शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

अस्वलाशी दोन हात पण प्रशासनापुढे हतबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 21:29 IST

अस्वलाने अचानक हल्ला केला. त्यात गंभीर जखमी झालो. आरडाओरडीने अस्वल पळूनही गेली. अस्वलासोबतची झुंज सोपी होती पण प्रशासनासोबत तीन महिने केलेला संघर्ष महाकठीण. हे अनुभव आहेत, सहा महिन्यापूर्वी अस्वलाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या गराडा येथील एका शेतमजुराचे. डॉक्टरांच्या चुकीने मदतीपासून वंचित राहण्याची वेळ आलेल्या या शेतमजुराने प्रशासनासोबत अक्षरश: झुंज करून मदत मिळविलीच.

ठळक मुद्देगराडाचा मजुराचा संघर्ष : मदतीसाठी झिजविले उंबरठे, वैद्यकीय अहवालातील चुकीचा फटका

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : अस्वलाने अचानक हल्ला केला. त्यात गंभीर जखमी झालो. आरडाओरडीने अस्वल पळूनही गेली. अस्वलासोबतची झुंज सोपी होती पण प्रशासनासोबत तीन महिने केलेला संघर्ष महाकठीण. हे अनुभव आहेत, सहा महिन्यापूर्वी अस्वलाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या गराडा येथील एका शेतमजुराचे. डॉक्टरांच्या चुकीने मदतीपासून वंचित राहण्याची वेळ आलेल्या या शेतमजुराने प्रशासनासोबत अक्षरश: झुंज करून मदत मिळविलीच.लाखनी तालुक्यातील गराडा येथील शिवदास मिताराम बनकर (४०) हा २ आॅगस्टच्या सकाळी सरपण आणण्यासाठी माडगी जंगलात गेला. ९ वाजताच्या सुमारास दोन पिले सोबत असलेल्या अस्वलाने हल्ला केला. यात त्यांच्या डोळ्याला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली. आरडाओरडीने अस्वल पळून गेल्यानंतर आपल्या मुलाला मोबाईलवरून माहिती दिली. मुलाने तात्काळ लाखनीच्या रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर प्रकृती गंभीर असल्याने भंडाराच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या ठिकाणी टाळू आणि डोळ्याजवळ सुमारे ३० ते ३५ टाके घालण्यात आले. १५ दिवस रुग्णालयात उपचार घेतले. त्यानंतर रुग्णालयातून सुटी दिली. वैद्यकीय प्रमाणपत्र देताना मात्र डॉक्टरांनी नजरचुकीने म्हणा अथवा कोणत्या कारणाने किरकोळ जखमी असा उल्लेख केला आणि येथेच घात झाला.वन्य प्राण्यांनी जखमी केल्यानंतर वन विभागाच्या वतीने शासकीय मदत दिली जाते. या मदतीसाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र सादर करावे लागते. शिवदास हे प्रमाणपत्र घेऊन वनविभागात गेला. तेव्हा त्यावर किरकोळ जखमी असा उल्लेख असल्याने एक हजार रुपये मदत मिळेल असे सांगितले. यामुळे तो हतबल झाला. ३० ते ३५ टाके असतानाही डॉक्टरांनी किरकोळ जखमी लिहिल्याचा त्याला फटका बसला. रुग्णालयात जाऊन डॉक्टरांची मनधरणी केली. परंतु उपयोग होत नव्हता. आता आपल्याला शासकीय मदत मिळणार नाही असे त्याला वाटत होते. अशातच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष यशवंत सोनकुसरे यांची भेट झाली. त्यांना सर्व कहाणी सांगितली. त्यांनी थेट शिवदासला घेऊन जिल्हा सामान्य रुग्णालय गाठले. डॉक्टरांना जाब विचारला. गंभीर जखमीची व्याख्या नेमकी काय? असे विचारले. आपली चूक असल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले. तात्काळ योग्य रिपोर्ट तयार करून दिला. त्यानंतर वनविभागाकडे अर्ज करण्यात आला. तेथेही त्यांना सातत्याने पाठपुरावा करावा लागला. यात तीन महिने गेले. अलिकडेच शिवदास बनकर यांना वनविभागाच्या वतीने एक लाख २५ हजार रुपयांची मदत देण्यात आली. अस्वलाशी झालेली झुंज काही क्षणाचीच होती, परंतु प्रशासनासोबत सातत्याने तीन महिने त्यांना संघर्ष करावा लागला.अखेर सव्वा लाखांची मदतकिरकोळ जखमी ठरविल्याने शिवदास मदतीपासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली होती. कोणतेही मार्गदर्शन नाही. शासकीय कार्यालयांचा अनुभव नाही. मात्र याही परिस्थितीत त्याने मदतीसाठी संघर्ष केला आणि वनविभागाने अखेर त्याला एक लाख २५ हजारांची मदत दिली.