शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
3
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
4
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
5
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
6
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
7
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
8
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
9
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
10
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
11
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
12
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
13
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
14
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
15
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
16
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
17
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
18
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
19
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
20
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस

भंडारा जिल्ह्यात वाघाच्या तीन बछड्यांसह अस्वलाचा मृत्यू, वन्यजीव प्रेमींमध्ये हळहळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2021 16:57 IST

Bhandara : भंडारा तालुक्यातील गराडा गावाजवळील टेकेपार उपसा सिंचन प्रकल्पाच्या कालव्यातील सायफन टाक्यात बुधवारी सकाळी ७ वाजता वाघाचे दोन बछडे मृतावस्थेत आढळले.

ठळक मुद्देभंडारा वनविभागासाठी बुधवार हा काळा दिवस ठरला.सोमवारी रात्री टाक्यात बुडून मृत्यू झाला असावा असा कयास आहे.

भंडारा : वाघाच्या तीन बछड्यासह अस्वलाचा मृत्यू झाल्याचे बुधवारी उघडकीस आले. भंडारा तालुक्यातील गराडा जवळ दोन बछडे तर रावणवाडी जंगलात एक अस्वल मृतावस्थेत आढळले. या घटनेची हळहळ सुरु असतानाच पवनी तालुक्यातील धानोरी बीटमध्ये एका वाघाच्या बछड्याचा मृत्यू झाल्याचे वृत्त धडकले. भंडारा वनविभागासाठी बुधवार हा काळा दिवस ठरला.

भंडारा तालुक्यातील गराडा गावाजवळील टेकेपार उपसा सिंचन प्रकल्पाच्या कालव्यातील सायफन टाक्यात बुधवारी सकाळी ७ वाजता वाघाचे दोन बछडे मृतावस्थेत आढळले. या घटनेची माहिती होताच उपवनसंरक्षक शिवराम भलावी आणि वनपरिक्षेत्रअधिकारी विवेक राजूरकर घटनास्थळी दाखल झाले. दोन महिन्याचे असलेले हे दोन्ही बछडे मादी जातीचे होते. सोमवारी रात्री टाक्यात बुडून मृत्यू झाला असावा असा कयास आहे. वनविभागाने दोन्ही बछड्यांचे मृतदेह ताब्यात घेऊन गडेगाव येथील वनविभागाच्या कार्यालयात शवविच्छेदनासाठी आणले. ही कारवाई सुरु असतानाच भंडारा तालुक्यातील रावणवाडी जंगलात अस्वल मृतावस्थेत असल्याची माहिती मिळाली. रावणवाडी ते धारगाव रस्त्यावर एक मोठे अस्वल मृतावस्थेत आढळून आले. नेमका तिचा कसा मृत्यू झाला हे अद्याप कळले नाही. वनपरिक्षेत्रअधिकारी विवेक राजूरकर घटनास्थळी दाखल झाले.

या दोन घटनांची वनविभाग चौकशी करीत असतानाच पवनी तालुक्यातील धानोरी बिटमध्ये एका वाघाच्या बछड्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले. या परिसरात असलेल्या वाघीणीला दोन बछडे होते. एका बछड्याला वाघीण सोबत घेऊन गेली. दुसरा बछडा मात्र धानोरी बीटमध्येच राहुन गेला. वनविभागाला या घटनेची माहिती होताच छोट्या बछड्याला रेस्क्यू करीत दूध देण्याचा प्रयत्न केला. तसेच त्याच जागी वाघीण परत येईल व सुटलेल्या बछड्याला घेऊन जाईल म्हणून वनविभागाने बछड्याला तेथेच ठेवले. परंतु बुधवारी सकाळी त्या बछड्याचाही मृत्यू झाल्याचे लक्षात आले. हा बछडा एक महिन्यापेक्षाही लहान असल्याचे सांगण्यात आले. वनविभागाचे अधिकारी तिन्ही प्रकरणाची चौकशी करीत आहेत.

भंडारा जिल्ह्यासाठी काळा दिवसएकाच दिवशी वाघाचे तीन बछडे आणि एका अस्वलाचा मृत्यू झाला. वनविभागाचा पर्यायाने पर्यावरणाचे देखील मोठे नुकसान झाले. या घटनेने जिल्ह्यातील वन्यप्रेमी व सामान्य नागरिक देखील हळहळ करीत होते. भंडारा जिल्ह्यासाठी बुधवार काळा दिवस ठरला.

जिल्ह्यासाठी आजची घटना अत्यंत दुर्देवी आहे. चार वन्यजीवांचा बळी गेला. भंडारा जिल्हा निसर्ग संपन्न जिल्हा आहे. मोठ्या प्रमाणात वन्यजीव आहेत. बुधवार आम्हा वन्यप्रेमींसाठी काळा दिवस ठरला आहे. वनविभागाने अशा घटना कशा टाळता येतील याकडे लक्ष देण्याची गरज आहे.-नदीम खान, मानद वन्यजीव संरक्षक, भंडारा.

टॅग्स :Tigerवाघ