष्ठाने, आरोग्य व्यवस्थेच्या सर्व सोयी आहेत. येथे रस्त्याच्या कडेला किंवा जेथे थोडीसी मोकळी जागा मिळाली तेथे निलज आणि कायद्याला न जुमानता सर्रासपणे अतिक्रमण केले जाते.अतिक्रमणधारकावर कायद्याचा आणि पालिका प्रशासनाचा वचक राहिला नाही. तसेच अतिक्रमण धारकांना सर्वसामान्य नागरिकांची कोणतीही पर्वा राहिली नाही. मिळेल त्या ठिकाणीही पर्वा राहिली नाही. मिळेल त्या ठिकाणी अतिक्रमण करून कायद्याची पायमल्ली केली जाते. चौकासह प्रत्येक गल्लीबोळात अतिक्रमणाने विळखा घातला आहे. मताच्या राजकारणात अतिक्रमणाच्या समस्येकडे व तक्रारीकडे कानाडोळा केला जातो. कोणी तक्रार केली तरी त्यावर संबंधित विभाग कोणतीही कार्यवाही करीत नाही.जर एखादेवेळी अतिक्रमण कार्यवाही करण्यात आली तरी ती केवळ औपचारीकताच सध्या साकोली येथील एकोडी रोड ते पोलीस स्टेशनपर्यंत भाजी विक्रेते व फुटपाथ दुकानदार रस्त्याच्या बाजुला दुकाने थाटून बसत आहेत. परिणामी वाहतुकीला अडथळे निर्माण होत आहेत तर तहसील कार्यालयासमोर वाहनांच्या अडचणीमुळे समस्या बीकट होत चालली आहे. या समस्येकडे प्रशासनाने कधी डोळे उघडून पाहिलेही नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी अतिक्रमण निर्मूलनासाठी पुढाकार घेण्याची मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)